मुख्य सामग्रीवर वगळा

मतदार यादीसंदर्भातील हरकती 12 जानेवारीपासून स्वीकारणार- आयोगाची हेल्पलाईन

मुंबई, ता. 11- महानगरपालिका निवडणुकीच्या मतदार यादीसंदर्भातील हरकती आणि सूचना संबंधित महानगरपालिकेत 12 ते 17 जानेवारी 2012 या कालावधीत स्वीकारल्या जाणार आहेत. निवडणूक होत असलेल्या दहा महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांसाठी 9225320011 या क्रमांकावर हेल्पलाईनची आणि 56677 या क्रमांकावर एसएमएसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे दिली.

येत्या 16 फेब्रुवारीस मुंबईसह ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या दहा महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यासाठी 5 जानेवारी 2012 रोजी मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली असून यावरूनच निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 12 जानेवारीस प्रसिद्ध केली जाणार आहे. यावर 17 जानेवारी 2012 पर्यंत संबंधित महानगरपालिका किंवा महानगरपालिकेने निर्देशित केलेल्या ठिकाणी मतदारांना हरकती व सूचना दाखल करता येतील. यानंतर 23 जानेवारीला प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध केल्या जातील.

हेल्पलाईन आणि संकेतस्थळ

या दहा महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांना मतदार यादीतील आपले नाव, त्यासंदर्भातील तपशील आणि मतदान केंद्राबाबतची माहिती मिळविण्यासाठी 9225320011 या हेल्पलाईन सुविधेचा लाभ घेता येईल. ही हेल्पलाईन सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत कार्यरत राहील.

आयोगाने निवडणुकांच्या दृष्टीने www.mahasec.com हे अद्ययावत संकेतस्थळही तयार केले आहे. येथे संबंधित महानगरपालिकांच्या निवडणूकविषयक संकेतस्थळाचीही लिंक उपलब्ध आहे. याद्वारेही मतदारांना मतदारयादीतील आपले नाव शोधता येईल. तसेच या संकेतस्थळांवर प्रभागाचा नकाशा आणि अन्य तपशीलही उपलब्ध असल्याचे श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.
मतदारांना एसएमएसद्वारे माहिती

मतदारांना मतदार यादीतील आपल्या नावाबाबतची माहिती 56677 क्रमांकावर मिळू शकेल. प्रत्येक महापालिकेसाठी स्वतंत्र कोड तयार करण्यात आले असून मुंबई- mcgm, पुणे- pmc, नागपूर- nmc, पिंपरी-चिंचवड- pcmc, नाशिक- nsmc, अकोला- akmc, अमरावती- ammc, सोलापूर- smc, ठाणे- tmc आणि उल्हासनगर- umc इ.

माहिती मिळविण्यासाठी मतदाराचे नाव आणि वय इंग्रजीत टाइप करून 56677 या क्रमांकावर एसएमएस पाठवल्यास आपल्याला माहिती मिळू शकेल. उदा. voter <स्पेस> mcgm <स्पेस> rahul ramcjandra rane <स्पेस> 35 असे टाईप करून 56677 क्रमांकावर एसएमएस पाठविल्यास माहिती मिळेल.

गडचिरोलीत दोन टप्प्यात मतदान

सुरक्षिततेच्या दृष्टीने गडचिरोली जिल्हा परिषदेची निवडणूक दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चार्मोशी आणि मुलचेरा या 8 तालुक्यातील जिल्हा परिषद गटांसाठी आणि पंचायत समित्यांसाठी पूर्वनियोजनानुसार 7 फेब्रुवारीस मतदान होईल. अहेरी, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या चार तालुक्यातील जि. प. गटांसाठी आणि सिरोंचा या चार तालुक्यातील जिल्हा परिषद गटांसाठी आणि पंचायत समित्यांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार 12 फेब्रुवारीस मतदान होईल. जिल्ह्यातील सर्व ठिकाणी एकाच दिवशी 14 फेब्रुवारी 2012 रोजी मतमोजणी होईल.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012