गुरुवार, २३ जून, २०१६
आरोग्य उत्तम राखण्यासाठी मुबलक प्रमाणात झाडे लावावी - सचिनदादा धर्माधिकारी
तुर्भे, ता २३ (प्रतिनिधी) - आरोग्य उत्तम राखण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन व स्वच्छता राखणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मुबलक प्रमाणात झाडे लावली पाहिजे असे प्रतिपादन सचिनदादा धर्माधिकारी यांनी तुर्भे एमआयडीसी येथे आयोजित स्वच्छता अभियानात केले. जागतिक लोकसेवा दिनाचे औचित्य साधून डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्स कंपनीच्या संयुक्त विद्यमाने या स्वच्छता अभियानचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रतिष्ठानचे जवळपास अडीच हजारपेक्षा जास्त सदस्य व हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्सचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते, यावेळी त्यांनी तुर्भे एमआयडीसी, शिरवणे, नेरूळ आणि जुईनगर भागात स्वच्छता अभियान राबविले. भविष्यात महाराष्ट्र व देशाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध मोहिमा या प्रतिष्ठानच्या सहकार्याने राबविणार असून आगामी काळात या प्रतिष्ठानचीच मदत घेऊन आरोग्य पर्यावरण व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
आपल्या मनातील अहंकाराचा वापर हा माणसा-माणसा मधील अंतर्गत वैमनस्य वाढविण्यासाठी न करता त्याचा उपयोग राष्ट्राच्या प्रगतीसाठी करावा असे मार्गदर्शन श्री सचिनदादा धर्माधिकारी यांनी उपस्थित सदस्यांना केले. स्वच्छता हि मानवी जीवनातील महत्वाचा घटक असून आपण सर्वांनी त्याचा अंगीकार केला पाहिजे आणि त्यासाठी कंपनी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे कंपनीचे उपव्यवस्थापक एस के भटनागर यांनी सांगितले, या स्वच्छता अभियानात प्रतिष्ठानचे साचीनदादा धर्माधिकारी, उमेश दादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी, हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्स उपव्यवस्थापक एस के भटनागर,
अविनाश खांदेतोडे, एस के चौधरी, कंपनीचे अधिकारी व कर्मचारी व नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे व सदस्य सहभागी झाले होते. डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत आहे, येत्या १ जुलैस प्रतिष्ठानचे सदस्य राष्ट्रीय वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.
आरोग्य उत्तम राखण्यासाठी मुबलक प्रमाणात झाडे लावावी - सचिनदादा धर्माधिकारी
तुर्भे, ता २३ (प्रतिनिधी) - आरोग्य उत्तम राखण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन व स्वच्छता राखणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मुबलक प्रमाणात झाडे लावली पाहिजे असे प्रतिपादन सचिनदादा धर्माधिकारी यांनी तुर्भे एमआयडीसी येथे आयोजित स्वच्छता अभियानात केले. जागतिक लोकसेवा दिनाचे औचित्य साधून डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्स कंपनीच्या संयुक्त विद्यमाने या स्वच्छता अभियानचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रतिष्ठानचे जवळपास अडीच हजारपेक्षा जास्त सदस्य व हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्सचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते, यावेळी त्यांनी तुर्भे एमआयडीसी, शिरवणे, नेरूळ आणि जुईनगर भागात स्वच्छता अभियान राबविले. भविष्यात महाराष्ट्र व देशाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध मोहिमा या प्रतिष्ठानच्या सहकार्याने राबविणार असून आगामी काळात या प्रतिष्ठानचीच मदत घेऊन आरोग्य पर्यावरण व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
आपल्या मनातील अहंकाराचा वापर हा माणसा-माणसा मधील अंतर्गत वैमनस्य वाढविण्यासाठी न करता त्याचा उपयोग राष्ट्राच्या प्रगतीसाठी करावा असे मार्गदर्शन श्री सचिनदादा धर्माधिकारी यांनी उपस्थित सदस्यांना केले. स्वच्छता हि मानवी जीवनातील महत्वाचा घटक असून आपण सर्वांनी त्याचा अंगीकार केला पाहिजे आणि त्यासाठी कंपनी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे कंपनीचे उपव्यवस्थापक एस के भटनागर यांनी सांगितले, या स्वच्छता अभियानात प्रतिष्ठानचे साचीनदादा धर्माधिकारी, उमेश दादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी, हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्स उपव्यवस्थापक एस के भटनागर,
अविनाश खांदेतोडे, एस के चौधरी, कंपनीचे अधिकारी व कर्मचारी व नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे व सदस्य सहभागी झाले होते. डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत आहे, येत्या १ जुलैस प्रतिष्ठानचे सदस्य राष्ट्रीय वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.
गुरुवार, १६ जून, २०१६
अभिनेता भारत गणेशपुरे यांना "विदर्भ आयकॉन" पुरस्कार
(नवी मुंबई)- अशोकपुष्प प्रकाशनच्या वतीने गेली सहा वर्षे सातत्याने "सन्मान रजनी" चे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.
या पुर्वी कला,साहित्य,चित्रपट,संगीत,नृत्य,गजल,सहकार,उद्योग क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले. यावर्षी "अशोकपुष्प पुरस्कार सन्मान रजनी" चे आयोजन विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवार, दिनांक २४ जुन २०१६ रोजी रात्री ८ वाजता करण्यात आले आहे.
या सन्मान रजनी पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेता भारत गणेशपुरे यांना विदर्भ आयकॉन हा पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त तसेच गजल नवाज भीमराव पांचाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. अभिनेता भारत गणेशपुरे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले असून त्यांच्या भूमिका विविधरंगी अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
तसेच नाट्यक्षेत्रातील प्रसिद्ध नाव अभिनेता संतोष पवार यांना "विनोद रत्न" पुरस्कार प्रदान करण्यात येईल. केदार शिंदे दिग्दर्शित "तु तु मी मी" या नाटकात एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चौदा विविध रंगी भूमिका साकारून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. उत्कृष्ट सामाजिक संदेश देणारा चित्रपट म्हणून पोलिस लाईन या चित्रपटाच्या निर्मा त्या रुपाली पवार व वैशाली पवार आणि प्रस्तुतकर्ते श्रीधर चारी यांचा सत्कार करण्यात येईल, यावेळी या चित्रपटातील कलावंत, तंत्रज्ञ, दिग्दर्शक उपस्थित राहणार आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांना "कलारत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या "खुमखूमी" या कार्यक्रमास २५ वर्षे पूर्ण होत असून या कार्याक्रमाचे देश विदेशात प्रयोग गाजलेत. "लोककलारत्न" हा पुरस्कार नंदेश विठ्ठल उमप यांना प्रदान करण्यात येईल. पोलीसदल सेवारत्न पुरस्काराने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे तसेच पत्रकारिता सेवारत्न पुरस्कारने विलास बढे यांना सन्मानित करण्यात येईल.
"विविध क्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या मान्यवरांचा अशोकपुष्प सन्मान रजनीच्या माध्यमातून गौरव करणे म्हणजे त्यांना प्रोत्साहन देण्यासारखे असते व इतरांना ती प्रेरणा असते.गेली सहा वर्ष विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात येतात त्यामध्ये नवी मुंबईतील व्यक्तींचा ही समावेश आहे. सन्मान रजनीच्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार असल्याचे आयोजक उमेश चौधरी व अनघा लाड यांनी सांगितले.
यावेळी नवी मुंबई क्षेत्रातील व्यक्तींचा त्यांनी आपआपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये दशरथ शिंगाडे (उद्योगश्री), तुषार गोगरी व विलास खुल्लर (उद्योगश्री जाहिरात क्षेत्र), विनय खडसे (तरुण उद्योजक),आबा रणवरे (पर्यावरण मित्र), मनमीत सिंग (गायक), गंगासिंग राजपूत (युवा पत्रकार),सानिध पुजारी (युवा पत्रकार), अनिस दीन (फॅशन ),किरण सावंत (मनोरंजन).
सोमवार, १९ ऑक्टोबर, २०१५
मुंबई सानपाडा येथे स्वस्त दरात एलईडी बल्ब वितरण केंद्राचे उदघाटन
मुंबई, सानपाडा - प्रभाग ७७,७८ मधील नागरिकांसाठी स्वस्त दरामधे LED बल्ब वितरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
सानपाडा विभागातील सेक्टर १,१३,१४,१५,१६,१७,१८,१९,२० मधील विभागात मोठमोठ्या उंच इमरती आहेत. म्हणून विजेची बचत ही घराघरामधे व्हावी या उद्देशाने दिनांक १८ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २०१५ पर्यन्त बुद्धेश्वर मंदिर, सानपाडा येथे सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० वजे पर्यन्त नागरिकांसाठी खुला करण्यात आले आहे. या संधीचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा म्हणून श्री. दशरथ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विजयादशमीच्या मुहुर्तावर ४ लेड बल्ब वर १०० रुपयांची विशेष सूट असणार आहे. हे LED बल्ब केंद्रावर खरेदी करते वेळी आपण आपले ओळखपत्र आणि लाइटबिलची छायांकित प्रत सोबत बाळगणे गरजेचे आहे.
यावेळी श्री. दशरथ भगत, अध्यक्ष - नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस, निशांत भगत,अध्यक्ष- ठाणे लोकसभा युवक कॉंग्रेस, नगरसेविका वैजयंती भगत, नगरसेविका रूपाली भगत तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
शनिवार, ९ मे, २०१५
अनधिकृत बांधकामांविरूध्द कारवाई होणारच – संजय भाटिया
नवी मुंबई, ता. ८ एप्रिल - नवी मुंबईतील ९५ गावठाणांच्या आसपासची अनधिकृत बांधकामे न्यायालयाच्या निर्णयानुसार पाडणे सिडकोला बंधनकारक असल्याने अशा १६५७ बांधकामाविरूध्दची कारवाई सिडको लवकरात लवकर करील अशी स्पष्ट ग्वाही सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय भाटिया यांनी आज दिली. जासई येथील आदर्श ग्राम योजनेअंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी श्री. भाटिया बोलत होते.
नवी मुंबईत प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे त्यांच्या सततच्या मागणीनुसार नियमित करण्यासाठी समूह विकास योजनेद्वारे गावठाणांचा पुनर्विकास करण्याबाबतची अधिसूचना २०१४ मध्ये शासनाने प्रसिध्द केली होती. प्रकल्पग्रस्तांच्या हरकती व सूचनांचा विचार करून शासनाने सुधारित योजना तयार केली. पुनर्विकास करण्यात येणाऱ्या बांधकामांना ४ चटईक्षेत्र निर्देशांक देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२ मार्च २०१५ रोजी विधिमंडळात केली होती.
सर्व १६५७ अनधिकृत बांधकामे १ जानेवारी २०१३ नंतर बांधण्यात आली आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात अशी १०२१ बांधकामे आहेत तर सिडकोच्या क्षेत्रात ६३६ बांधकामे आहेत. यापैकी ४०१ बांधकामांना १ जून २०१४ नंतर एमआरटीपी कायद्याअंतर्गत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यातही नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे २४६ बांधकामे आहेत तर सिडको क्षेत्रात १५५ बांधकामे आहेत अशी माहिती भाटिया यांनी दिली.
या अनधिकृत बांधकामांचा दर्जा निष्कृष्ट आहे तसेच या बांधकामांनी प्रमाणित नियमांचे उल्लघंन केले आहे. आपत्तीप्रसंगी या बांधकामांपर्यंत पोहोचण्यास योग्य रस्ता नसल्याकारणाने अग्निशमन आणि सुरक्षा नियमांचाही भंग या बांधकामांमुळे झाला आहे. बहुतांशी बांधकामे सामाजिक सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागांवर पेट्रोलियम आणि ओएनजीसी पाईपलाईन्सवर करण्यात आली आहेत.
गावठाणापासूनच्या २०० मी. क्षेत्राबाहेरील परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास सिडकोने प्राधान्य दिले आहे. सिडकोने खारघर येथील फारशीपाडा येथील बेकायदेशीर इमारती पूर्णत: जमीनदोस्त केल्या. १५ मे पर्यंत १८८ जागांवरील अनधिकृत बांधकामांविरूध्द कारवाई करण्याची मोहीम सिडकोने हाती घेतली आहे. कामोठे येथील एका अनधिकृत बांधकामाविरूध्द ३० एप्रिल रोजी कारवाई करण्यात आली. अनधिकृत बांधकामाविरोधी मोहिमेसाठी विशेष बंदोबस्त देण्याच नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी मान्य केले आहे. जी बांधकामे पाडता येणे शक्य नाही त्यांच्याविरूध्द गुन्हे नोंदविण्यात येतील.
अनधिकृत बांधकामांना वीज जोडणी देण्यात येऊ नये तसेच पिण्याचे पाणी आणि सांडपाण्याची व्यवस्था यासारख्या पायाभूत सुविधा पुरवू नयेत अशी विनंती करणारे पत्र सिडकोने पाठविले आहे. मुख्यमंत्री आणि नगरविकास विभागालाही या पत्राची प्रत पाठविण्यात आली आहे.
प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेल्या २०१२ पर्यंतच्या बांधकामांना शासनाने अभय दिले आहे. मात्र त्यानंतर केलेल्या बांधकामांबाबत कोणतेही खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नयेत अशा इशाराही भाटिया यांनी दिला आहे.
गावठाणांबाहेरच्या बांधकामांचा व्यवहार करताना सिडकोकडे अवश्य चौकशी करावी. तसेच या बांधकामांसंदर्भात देण्यात येणाऱ्या भुलथापांना बळी पडू नये. अनधिकृत बांधकामे किती निष्कृष्ट दर्जाची असतात हे जिल्ह्यात काही ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमुळे सर्वांच्याच निदर्शनास आले आहे अशी आठवणही त्यांनी करून दिली.
अनधिकृत बांधकामांचे खरेदी-विक्री व्यवहार बेकायदेशीर तर आहेतच शिवाय त्यामुळे स्वत:च्या जीवावर संकट येऊ शकते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. अनधिकृत बांधकामांविरूध्द उचललेले पाऊल सिडकोने आजवर कधीही मागे घेतलेले नाही. सिडकोने नेहमीच प्रकल्पग्रस्तांच्या भल्याचा विचार केला आहे. गावठाणातील अविकसित आणि अनियोजनबध्द विकासामुळे प्रकल्पग्रस्तांना एका जागतिक दर्जाच्या शहरात राहूनही अनेक पायाभूत सुविधांना मुकावे लागत आहे. गावठाण परिसरातील प्रकल्पग्रस्तांचे जीवनमान सुधारण्यासाठीच सिडकोने समूह विकास योजना आणली आहे. या योजनेत समूहाचे म्हणजेच सर्वांचे हित साधले जाईल. यात कोणाचाही वैयक्तिक स्वार्थ नाही याकडेही भाटिया यांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधले.
शनिवार, ६ डिसेंबर, २०१४
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी हाती भरलेली लेखी नामनिर्देशनपत्रेही स्वीकारण्यात येणार
मुंबई दि. 6 – जानेवारी ते एप्रिल 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल करताना ती ऑनलाईन पध्दतीने भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. तथापि ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधेतील त्रुटीमुळे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र भरु शकत नसेल अशा ठिकाणी तो हाती भरलेले लेखी नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करु शकेल असे राज्य निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आलेल्या प्रसिध्दिपत्रकात पुढे म्हटले आहे की जे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या अंतिम वेळेआधी म्हणजे सोमवार दि.8 डिसेंबर, 2014 रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष हजर असतील अशा उमेदवारांचे लेखी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी स्वीकारु शकतील. तथापि, अशा सर्व लेखी अर्जांची संगणकीकृत माहिती भरण्याची जबाबदारी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची असेल.
रविवार, ३० नोव्हेंबर, २०१४
स्टर्लिंग महाविद्यालयाचे औषध साक्षरता जनजागृती अभियान
नेरूळ- येथील स्टर्लिंग महाविद्यालयाच्या वतीने नुकताच ५३ वा फार्मसी सप्ताह साजरा करण्यात आला. इंडियन फार्मा असोसिएशन व महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या फार्मसी सप्ताहामध्ये महाविद्यालयाच्या वतीने औषध साक्षरता जनजागृती अभियान देखील राबविण्यात आले. यामध्ये डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा कसा वापर करावा, कोणते औषधे सेवन करावी औषध विकत घेताना कोणती काळजी घ्यावी, त्यांची साठवण कशी करावी याविषयीची माहिती नागरिकांना देण्यात आली.
या सप्ताहाच्या निमित्ताने फार्मसी विद्यार्थांसाठी महाविद्यालयाच्या वतीने शनिवारी एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी उपस्थीत विद्यार्थ्यांना फार्मसी असोसिएशन चे अध्यक्ष डॉ हेमंत मोंडकर, महाराष्ट्र आरोग्य विद्यालयाचे प्र कुलगुरू डॉ शेखर राजदरेकर, प्राचार्य डॉ घाटगे, डॉ बाविस्कर व अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये फार्मसी क्षेत्रातील नामवंत मंडळी, फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
तसेच, सबंधित वेळेत याच दिवशी महाविद्यालयाच्या बाहेरील पटांगणात भाभा अणुसंशोधन केंद्रातील तंत्रज्ञानाचे प्रदर्शनही भरविले जाणार असल्याची माहिती कर्मवीर भाऊराव पाटील महाविदयालय रसायनशास्त्राचे विभागाचे मुख्य प्राचार्य आर. जी. पाटील यांनी दिली.
नवी मुंबई सायन्स फाउंडेशन तर्फे ‘जागतिक अणुउर्जा दिवस’
वाशी : नवी मुंबई सायन्स फाउंडेशन, भारतीय किरणोत्सार संरक्षण परिषद आणि महाराष्ट्र अॅकेडमी ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविदयालय येथील बॅरीस्टर पी.जी. पाटील सभागृहात मंगळवार २ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ‘जागतिक अणुउर्जा दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.
जागतिक अणुउर्जा दिवसानिमित्त ‘भविष्यातील उर्जा आणि पर्यावरणाचे एकत्रित जतन’ या विषयावर भारत सरकारच्या अणुउर्जा आयोगाचे माजी चेअरमन व पद्मभूषण डॉ. अनिल काकोडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच, इतरही काही मान्यवरांना सबंधित विषयांवर माहिती सांगण्यासाठी आमंत्रित केले असल्याची माहिती नवी मुंबई सायन्स फाउंडेशनचे चेअरमन डॉ. अरुण भागवत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ‘अणुउर्जा निर्मिती आणि किरणोत्साराचा वापर व यातील सुरक्षितता’ या विषयावर भारत सरकारच्या अणुउर्जा विभागातील मान्यवर शास्त्रज्ञ आणि नवी मुंबईच्या महाविदयालयाचे शिक्षक, विद्यार्थी आणि प्राचार्य यांच्यात परिसंवाद स्वरूपाची चर्चा होणार असल्याची माहिती नवी मुंबई सायन्स फाउंडेशनचे संयोजक एस.पी. अगरवाल यांनी दिली. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नवी मुंबई सायन्स फाउंडेशनचे सदस्य मधुकर बेल्लारी यांनी केली आहे.
शनिवार, २९ नोव्हेंबर, २०१४
जानेवारी ते एप्रिल 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
मुंबई दि. 29 – जानेवारी ते एप्रिल 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज जाहीर केला आहे.
या कार्यक्रमानुसार सदर निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल करताना ती ऑनलाईन पध्दतीने भरणे अनिवार्य आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या 14 जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी गुरुवार दि. 4 डिसेंबर 2014 ते सोमवार दि. 8 डिसेंबर 2014 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून रविवार दि. 7 डिसेंबर 2014 हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने फक्त ऑनलाईन नामनिर्देशनपत्रे भरता येतील. मंगळवार दि. 9 डिसेंबर 2014 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक गुरुवार दि. 11 डिसेंबर 2014 हा असून मंगळवार दि. 23 डिसेंबर 2014 रोजी मतदान घेण्यात येईल. या निवडणुकांची मतमोजणी संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदान संपल्यानंतर किंवा संध्याकाळी 6 वाजता करण्यात येईल. बुधवार दि. 24 डिसेंबर 2014 रोजी या निवडणुकांचे निकाल प्रसिध्द करण्यात येतील.
नांदेड आणि गडचिरोली या जिल्ह्यातील निवडणूक कार्यक्रम वरीलप्रमाणेच असून या दोन जिल्ह्यातील निवडणुकांची मतमोजणी बुधवार दि. 24 डिसेंबर 2014 रोजी होणार असून त्याच दिवशी निवडणुकांचे निकाल प्रसिध्द करण्यात येतील. फक्त गडचिरोली जिल्ह्यातील मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत राहणार असून अन्य सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत असेल.
सार्वत्रिक निवडणूक असलेल्या संबंधित ग्रामपंचायतीच्या संपूर्ण क्षेत्रात तसेच पोटनिवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीच्या संबंधित प्रभागाच्या क्षेत्रात आज रात्री 12.00 वाजल्यापासून आचारसंहिता लागू होईल व निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहील असे राज्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.
शनिवार, १५ नोव्हेंबर, २०१४
जळगावात 28 पासून ‘कृषी व डेअरी’ प्रदर्शन; चार दिवसीय प्रदर्शनात असणार प्रात्यक्षिकांवर भर
जळगाव (प्रतिनिधी) - जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. व पुणे येथील डीएसके मिल्कोट्रॉनिक्स् प्रयोजित ‘कृषी व डेअरी एक्स्पो 2014’या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे येथील शिवतीर्थ मैदानावर 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. अॅग्रोवर्ल्ड हे या प्रदर्शनाचे आयोजक असून प्लँटो कृषीतंत्र व जलश्री सहप्रायोजक आहेत. या चार दिवसीय प्रदर्शनासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जळगाव जिल्हा परिषद, आत्मा व नाबार्ड या शासकीय संस्थांचे सहकार्य लाभले आहे. जळगावात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात ‘डोम स्ट्रक्चर’मध्ये हे प्रदर्शन होत असून 120 स्टॉलधारक सहभागी होत आहेत.
सध्याची दुष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई, हवामानाचा लहरीपणा, दरातील चढ-उतार, शेतमजुरांची टंचाई या बाबींमुळे शेतकरी चिंतीत आहे. याचाच विचार करून गरजेवर आधारीत उपाय सुचविण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.थोडक्यात प्रात्यक्षिकांवर भर तसेच नाविन्यपूर्ण बाबींचा समावेश हेच या प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये असेल. मग त्यात अत्याधुनिक सूक्ष्म सिंचन प्रणाली, यंत्र, तंत्र, अवजारे, नवीन वाण, फवारणी, खते, काढणी पूर्व व पश्चात तंत्रज्ञान, दरातील चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी साठवणूकगृह, रॅपनिंग चेंबर, अत्यल्प खर्चात उपलब्ध असलेले डीहायड्रेशन तंत्र (निर्जलीकरण), दुग्धव्यवसाय सहज व सोपा करण्यासाठी व छोट्या पशूपालकांनाही परवडतील अशी दूध काढणी यंत्र, ‘काऊ कंफर्ट’ तंत्र पहावयास मिळेल. शेततळे,शेडनेट, पॉलिहाऊस, मल्चिंग, गोड्या पाण्यातील मोती संवर्धन यांचे प्रात्यक्षिक तसेच त्यासाठी उपलब्ध शासकीय योजना व बँकांचे अर्थसहाय्य असे सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध असेल, अशी माहीती ‘अॅग्रोवर्ल्ड’च्या शैलेंद्र चव्हाण यांनी दिली. याशिवाय,शेती, माती, पाणी, प्रक्रीया व पूरक उद्योग या विषयातील पुस्तकही प्रदर्शनस्थळी असतील. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग,राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राज्यातील अकोला, राहुरी व परभणी हे तीन कृषी विद्यापीठ, सहा कृषी विज्ञान केंद्र, आत्मा,पशूसंवर्धन विभाग, मत्स, रेशीम, पणन, वखार महामंडळ या सर्व शासकीय संस्थांसाठी स्वतंत्र दालनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात विविध शासकीय योजनांची माहीती तसेच त्याबाबतचे प्रात्यक्षिक पहावयास मिळेल, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी किसनराव मुळे यांनी स्पष्ट केले.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...

