मुख्य सामग्रीवर वगळा

इंटरनेटमुळे बहिण-भाऊ झाले मित्र...

इंटरनेटच्या माध्यमातून दिवसेंदिवस जग जवळ येत आहे. अगदी दिल्लीपासून गल्ली देखील जवळ आली आहे. देशांतर्गत, परदेशात स्थायिक झालेली कुटुंब सुद्धा याला अपवाद नाहीत. दूर राहून एकमेकांची सुखदुःख विचारणारे बहिण-भाऊ आता एकमेकांचे मित्र बनले आहेत.
एक काळ होता..महिलांनी घराबाहेर जास्त जाऊ नये, सुधारणावादी महिलांना यामुळे सासरी अथवा काही प्रमाणात माहेरी देखील त्रास सहन करावा लागत होता. शिक्षण देखील मुलांनाच जास्त दिले जात होते, अशा पूर्वीच्या काळातल्या विविध गोष्टींचा उल्लेख आता करायची गरज वाटत नाही, त्या जगजाहीर आहेतच. परंतु आता काळ बदललाय, जग खूपच जवळ आलं आहे. घरी बसून केवळ स्वयंपाक करणार्‍या महिलांचे हात आता विविध क्षेत्रात आपले करियर करताहेत. आज भारतासारख्या भावी महासत्ता म्हणून पाहिल्या जाणार्‍या देशाची धुरा देखील एक महिलाच सांभाळते आहे. शिक्षण-प्रशिक्षण आणि चालना यामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांचा विकास झाला असून या यशामागे पुरुषांबरोबर महिलांचाही मोठा वाटा आहे. अनेक देश आता सैन्यातही महिलांच्या पथकांचा समावेश करण्यास धजावले आहेत. लोहमार्गावर रेल्वे चालकापासून वैमानिकाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळण्याच्या कार्याची भरारी महिलांनी मारली आहे. एकंदर सर्वच बाबतीत महिला अग्रेसर आहेत. मुलांनी मुलांशी आणि मुलींनी मुलींशी फक्त मैत्री करावी, हे विचार आता मागे पडले असून सध्याइंटरनेटच्या काळात मुलं अथवा मुली यांच्यात अंतर फारसे राहिलेले नाही.
मुलं आणि मुलींची मैत्री नाही असे आता अजिबात दिसत नाही. अगदी स्वच्छंदी, निखळ मैत्री या दोघांमध्ये असल्याचे अनेकदा दिसते (काही ठिकाणी विकृतीमुळे अपवादात्मक एकतर्फी काही गोष्टी घडतात, हे वेगळे).
काळ बदलल्याप्रमाणे जुन्या पिढीने सुद्धा हे बदल स्वीकारले असल्याचा हा परिणाम असावा...। जुनी पिढी म्हटली म्हणजे कडक स्वभाव, तिखट, मुलांना नेहमीच डोस देणारी, रागावणारी...वडिलांना तर 'हिटलर' या भावनेनेच पाहण्याकडे मुलांचा जास्त कल असतो, होता। घरात आई-वडिल, ताई-दादा, आजोबा-आजी कोणीही रागावले की मित्राकडे जाऊन किंवा मित्राला हे सर्व सांगून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हळूच डोळ्यात साचलेल्या आसवांना वाट मोकळी करून दिल्यानंतर मोठ्ठ दडपण कमी झाल्यासारखं पूर्वी वाटत होतं. पण आजकाल इतकं मोठं कुटुंब सुद्धा दिसत नाही, असलं तरी आता हे सर्व दृश्य बदललं असून आज वडिल सुद्धा मुलांशी मित्राच्या नात्याने वागताना दिसतात. आपले बाबा कामावरून घरी परत केव्हा येतात याची वाट आजकाल मुलं पाहतात.
दिवसेंदिवस महागाई सातत्यानेच वाढत असून मुलंही लवकर समजुतदार होत असून, आपल्या पालकांना आपणही काहीतरी हातभार लावावा आणि घर चालवण्यात खारीचा वाटा उचलावा, या उद्देशाने अनेक मुलं-मुली earn and learn अर्थातच शिक्षणाबरोबरच काहीतरी छोटे-मोठे काम करून पैसे मिळवतात. इंटरनेटमुळे तर या गोष्टी सहज शक्य झाल्या आहेत. कामानिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे ताटातुट झालेली बहिणभावंडं इंटरनेटच्या माध्यमातून वेबकॅम, चॅटिंगच्या द्वारे दररोज एकमेकांच्या संपर्कात असतात. हो, एक मात्र आहे. ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर, जी-टॉक मेसेंजर याद्वारे गुगल (सर्च इंजिन), याहू, सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यासाठी खातं (ईमेल-आयडी) उघडावं लागतं हे सांगायला नकोच...। खातं या शब्दाऐवजी अकाउंट हा शब्दप्रयोग सर्वांच्या दृष्टीने सोयीस्कर वाटतो...। असं अकाउंट उघडताना ज्यांना आपल्याशी बोलण्यासाठी आमंत्रित करायचं असेल त्यांचं अकाउंट देखील आपल्या अकाउंटशी जोडणं सक्तीचं आहे. यासाठी फ्रेंड्स-अकाउंट, फ्रेंड्स ची नावं Friends Name, Friends Address, Friend List असे छानसे शब्द वापरले जातात..बहिण असो अथवा भाऊ असो..यांनाही फ्रेंड च्या यादीमध्येच जोडावं लागतं.
"फ्रेंड" या शब्दामुळे दूर गेलेली मित्रमंडळी, बहिण-भाऊ, भावंडं खरंच अगदी क्षणात जवळ येतात, कामावरचं टेन्शन असो, की घरचं टेन्शन असो, दोघेही एकमेकांना सांगून मनं मोकळी करतात. मनात काही न साचल्यामुळे थोड्या वेळाने पुन्हा फ्रेश मुडमध्ये कामास सुरवात करू शकतात. फ्रेंड..friend..या शब्दाची फोड आपण free-end..म्हणजेच अगदी न कळत कोणत्याही तणावाचा शेवट...असा इथे समजणे वावगे ठरणार नाही।

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012