मुख्य सामग्रीवर वगळा

आदर्श जमीनदोस्त करणे म्हणजे सर्वच नष्ट...

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदर्श गृहनिर्माण संस्था प्रकरणी वादाच्या भोवर्‍यात सापडून त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देणे भाग पडले होते. यानंतर आदर्श प्रकरण संसद व विधानसभेच्या सत्रात चांगलेच गाजले होते. फाईल गहाळ होणे, विविध प्रकरणांची चौकशी लागणे आदी घडामोडींनंतर आता आदर्शची इमारतच जमीनदोस्त करण्याचा निर्णय पर्यावरण मंत्रालयाने दिला आहे. तीन महिन्यात ही इमारत जमीनदोस्त करण्यात येणार आहे. प्रकरण काँग्रेसवर चांगलेच शेकले जात असल्याचे तज्ज्ञांचे मत असून इमारत जमीनदोस्त करणे म्हणजे संपूर्ण प्रकरणावरच पडदा टाकून जनतेला शांत करण्यासारखे असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012