चिलीच्या उत्तरेस असलेल्या ऍटाकामा प्रांतातल्या सोन्याच्या खाणीत अडकलेल्या ३३ कामगारांना बाहेर काढण्यात नौदलास यश आले. यासाठी एक विशिष्ट आकाराची कॅप्सुल (५४ सेंटीमीटर रुंद) तयार करून ती कॅप्सुल खाणीमध्ये ६२२ मीटर खोलीपर्यंत ते सोडण्यात आली होती. या कॅप्सुलमध्ये एकावेळी एक व्यक्तीच समाविष्ट केली जात होती. यामुळे खाणीतल्या अडकलेल्या ३३ कामगारांना बाहेर काढण्यात जास्त वेळ लागला. परंतु कोणाचीही अखेर न होता..अखेर या सर्वांना बाहेर काढण्यात यश मिळाले. प्राप्त सूत्रांनुसार नासा या संस्थेच्या मदतीने ही मोहिम राबविण्यात आली. या यशात खरंतर या तंत्रज्ञानाचे देखील यश महत्वाचे आहे. लाख मोलाचा जीव वाचविण्यासाठी लाखो रुपये किंमतीची यंत्रणाच अखेर उपयोगी पडली...।
मार्चमध्ये पनवेल येथे चौथे राज्यव्यापी साहित्य संमेलन: कवी, गजलकारांना सहभागी होण्याचे संस्थांचे आवाहन
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. याकरिता सहभागी होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील नामवंत कवी, गजलकारांनी आपल्या स्वरचित कविता, गजल २० फेब्रुवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि विश्वव्यापी मराठी साहित्य, सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे. अभिजात मराठी भाषेच्या जतनाकरिता गेली अनेक वर्षे दोन्ही संस्था कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली कवी संमेलने, गजल मुशायरा, चर्चासत्रांपासून मराठी भाषेचा गोडवा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सकाळी वारकरी दिंडीतून ‘ज्ञानोबा-तुकोबा’ यांच्या गजरासह ग्रंथ दिंडीत टाळ, चिपळ्या, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पारंपरिक पद्धतीने नयनरम्य पालखी काढण्यात येईल. या परंपरेच्या माध्यमातून पनवेल शहराचे साहित्य, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जतन केला जात आहे. सकाळी दिंडी, उद्घाटन सोहळा, एक-एक तासाच्या अवधीची दोन चर्चासत्रे, कवी आख्यान, गजल मुशायरा याशिवाय अन्य ...