रविवार, ५ फेब्रुवारी, २०१२
युवराज सिंग याला कॅन्सर...
नवी दिल्ली, वृत्तसंस्था - युवराज सिंग याला कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले आहे. त्याच्यावर अमेरिकेत उपचार सुरू आहेत.
भारताचा ज्येष्ठ फलंदाज युवराज सिंग याला कॅन्सर झाला असून तो अजून पहिल्या चरणातच असून यामुळे घाबरून जाण्यासारखी स्थिती नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये त्याच्या डाव्या फुप्फुसात ट्यूमर असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तथापि परिस्थिती फारशी गंभीर नसल्याचे देखील सांगण्यात आले. मात्र अष्टपैलू युवराज याला वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धचे पाच कसोटी सामने आणि एक दिवसीय मालिकेस मुकावे लागले. त्याच्यावर अमेरिकेत सध्या केमोथेरपि सुरू आहे. दरम्यान, काही बातम्यांमध्ये युवराज अमेरिकेस शस्त्रक्रियेसाठी गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. परंतु 1 फेब्रुवारीला युवराजने ट्विटरवर, आपण कोणतीही शस्त्रक्रिया केली नसल्याचे ट्विट केले होते. विश्वचषकापासूनच युवराज याच्या प्रकृती स्वास्थ्याविषयी तक्रारी सुरू झाल्या होत्या. यानंतर तो केवळ इंग्लंडविरुद्ध एक कसोटी सामनाच खेळू शकला होता.
भारताचा ज्येष्ठ फलंदाज युवराज सिंग याला कॅन्सर झाला असून तो अजून पहिल्या चरणातच असून यामुळे घाबरून जाण्यासारखी स्थिती नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये त्याच्या डाव्या फुप्फुसात ट्यूमर असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तथापि परिस्थिती फारशी गंभीर नसल्याचे देखील सांगण्यात आले. मात्र अष्टपैलू युवराज याला वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धचे पाच कसोटी सामने आणि एक दिवसीय मालिकेस मुकावे लागले. त्याच्यावर अमेरिकेत सध्या केमोथेरपि सुरू आहे. दरम्यान, काही बातम्यांमध्ये युवराज अमेरिकेस शस्त्रक्रियेसाठी गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. परंतु 1 फेब्रुवारीला युवराजने ट्विटरवर, आपण कोणतीही शस्त्रक्रिया केली नसल्याचे ट्विट केले होते. विश्वचषकापासूनच युवराज याच्या प्रकृती स्वास्थ्याविषयी तक्रारी सुरू झाल्या होत्या. यानंतर तो केवळ इंग्लंडविरुद्ध एक कसोटी सामनाच खेळू शकला होता.
शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१२
गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१२
सिडको प्रदर्शन संकुलाचे विकासकार्य प्रगतीपथावर
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भविष्यात येथे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळे सहाय्यभूत व्यवसायांना चालना आणि रोजगार निर्मिती होऊन शहराच्या लौकिकात भर पडेल असे मत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी व्यक्त केले. येथील प्रदर्शन संकुल, पामबिच मार्गाच्या विस्तारातत समाविष्ट उड्डाण पूल आणि आंतरराष्ट्रीय राजदूतावास प्रकल्पांच्या विकास कामांची त्यांनी पाहणी केली. यावेळी मुख्य अभियंता केशव वरखेडकर, प्रकल्पांवर नियुक्त स्थापत्य, विद्युत, वास्तुशास्त्र विभागातील अभियंते व अधिकारी, वास्तुतज्ज्ञ सल्लागार, कंत्राटदार, यासह काही कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रदर्शन संकुलाचा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून येथील सर्व स्थापत्य, विद्युत, वातानुकूलन, अंतर्गत सजावट या कामांच्या विकास प्रक्रियांमध्ये समाविष्ट सर्व साहित्य उत्तम प्रतीचे असावे, यात कोणतीही तडजोड करण्यात येऊ नये, मूळ काम उच्च दर्जाचे झाल्यास देखभाल दुरुस्तीवरील खर्च आटोक्यात ठेवता येऊ शकेल आणि चांगला दर्जा राखून नवीन उदाहरण सिद्ध करता येईल यासाठी प्रयत्न करावे. अशा सूचना सत्रे यांनी केल्या.
महाराष्ट्राची दुसरी आर्थिक राजधानी होण्याकडे नवी मुंबई वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर या प्रदर्शन संकूलाची निर्मिती होत आहे. वाशी, सेक्टर- 30 ए, येथील 7.4 हेक्टर क्षेत्रावरील प्रदर्शन संकूलामुळे वाणिज्यिक व औद्योगिक जगताला आपल्या उत्पादनांच्या प्रदर्शनासाठी दर्जेदार प्रदर्शन सुविधा उपलब्ध होतील. LEED च्या ग्रीन बिल्डिंग मानकानुसार विकास करण्यात येत असलेल्या एकूण पाच लक्ष चौरसफूट क्षेत्रफळाच्या या प्रदर्शन संकूलात दोन भव्य प्रदर्शन दालने, सार्वजनिक सभागृह आणि मध्यवर्ती सभागृहाचा समावेश तसेच, नाट्यगृह, परिषद कक्ष, प्लाझा, खुले प्रेक्षागृह, मेजवानी सभागृह, सहाय्यभूत गृहसमुदाय तसेच प्रशासन, फुडकोर्ट, वाचनालय आणि संमेलनस्थळ यांचा समावेश आहे.
प्रदर्शन संकुलाचा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून येथील सर्व स्थापत्य, विद्युत, वातानुकूलन, अंतर्गत सजावट या कामांच्या विकास प्रक्रियांमध्ये समाविष्ट सर्व साहित्य उत्तम प्रतीचे असावे, यात कोणतीही तडजोड करण्यात येऊ नये, मूळ काम उच्च दर्जाचे झाल्यास देखभाल दुरुस्तीवरील खर्च आटोक्यात ठेवता येऊ शकेल आणि चांगला दर्जा राखून नवीन उदाहरण सिद्ध करता येईल यासाठी प्रयत्न करावे. अशा सूचना सत्रे यांनी केल्या.
महाराष्ट्राची दुसरी आर्थिक राजधानी होण्याकडे नवी मुंबई वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर या प्रदर्शन संकूलाची निर्मिती होत आहे. वाशी, सेक्टर- 30 ए, येथील 7.4 हेक्टर क्षेत्रावरील प्रदर्शन संकूलामुळे वाणिज्यिक व औद्योगिक जगताला आपल्या उत्पादनांच्या प्रदर्शनासाठी दर्जेदार प्रदर्शन सुविधा उपलब्ध होतील. LEED च्या ग्रीन बिल्डिंग मानकानुसार विकास करण्यात येत असलेल्या एकूण पाच लक्ष चौरसफूट क्षेत्रफळाच्या या प्रदर्शन संकूलात दोन भव्य प्रदर्शन दालने, सार्वजनिक सभागृह आणि मध्यवर्ती सभागृहाचा समावेश तसेच, नाट्यगृह, परिषद कक्ष, प्लाझा, खुले प्रेक्षागृह, मेजवानी सभागृह, सहाय्यभूत गृहसमुदाय तसेच प्रशासन, फुडकोर्ट, वाचनालय आणि संमेलनस्थळ यांचा समावेश आहे.
NAVI MUMBAI SANMAN FESTIVAL, AIROLI FROM 05th FEBRUARY 2012 AT AIROLI, CELEBRITIES LINED UP FOR THE SHOW
Film stars Sonu Sood, Vindu Dara Singh, Nishigandha Wad, Mukesh Rishi, Pankaj Dheer among others are roped in to entertain the crowd at the much-awaited 8 days long Navi Mumbai Sanman Festival, scheduled to be held at Chinchwali Ground, Sector - 05, Airoli, Navi Mumbai from 05th February 2012 at 05.00 P.M. onwards till 10.00 P. M.. The show will continue till 12th February 2012 from 07.00 P. M. to 10.00 P. M.
For the 2nd Edition, City-based Socio-Cultural Organization Sanman Pratisthan, Airoli is bringing these celebrities to this part of the town to treat an expected crowd of over one lakh at a stretch of eight days. The festival will take off on 05th February 2012 at the hands of local MLA Shri Sandeep Naik in the presence of dignitaries from various spheres of life. Entering into second year the show is getting bigger and better.
“We have meticulously planned something or the other for everyone cutting across caste affiliations to showcase their talents and skills. Stalls will have traditional food stuffs of Agri-Koli community among other ethnic groups. Everything is offered under one roof. There will be entertainment, sports, cultural activities, felicitations, talk show, dance, drama, singing, laughter challenge,” said Shri G S Patil, Chief Organizer of the festival and president of Sanman Pratisthan, Airoli.
The day one will have grand parade and lezim by School Children of Airoli node besides being Punjab’s much acclaimed “Bhangra and Giddha” dance forms followed by Sikh martial arts (Gatka) demonstration. Satyapal Maharaj of Akola will guide the audience on the day two. The day three will witness group folk dance competition amongst various schools.
For the 2nd Edition, City-based Socio-Cultural Organization Sanman Pratisthan, Airoli is bringing these celebrities to this part of the town to treat an expected crowd of over one lakh at a stretch of eight days. The festival will take off on 05th February 2012 at the hands of local MLA Shri Sandeep Naik in the presence of dignitaries from various spheres of life. Entering into second year the show is getting bigger and better.
“We have meticulously planned something or the other for everyone cutting across caste affiliations to showcase their talents and skills. Stalls will have traditional food stuffs of Agri-Koli community among other ethnic groups. Everything is offered under one roof. There will be entertainment, sports, cultural activities, felicitations, talk show, dance, drama, singing, laughter challenge,” said Shri G S Patil, Chief Organizer of the festival and president of Sanman Pratisthan, Airoli.
The day one will have grand parade and lezim by School Children of Airoli node besides being Punjab’s much acclaimed “Bhangra and Giddha” dance forms followed by Sikh martial arts (Gatka) demonstration. Satyapal Maharaj of Akola will guide the audience on the day two. The day three will witness group folk dance competition amongst various schools.
जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिकांची मतमोजणी एकाच दिवशी: नीला सत्यनारायण
मुंबई, ता. 2 - राज्य निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्षांची मागणी लक्षात घेऊन जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महानगरपालिकांची मतमोजणी एकाच दिवशी 17 फेब्रुवारी 2012 रोजी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
येथील सचिवालाय जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले की, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होईल. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची मतमोजणी 17 फेब्रुवारीला होईल. एकत्रित मतमोजणीच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 1 लाख 81 हजार यंत्रांची व्यवस्था केली आहे. यात भारत निवडणूक आयोगाच्या 1 लाख 30 हजार, इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (ईसीआयएल) मागवलेली 24 हजार आणि राज्य निवडणूक आयोगाकडील सुमारे 27 हजार मतदान यंत्रांचा समावेश आहे. भारत निवडणूक आयोगाच्या यंत्राचा उपयोग पुणे, नागपूर जिल्हा परिषद वगळून अन्य सर्व जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मतदान यंत्रांचा वापर केला जाणार आहे. दहा महानगरपालिकांसाठी इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची यंत्रे वापरण्यात येणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाकडून 1 लाख 30 हजार मतदान यंत्रे मागविली आहेत. यापेक्षा अधिक मतदानयंत्रे उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने कळवले होते. तसेच यापैकी सुमारे 5 टक्के मतदानयंत्रे सुस्थितीत नसल्याचे आढळून आले. यंत्रांची जुळवाजुळव करण्याच्या प्रक्रियेमुळे एकत्रित मतमोजणीचा निर्णय घेण्यासाठी एवढा कालावधी लागला. तसेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी एका मतदान केंद्रावर दोन मतदान यंत्रे लागतात, असेही राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.
जिल्हा परिषदेसाठी आचारसंहिता शिथिल होणार
पूर्वनियोजनानुसार जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार होती. त्यामुळे जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या क्षेत्रात निकालापर्यंत लागू असलेली आचारसंहिता मतदानानंतर विशेष बाब म्हणून शिथिल करण्यात येईल. परंतु निवडणूक होत असलेल्या महानगरपालिका क्षेत्रातील आचारसंहिता महानगरपालिकांचे निकाल लागेपर्यंत कायम राहील, याची सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहन देखील श्रीमती सत्यनारायण यांनी केले आहे.
येथील सचिवालाय जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले की, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होईल. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची मतमोजणी 17 फेब्रुवारीला होईल. एकत्रित मतमोजणीच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 1 लाख 81 हजार यंत्रांची व्यवस्था केली आहे. यात भारत निवडणूक आयोगाच्या 1 लाख 30 हजार, इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (ईसीआयएल) मागवलेली 24 हजार आणि राज्य निवडणूक आयोगाकडील सुमारे 27 हजार मतदान यंत्रांचा समावेश आहे. भारत निवडणूक आयोगाच्या यंत्राचा उपयोग पुणे, नागपूर जिल्हा परिषद वगळून अन्य सर्व जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मतदान यंत्रांचा वापर केला जाणार आहे. दहा महानगरपालिकांसाठी इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची यंत्रे वापरण्यात येणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाकडून 1 लाख 30 हजार मतदान यंत्रे मागविली आहेत. यापेक्षा अधिक मतदानयंत्रे उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने कळवले होते. तसेच यापैकी सुमारे 5 टक्के मतदानयंत्रे सुस्थितीत नसल्याचे आढळून आले. यंत्रांची जुळवाजुळव करण्याच्या प्रक्रियेमुळे एकत्रित मतमोजणीचा निर्णय घेण्यासाठी एवढा कालावधी लागला. तसेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी एका मतदान केंद्रावर दोन मतदान यंत्रे लागतात, असेही राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.
जिल्हा परिषदेसाठी आचारसंहिता शिथिल होणार
पूर्वनियोजनानुसार जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार होती. त्यामुळे जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या क्षेत्रात निकालापर्यंत लागू असलेली आचारसंहिता मतदानानंतर विशेष बाब म्हणून शिथिल करण्यात येईल. परंतु निवडणूक होत असलेल्या महानगरपालिका क्षेत्रातील आचारसंहिता महानगरपालिकांचे निकाल लागेपर्यंत कायम राहील, याची सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहन देखील श्रीमती सत्यनारायण यांनी केले आहे.
बुधवार, १ फेब्रुवारी, २०१२
सुर-तालांची सुरेख मैफल झाली सुनी...अजित पवार
मुंबई, ता. 1 - ज्येष्ठ संगीतकार अनिल मोहिले यांच्या निधनाने सुर आणि ताल यांची सुरेख मैफल सुनी झाली आहे, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री म्हणतात की, संगीत दिग्दर्शक आणि संगीत संयोजक म्हणून अनिल मोहिले यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट संगीतावर आपला अमीट ठसा उमटवला होता. स्वरांवरची त्यांची हुकूमत विलक्षण होती. अरूण पौडवाल यांच्या साथीने त्यांनी स्वरबद्ध केलेली अनेक मराठी गाणी चिरकाल स्मरणात राहण्याजोगी आहेत. त्यांनी संगीत संयोजन केलेल्या अनेक मैफली अजरामर ठरल्या आहेत. मराठी आणि हिंदी संगीतसृष्टीतील त्यांचे योगदान माझ्यासारखे संगीतप्रेमी कधीही विसरणार नाहीत.
सोमवार, ३० जानेवारी, २०१२
रविवार, २९ जानेवारी, २०१२
महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दिवस
- १ डिसेंबर जागतिक एड्स दिन
- ८ मार्च जागतिक महिला दिन
- १५ मार्च जागतिक ग्राहक दिन
- २१ मार्च जागतिक वनदिवस
- २२ मार्च जागतिक जल दिवस
- ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिवस
- २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन
- ५ जून जागतिक पर्यावरण दिवस
- ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिवस
- ८ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन
- १६ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन
- २ ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिन
- ८ मार्च जागतिक महिला दिन
- १५ मार्च जागतिक ग्राहक दिन
- २१ मार्च जागतिक वनदिवस
- २२ मार्च जागतिक जल दिवस
- ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिवस
- २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन
- ५ जून जागतिक पर्यावरण दिवस
- ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिवस
- ८ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन
- १६ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन
- २ ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिन
लुधियाना येथील शाळेत वसंत पंचमीनिमित्त विविध कार्यक्रम
लुधियाना, ता. 29 - येथील स्प्रिंग डेल सिनियर सेकंडरी पब्लिक स्कूल मध्ये वसंत पंचमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सरस्वती स्तवन व पूजनाने कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. यावेळी पतंग उडविणे स्पर्धा, डेकोरेशन आणि सूर्यफुल बनविण्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत इ. सातवीतील दमन प्रथम, सहाव्या इयत्तेतील राहुल कोहली दुसरा आणि सहावीतील राजिंदर तिसऱ्या क्रमांकाने यश मिळवले. व्यवस्थापकीय संचालक अविनाश कौर वालिया यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.
ग्रीन लँड सिनियर पब्लिक स्कूल
ग्रीन लँड सिनियर पब्लिक स्कूलच्या केजी तील विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना सादर केली. यावेळी वसंत ऋतूवर आधारित गाणी म्हणण्यात आली.
एव्हरेस्ट पब्लिक सिनियर सेकंडरी स्कूल
एव्हरेस्ट पब्लिक सिनियर पब्लिक स्कूलमध्ये वसंत पंचमीनिमित्त वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. शाळेचे संचालक राजिंदर शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याचबरोबर भारतीय विद्या मंदीर स्कूल, एबीसी माँटेसरी स्कूल सह अनेक शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
ग्रीन लँड सिनियर पब्लिक स्कूल
ग्रीन लँड सिनियर पब्लिक स्कूलच्या केजी तील विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना सादर केली. यावेळी वसंत ऋतूवर आधारित गाणी म्हणण्यात आली.
एव्हरेस्ट पब्लिक सिनियर सेकंडरी स्कूल
एव्हरेस्ट पब्लिक सिनियर पब्लिक स्कूलमध्ये वसंत पंचमीनिमित्त वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. शाळेचे संचालक राजिंदर शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याचबरोबर भारतीय विद्या मंदीर स्कूल, एबीसी माँटेसरी स्कूल सह अनेक शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...


