मुख्य सामग्रीवर वगळा

मुंबई येथे 15 जानेवारीला छात्रभारतीतर्फे एक दिवसीय कार्यशाळा

मुंबई, ता. 5 - मुंबई येथे रविवारी (ता. 15) छात्रभारतीतर्फे युवकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा (वर्कशॉप) आयोजित केली आहे. सकाळी नऊपासून सायंकाळी सहापर्यंत तळमजला, पोयाबावडी म्युनिसिपल स्कूल, कामगार मैदानाजवळ, केईएम समोर, परळ, मुंबई येथे हे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी मार्गदर्शन करतील.

नाटक, सिनेमा, मालिका, वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रसासकीय संधी आणि सामाजिक, राजकीय परिस्थितीचे भान आदी विषयांवर यावेळी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. माध्यमं खुणावताहेत या विषयावर सकाळचे संपादक पद्मभूषण देशपांडे, तरुण मित्रांनो - कपिल पाटील (शिक्षक आमदार), मनोरंजनाची न्यारी दुनिया - सचिन गोस्वामी (मालिका आणि सिनेमा दिग्दर्शक), चला प्रशासकीय सेवेत - हाजी जतकर (उपायुक्त विक्रीकर), दिल्ली हादरवणारा फकीर - राजा कांदळकर (लेखक, पत्रकार), समारोप: आपण कोण? - ऍड. अरुण दोंदे (अध्यक्ष छात्रभारती) आदी मान्यवर मार्गदर्शन करतील. कार्यशाळेत प्राध्यापक देखील सहागी होऊ शकतात.
अधिक माहितीसाठी प्रा. जयवंत पाटील, प्रा. ईश्वर आव्हाड (9870329155), प्रा. उत्कर्षा मल्या, प्रा. आर. बी. पाटील, प्रा. सुरेश कोकीतकर, प्रा. लिना पगारे, प्रा. सुदाम वाघमारे, प्रा. चंद्रभान लांडे, भूषण वर्धमाने (9224762024), नेहा पांचाळ, सुमित जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012