मुख्य सामग्रीवर वगळा

बलसागर भारत होवो...CWG भारतीय मल्लांना सॅल्युट।

दिल्ली येथे सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय मल्लांनी कुस्तीमध्ये सलग दहा (10) सुवर्ण पदके प्राप्त करून देशाच्या नावावर एक विक्रम प्रस्थापित केला आहे. देशाच्या नावलौकिकात उज्जवल यशाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला. देश सर्वच बाबतीत पुढे आहे. खेळाडूंना अनेक दिवसांपासून दिलेले प्रशिक्षण आणि मिळालेल्या सुविधा, मार्गदर्शन आणि त्यांचा हुरुप..यामुळेच हे शक्य झाले आहे. पुरुष खेळाडूंची बरोबरी महिला खेळाडूंनी सुध्दा केली आहेच. नेमबाजीद्वारे आपले लक्ष्य सहज टिपुन सुवर्ण पदकांचे मानकरी देखील आपण ठरलो आहोत.
देशाने आपल्या पिलांना मोठे करण्यासाठी जगात कुठेही स्वच्छंदपणे उडून यश मिळवण्यासाठी त्यांच्या पंखांना असेच बळ कायम देणे आवश्यक आहे. खेळाडूंनी सुद्धा व्यसनापासून दूर रहावे, देशाने सुद्धा भ्रष्टाचारापासून दूर व्हावे..। असे झाल्यास भारत खरंच महाशक्ती होऊन बलशाली होईल, यात शंकाच नाही.


===========================================राष्ट्रकुल स्पर्धा, CWG============================================

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012