शुक्रवार, २५ मार्च, २०११

संकटांना घाबरू नका, त्यावर मात करायला शिका: सिंधुताई सपकाळ

अंधार झाल्याशिवाय पहाट उगवतच नसते म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात एक अंधार येत असतो, एक रात्र येते अंधारी त्याचं नाव संकट असतं, पण आता बायानो तुम्हाला सांगते, जर तुमच्यावर संकट कोसळलं तर त्यावर पाय देऊन उभं राहिला शिका. संकटाची उंची तुमच्यापेक्षाही कमी होईल म्हणून संकटाला घाबरू नका, मरू नका, डरू नसा त्यावर स्वार व्हायला शिका आणि संकट त्याच्यावरच येतात जो सहन करू शकतो. असे मनोगत सिंधुताई सपकाळ यांनी सिडको भवनमध्ये आयोजित, शंभराव्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, समारंभात व्यक्त केले. सिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील अध्यक्षस्थानी होते.
सिंधुताई सपकाळ यांनी श्रोत्यांना हासू व आसू यांच्या हिंदोळ्यावर सर्वांना खिळवून ठेवत, स्त्री हीच सर्वांना सावरणारा स्तंभ असतो हे स्पष्ट करून स्त्रीची तुलना सायकलच्या मागच्या चाकाशी केली. कारण पुढचं चाक स्त्री-पुरुषाच्या हाती देते. कारण मागच्या चाकावर पूर्ण प्रवास अवलंबून असतो हे ती जाणते. कुटुंबाच्या जबाबदार्‍या सांगताना त्यात सायकलला गती देणारी चेन, ओझे सावरणारी कॅरियर, प्रकाश दाखविणारा डायनामो तसेच आधार देणारे स्टँड अशा अनंत पातळ्यांवरच्या जबाबदार्‍या सायकलच्या मागच्या चाकाप्रमाणे स्त्रीच सांभाळू शकते.
आजवर आपल्याला आधी भाषण करावं लागलं नंतरच मदतनिधी दिला गेला, परंतू सिडकोच्या लेकरांनी मात्र भाषणाच्या आधीच मदतनिधी दिल्याचे गौरवोदगार सिंधुताईंनी काढले. कार्यक्रमास पुष्पलता पाटील, अनुराधा सत्रे यांच्यासह सिडको कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निलेश तांडेल, सरचिटणीस मिलिंद बागूल, मुख्य सामाजिक सेवा अधिकारी रीमा दीक्षित तसेच वरिष्ठ संख्यातज्ज्ञ रीटा अब्बी आदी मान्यवर उपस्थित होते.

गुरुवार, २४ मार्च, २०११

भारतीय संघ विजयाच्या रंगात रंगलाः रंगपंचमीचा पंच



गुरुवारी (ता. 24 मार्च) अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघात अक्षरशः करो या मरो..प्रमाणे जबरदस्त चुरशीच्या ठरलेल्या विश्वचषक सामन्यात अखेर भारतीय संघाच्या संयमी खेळीने संघाने देशातील नागरिकांना रंगपचमीनिमित्त विजयाची भेट दिली. काही षटकांमुळे श्वास रोखलेल्या प्रेक्षकांना आणि इलेक्ट्रॉनिक वाहिनीवर हा सामना पाहणाऱ्यांचे श्वास रोखून धरले होते. परंतू युवराज सिंग आणि सुरेश रैना हे दोघेही विजयाचे शिल्पकार ठरले. युवराजसिंग याला सामनावीर घोषित करण्यात आले. प्रेक्षकांना अपेक्षित यश मिळवून देऊन कांगारूंच्या संघाला रंगपंचमीचा पंच मारून हम भी कुछ कम नही...हे दाखवून दिले. पाच गडी आणि 14 चेंडू राखून भारताने कांगारूंवर विजय मिळवला.


रंगपंचमी जणू काही दिवाळी...

आजच्या महत्वपूर्ण सामन्याची विजयीपताका रोवण्यासाठी पंधरा धावांची आवश्यकता असतानाच भारताने विजय मिळवल्यासारखेच चित्र स्पष्ट झाल्यामुळे देशातील अनेक शहरांमध्ये आतषबाजी करण्यात आली. सामना संपल्यानंतर बराच वेळ ठिकठिकाणी आतषबाजी सुरूच होती, जणूकाही दिवाळीच साजरी करण्यात येत असल्याचा भास होत होता. विश्वचषकाचा गतविजेता आणि यंदाही प्रबळ दावेदार म्हणून ज्या संघाकडे पाहिले जात होते अशा ऑस्ट्रेलिया संघाला आता बाहेर जावे लागल्यामुळे यंदाच्या विश्वचषकाचा दावेदार म्हणून भारताकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान मोहाली येथे उपांत्यफेरी खेळली जाणार असून भारतीय संघावर या सामन्यात बराच दबाव असेल अशी प्रतिक्रिया क्रणधार महेंद्रसिंग धोनी यांनी व्यक्त केली.

रंग-पंच-मी...



देशात साजरे केल्या जाणाऱ्या विविध सण-वार, उत्सव, महोत्सवांचे स्वरूप गेल्या दशकात बदलत आहे. वर्षानुवर्ष असलेली बंधने आता बंधनातून मुक्त होऊन स्वच्छंदी विहार करत आहेत. मर्यादा सुद्धा अमर्यादपणे अथांग वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहापणे वहात आहेत हे चित्र तर गेल्या पाच वर्षात स्पष्ट झालेच आहे. परिणामी महिला देखील पुरुषांप्रमाणेच कुटुंबाला हातभार लावण्यासाठी घराबाहेर पडल्या आहेत. स्त्री-पुरुष भेद हे अंतर बव्हंशी कमी झाले असून कामानिमित्त महिला देखील अहोरात्र पुरुषांप्रमाणेच रस्त्याने येताजाताना दिसत आहेत. इतकेच नव्हे, तर आजकालच्या नवीन ट्रेंडनुसार होळी, धूळवड, रंगपंचमी अशा सणवार, उत्सवांना मोठ्या संख्येने महिला सुद्धा मित्र-मैत्रीणींकडे धूळवड, रंग खेळण्यासाठी थाटामाटात जाताना दिसतात. परंतु विविध रंगांनी रंगलेले चेहरे धुण्यासाठी मात्र बरीच मेहनत घ्यावी लागते. रंग तयार करताना करण्यात आलेले रसायनाचे मिश्रण किंवा अबीराऐवजी पेन्ट्स चा वाढलेला वापर हे याचे कारण आहे. रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनचालकांवर, पादचाऱ्यांवर सर्रासपणे पाण्याने भरलेले, रंगांनी भरलेले फुगे फेकल्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात होणे, या घटना सुद्धा वाढल्या आहेत. एकमेकांना रंग लावताना अर्थातच रंग पंच करताना, रंगाने भरलेले फुगे पथिकांवर फेकताना पुरेशी काळजी घेऊन जीवितहानी होणार नाही याची काळजी घ्यावी, हीच अपेक्षा. मात्र रंगांची उधळण कमी न करता नैसर्गिक रंगांची नवरंगी उधळण करून जल्लोषात सर्व गोष्टी घडतील हाच विश्वास...!

बुधवार, २३ मार्च, २०११

राज्यातील सर्व घटकांना सामावून घेणारा, समन्यायी अर्थसंकल्प- छगन भुजबळ

मुंबई, दि. 23 मार्च : राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागाला समान न्याय तसेच समाजातील सर्व घटकांना विकासाची समान संधी देणारा असा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम तथा पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सन 2011-12 चा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला. त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे की, अर्थसंकल्पात राज्यातील सर्व घटकांच्या विकासाचे सूतोवाच करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी तीन लाखांपर्यंत शून्य ते 2 टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेतानाच कृषी संजीवनी योजनेची घोषणाही स्तुत्य आहे. दोन लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा निर्धार करून त्या दृष्टीने पाटबंधारे विभागासाठी सुमारे 6300 कोटी तर जवाहर विहीर योजनेसाठी 221 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. फलोत्पादन वृध्दी, निर्यात केंद्रे, फार्म पॅक हाऊसिंग या बरोबरच सिंचन प्रकल्प, महाराष्ट्र सुजल योजना, रोजगार हमी योजना यांच्यासाठी भरीव तरतूद करून राज्यातील शेतकरी व कष्टकरी वर्गाला न्याय दिला आहे. प्राथमिक आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणासाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. सन 2012 अखेरपर्यंत राज्य भारनियमनमुक्त करण्याच्या दिशेनेही अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूद समाधानकारक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्याचा रस्ते विकास आणि गडकिल्ले विकासासाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीचे स्वागत करून श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे की, रस्तेविकासासाठी 2750 कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातून 1075 किलोमीटर रस्तेविकासाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. गडकिल्ल्यांच्या विकासासाठी विशेषत: सिंधुदुर्ग, विजयदुर्गसाठी विशेष तरतूद त्याचप्रमाणे सिंहगड, रायगड, शिवनेरी, प्रतापगड याठिकाणी दृकश्राव्य प्रयोगासह पर्यटकांसाठी विविध सुविधा विकसित करण्यासाठी केलेली तरतूदही राज्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील मागासवर्गीय तसेच अल्पसंख्य समाजाच्या विकासासाठीही अर्थसंकल्पात उपयुक्त अशी तरतूद केली आहे. राज्यातील अनुसूचित जाती- जमातींसाठी तसेच आदिवासी उपयोजनेअंतर्गत वित्तमंत्र्यांनी भरीव तरतूद केली आहे. वित्तमंत्र्यांनी अल्पसंख्याक समाजातील गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेली मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनाही अत्यंत स्वागतार्ह असल्याचेही श्री. भुजबळ यांनी नमूद केले आहे.

हेमराज शहा म्हणजे मराठी व गुजराथी बांधवांना जोडणारा दुवा - छगन भुजबळ


मुंबई दि. 23 मार्च : गेली 45 वर्षे समाजकारण, राजकारण, लेखन, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रात अखंडपणे कार्य करीत असलेले हेमराज शहा म्हणजे मराठी व गुजराथी बांधवांना जोडणारा दुवा आहेत, अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी बृहद्मुंबई गुजराथी समाजाचे अध्यक्ष हेमराज शहा यांचे काल अभीष्टचिंतन केले.
हेमराज शहा यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार समितीच्या वतीने येथील बिर्ला क्रीडा मंडळाच्या सभागृहात आयोजिलेल्या समारंभात भुजबळ बोलत होते. ते म्हणाले की, प्रसन्न आणि हसतमुख असलेल्या हेमराज शहा यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. गुजराथी समाजातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) समजल्या गेलेल्या अनेक जाती जमातींचा शासनाच्या या बाबतच्या यादीत समावेश करण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. जवळपास 26 पुस्तके लिहून तसेच गुजराथी वृत्तपत्रांमध्ये अनेक वर्षे स्तंभ लेखन करून आपण एक उत्तम पत्रकार व लेखक असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. कच्छी समाजातील कर्तृत्ववान व्यक्तिंना ते सातत्याने प्रोत्साहन देत आहेत. गुजराथी बांधवांना एकत्र येण्यासाठी त्यांनी निर्माण केलेल्या संस्थेच्या माध्यमातून गेली 26 वर्षे ते कार्य करीत आहे. निरपेक्ष व नि:स्वार्थ भावनेने अव्याहत कार्य करीत राहिलेला ज्येष्ठ समाजसेवक, अशा शब्दात हेमराज शहा यांचा गौरव करून भुजबळांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी यावेळी आपल्या भाषणात, मुंबईतील मराठी व गुजराथी बांधवांमध्ये बंधुत्वाची भावना वाढविण्यासाठी सातत्याने कार्य करीत असलेल्या हेमराज शहांना राज्याच्या राजकारणात महत्वाचे पद मिळावे यासाठी आमची सर्व ताकद त्यांच्या मागे उभी करू, असे सांगितले.
विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी, काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई, मुंबई समाचारच्या संपादक श्रीमती पिंकी दलाल, जन्मभूमिचे संपादक कुंदन व्यास, कवी सुरेश दलाल आदी मान्यवरांनी यावेळी आपल्या भाषणात हेमराज शहा यांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलूंचा वेध घेतला.
सत्काराला उत्तर देताना हेमराज शहा म्हणाले की, वयाच्या सत्तरीत प्रवेश करताना मला आता कोणत्याच मोठया पदाची अपेक्षा नाही. मी माझे अंगीकृत कार्य यापुढेही निरलसपणे करीत राहणार आहे. महाराष्ट्रात विखुरलेल्या गुजराथी बांधवांचे प्रश्न व समस्या समजून घेण्यासाठी येत्या मे महिन्यात एक मोठे अधिवेशन घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आजपर्यंतच्या आपल्या वाटचालीत गुजराथी बांधव, पत्रकार, प्रकाशक, लेखक इत्यादी अनेकांचे खूप सहकार्य लाभले असल्याचेही त्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.
या अभीष्टचिंतन सोहळयास विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. श्री. अंकित त्रिवेदी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

सोमवार, २१ मार्च, २०११

black money..सोने की चिड़िया

Few days ago (Friday: 18-03-2011 on Sanskaar Channel), there was a telecast of Lt. honble Rajeev Dixit, saying that the Indian Black Money deposted in World Bank comprises 380 Lakh Crore. If this amount is brought to India, It is such a huge amount that we can distribute 10 Kg. gold to each family of India with this and this way we can again become "Sone ki Chidiya" or "Sone ka Sher". He further added that this can be possible by 3 ways-
1. If Indian Govt. signs UN's "Treaty Against Curruption (TAC) for which UN itself has appealed to India many a times earlier.
2. Indian Govt enacts a law to this effect.
3. Supreme Court directs Indian Govt to do so (recently supreme court has issued guideline to form a panel in this regard)


It should be noted that even after distributing 10 kg gold, we would be in position to pay off our whole debts and will be in a position to lend to the world bank and other countries of strategic importance. This way we can press China and Pakistan to return our land and keep on lower end.

Dear All, Please send your valuable Comments. [only click below on "post a comment"]

कोकणच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील: भुजबळ

मुंबई, दि. 21 मार्च : कोकणच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी आपले ठोस प्रयत्न सुरू असून येत्या वर्षभरात पर्यटन विकासाची जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्यात येतील, असे राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले.
विधान परिषद सदस्य सर्वश्री राजन तेली, संजय दत्त, भाई जगताप, परशुराम उपरकर, रामदास कदम, डॉ. दीपक सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल श्री. भुजबळ बोलत होते.
श्री. भुजबळ यांनी यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणच्या पर्यटन विकासासाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीची माहिती दिली. ते म्हणाले, केंद्र शासनाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोकण रिव्हिएरा सर्किट अंतर्गत सर्किट-1, सर्किट-2 व सर्किट-3 साठी अनुक्रमे 3 कोटी 2 लाख रुपये, 2 कोटी 88 लाख 54 हजार रुपये व 1 कोटी 34 लाख 42 हजार रुपयांचा निधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास प्राप्त झाला. हा सुमारे 8 कोटी रुपयांचा निधी पूर्ण खर्च झाला असून त्याअंतर्गत हाती घेण्यात आलेली कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या माध्यमातून विजयदुर्ग येथील निवास व्यवस्था, उपाहारगृह, वाहनतळ व जलक्रीडा इत्यादी कामांचा समावेश आहे. या सुविधा खाजगीकरणाद्वारे सुरू करण्याची कार्यवाही सुरू आहे. सिंधुदुर्ग येथे पर्यटकांसाठी मालवण जेट्टीचे बांधकाम व मजबुतीकरणही करण्यात आले. त्याचबरोबर दिवेआगार, उभादांडा येथे रॉयल टेंट तसेच धामापूर व आंबोली येथे पर्यटक निवासांची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत.
कोकण विकास पॅकेज अंतर्गत राज्य शासनाकडून सन 2004मध्ये 3 कोटी 60 लाख रुपये वितरित करण्यात आले. हा निधीसुध्दा खर्च होऊन त्याअंतर्गत निर्धारित कामेही पूर्ण करण्यात आल्याची माहितीही भुजबळ त्यांनी दिली.
12व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार रायगड जिल्ह्यासाठी 24 कोटी 80 लाख रुपये, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 52 कोटी 57 लाख रुपये, ठाणे जिल्ह्यासाठी 18 कोटी 89 लाख रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 82 कोटी 99 लाख रुपये तर मुंबईसाठी 45 कोटी 73 लाख रुपये असा सुमारे 225 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर करून महाराष्ट्र पर्यटन महामंडळास वितरित केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीच्या निधीतून तारकर्ली येथे धूप प्रतिबंधक बंधारा व स्कुबा डायव्हिंग केंद्र आणि कुणकेश्वरसाठी 5 कोटी 70 लाख रुपये खर्चाची कामे प्रगतीपथावर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्य पर्यटन विकासाच्या कामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना 9 कोटी 25 लाख 45 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचे श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सन 1999मध्ये स्थापन करण्यात आलेले सिंधुदुर्ग पर्यटन विकास महामंडळ हे विविध कारणांमुळे स्थापनेपासूनच कार्यरत नसल्याने ते सध्याच्या कंपनी कायद्याअंतर्गत इझी एक्झिट स्कीम-2011अंतर्गत बंद करण्याची प्रक्रिया चालू आहे. त्याचप्रमाणे सागरी क्षेत्र पर्यटन विकास महामंडळ हे कंपनी कायद्याअंतर्गत स्थापन करण्याची प्रक्रिया सुध्दा सुरू असल्याची माहितीही श्री. भुजबळ यांनी यावेळी दिली.

* गुहागरमध्ये पर्यटक सुविधा विकसित करताना स्थानिक लोकप्रतिनिधींची मतेही विचारात घेणार

12व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सागरी किनारा पर्यटन विकास महामंडळास वितरित करण्यात आलेल्या निधीतून सुधारित कामांना मंजुरी देण्यात आली असून यापैकी 6 कोटी रुपयांच्या निधीतून गुहागर येथे पर्यटक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी तसेच सर्व संबंधित अधिकारी यांची मते विचारात घेऊनच या सुविधा निर्माण करण्यात येतील, असे राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले.
सर्वश्री हेमंत टकले, विक्रम काळे, सतीश चव्हाण, रमेश शेंडगे, प्रकाश बिनसाळे, श्रीमती उषाताई दराडे या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते बोलत होते.
श्री. भुजबळ म्हणाले, 12व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्याची विशेष गरज याअंतर्गत सागरी किनारा पर्यटन विकासासाठी राज्य शासनाला सन 2006-07 ते सन 2007-08 या दोन वर्षांत अनुक्रमे 62.50 कोटी व 57.50 कोटी रुपये तर सन 2009-10मध्ये 105 कोटी रुपये असे एकूण 225 कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले. ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास वितरित करण्यात आले. तथापि, या कामांची अंमलबजावणी करताना जागेची उपलब्धता, वन विभागाच्या अडचणी, सी.आर.झेड. निर्बंध इत्यादी कारणांमुळे मंजूर करण्यात आलेली कामे हाती घेण्यात आली नाहीत. त्यामुळे हा निधी खर्च होऊ शकला नाही. परंतु, आता या निधीचे फेरआढावा घेऊन नियोजन करण्याबाबत मी स्वत: बैठका घेतलेल्या आहेत. त्यानुसार या वर्षात केंद्राकडून आलेला निधी अजिबात अखर्चित न राहाता त्याचा पूर्णत: विनियोग करण्यात येईल. गुहागरसाठी राखून ठेवलेल्या 6 कोटी रुपयांचा विनियोगही संबंधितांशी सल्लामसलत करून योग्य त्या सुविधांवर खर्च करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गणपतीपुळे, तारकर्ली किनार्‍यांवर जीवरक्षक उपक्रम लवकरच

मुंबई, - मुंबईसह राज्याच्या समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याला शासनाचे नेहमीच प्राधान्य असून गणपतीपुळे व तारकर्ली किनार्‍यांवर जीवरक्षक उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्याचा विचार निश्चितपणे केला जाईल. असे राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
ऑस्ट्रेलिया येथील शुअर लाइफ सेव्हिंग या संस्थेचे प्रमुख श्री. नॉर्मन फार्मर यांच्यासह राष्ट्रीय लाइफ सेव्हिंग सोसायटीचे प्रमुख पी. डी. शर्मा, युवराज चंदेशा आणि जूहू येथील सी गार्डियन लाइफगार्ड या संस्थेचे सुनिल कनोजिया यांनी भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी श्री. भुजबळ बोलत होते.
अशासकीय संस्था (एनजीओ) असलेल्या या संस्थांनी संयुक्तपणे राज्याच्या समुद्रकिनार्‍यांवर लाइफगार्ड सुविधा उपलब्ध करण्याचा आपला मानस असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले. जुहू येथील सी गार्डियन लाइफगार्ड संस्थेतर्फे कोणत्याही आर्थिक लाभाशिवाय लाइफ-सेव्हिंग उपक्रम व्यवस्थितरित्या चालविण्यात येत असल्याची माहितीही त्यांना देण्यात आली.
ते म्हणाले, की समुद्रकिनार्‍यांवर लाइफसेव्हिंग सुविधा आम्हाला विकसित करावयाचीच आहे. त्यादृष्टीने या संस्थांच्या प्रतिनिधींनी आमच्या गणपतीपुळे आणि तारकर्ली किनार्‍यांची पाहणी करावी. तेथे कोणकोणत्या पायाभूत सुविधा आवश्यक आहेत, कोणती साधने आपल्याला लागतील, कोणत्या सुविधा विकसित करण्यात येतील, किनारे स्वच्छ व सुंदर ठेवण्याबरोबरच त्यांची निगा कशी राखणार, लागणारा निधी व त्याचा विनियोग यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव सादर करण्याची सूचना भुजबळ यांनी केली. तसेच स्थानिक नागरिकांनाच लाइफ सेव्हर म्हणून प्रशिक्षित करून आपल्या कामात सहभागी करण्याची सूचनाही केली. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर उपस्थित होते



होळीनिमित्त जनतेला उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुंबई, - होळीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यानी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. रंगांची उधळण करत आपल आनंद द्विगुणित करताना दुसर्‍यांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन तसेच पर्यावरणाची हानी न पोहोचवता होळी, धूळवड व रंगपंचमी साजरी करावी, असे आवाहन केले आहे.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...