मुख्य सामग्रीवर वगळा

दहा महानगरपालिका- 16 फेब्रुवारी; जिल्हापरिषदा, पं.स.- 7 फेब्रुवारीला मतदानः आचारसंहिता लागू

मुंबई, ता. 3 - बृहन्मुंबईसह दहा महानगरपालिका तसेच 27 जिल्हापरिषदा आणि 309 पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे जाहीर केला. यानुसार महानगरपालिकांसाठी 16 फेब्रुवारी 2012 ला मतदान होईल. तर, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होईल. यासर्व ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

येथील सचिवालय जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती सत्यनारायण यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर मुख्य सचिव चाँद गोयल उपस्थित होते. यावेळी श्रीमती सत्यनारायण म्हणाल्या की, आम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2012 आणि इ. दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होत आहे. परीक्षांचा कालावधी लक्षात घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही आणि निवडणुका वेळेवर घेण्याची जबाबदारी देखील व्यवस्थित पार पाडेल.
महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम

महानगरपालिका निवडणुकीसाठी 24 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. सार्वजनिक सुट्टी व रविवारी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली 1 फेब्रुवारीला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. तसेच याच दिवशी वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 3 फेब्रुवारी असेल. 4 फेब्रुवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. याच दिवशी मतदान केंद्रांची मतदारनिहाय यादी प्रसिद्ध होईल. 16 फेब्रुवारीला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळात मतदान होईल. याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता किंवा सर्व केंद्रांवरील मतदान समाप्तीनंतर मतमोजणी होईल. स्थानिक परिस्थितीनुसार यात बदल होऊन दुसऱ्या दिवशी ही मतमोजणी होऊ शकते.

उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ (रुपयात)-
अ वर्ग महानगरपालिका (मुंबई) 1,35,000 वरून 5,00,000
ब वर्ग महानगरपालिका (पुणे व नागपूर) 1,00,000 वरून 4,00,000
क वर्ग महानगरपालिका (पिंपरी-चिंचवड, ठाणे, नाशिक व नवी मुंबई)- 1,00,000 वरून 4,00,000.
ड वर्ग महानगरपालिका (उर्वरित सर्व) 1,00,000 वरून 3,00,000
जिल्हा परिषदा- 60,000 वरून 3,00,000
पंचायत समित्या- 40,000 वरून 2,00,000

मतदारांच्या सोयीसाठी-

राज्य निवडणूक आयोगाचे www.mahasec.com हे नवे अद्ययावत संकेतस्थळ
मतदान केंद्र मध्यवर्ती ठिकाणी.
उर्वरित महानगरपालिका, जि.प., पं. समितीसाठी मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल संख्या 800
रांगा टाळण्यासाठी मतदान केंद्रावरील कमाल मतदार संख्येत घट
अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची व्यवस्था
अंध, अपंग, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी प्राधान्य
राजकीय पक्षांच्या महत्वाच्या पुढाऱ्यांच्या प्रवास खर्चास उमेदवाराच्या खर्चातून सूट
आता मार्करपेनने मतदाराच्या बोटावर निशाणी
आधार कार्ड - सुद्धा चालणार
प्राण्यांचा क्रूरपणे वापर करण्यास मनाई.

जिल्हा परिषद/पंचायत समित्या निवडणूका
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे देण्यास 18 जानेवारीपासून सुरवात होईल व 23 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. छाननी व वैध उमेदवार यादी 24 जानेवारीला प्रसिद्ध होईल.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012