मुख्य सामग्रीवर वगळा

स्व. गुरुनाथ कुलकर्णींचे कोकण विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी संपूर्ण सहकार्य: उपमुख्यमंत्री

मुंबई, ता. ८ - सर्वसमावेशक राजकारणी, निर्भीड वक्ता, अभ्यासू नेता आणि पत्रकार-कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणारे सर्वांचे मित्र अशी ओळख असलेल्या स्व. गुरुनाथ कुलकर्णी यांचे कोकण विकासाचे स्वप्न साकार होण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
स्व. गुरुनाथ कुलकर्णी यांच्या जयंतीनिमित्त गिरगाव चौपाटी येथील भारतीय विद्या भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कुलकर्णी यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा आढावा घेतला. स्व. गुरुनाथ कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकार सर्वश्री प्रताब आसबे यांना गुरुकुल पुरस्कार, प्रकाश कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार, प्रकाश सावंत, शशिकांत सांडभोर, निशांत सरवणकर यांना विशेष पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील, आमदार उल्हास पवार, माजी आमदार अरविंद सावंत, श्रीमती स्वप्नगंधा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन पत्रकार रविंद्र पांचाळ यांनी केले. स्वप्नगंधा कुलकर्णी यांनी आभार मानले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012