बुधवार, ३० मे, २०१२

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन २०१२ – २०१४ जिल्हाध्यक्ष

विशेष प्रतिनिधी (दि. ३० मे):  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश पक्षांतर्गत निवडणूक २०१२-२०१४ जिल्हाध्यक्षपदासाठी जिल्हानिहाय एकत्रित आलेल्या अहवालावर प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्य प्रवक्ता मोहन बाफना यांनी एकत्रित बैठक घेऊन नावांसंदर्भात चर्चा करून जिल्हाध्यक्षांची नावे निश्चित केली. 
यानुसार जिल्हाध्यक्षांच्या नावाची यादी अशी(तालुकाध्यक्ष व अन्य पदाधिकार्‍यांची नावे २ जून नंतर जाहीर करण्यात येतील)-रत्नागिरी- सर्वश्री शेखर निकम, रायगड- वसंत ओसवाल, ठाणे शहर जितेंद्र आव्हाड, ठाणे ग्रामीण- आनंद ठाकूर, भिवंडी- शेख खलिद गुड्डू, 
उल्हासनगर- ज्योती कालानी, नवी मुंबई- गोपीनाथ ठाकूर, मिरा भाईंदर- मोहन पाटील, पुणे ग्रामीण- सुरेश घुले, पिंपरी चिंचवड- योगेश बहल, सातारा- शशिकांत शिंदे, सांगली शहर- इद्रिस नायकवाडी, सांगली ग्रामीण- विलासभाऊ शिंदे, सोलापूर शहर- महेश गादेकर, सोलापूर ग्रामीण- के. पी. पाटील, नाशिक शहर- रविंद्र कोशिरे, नाशिक ग्रामीण- अॅड. रविंद्र पगार, धुळे शहर- चंद्रकांत केले, धुळे ग्रामीण- राजवर्धन कदमबांडे, नंदुरबार- श्रीमती कमलाताई मराठे, 
जळगाव शहर- विनोद देशमुख, जळगाव ग्रामीण- अब्दुल गफ्फार मलिक- आ. दिलीप सोनवणे (कार्याध्यक्ष), अहमदनगर शहर- संग्राम जगताप, अविनाश घुले (कार्याध्यक्ष), अहमदनगर ग्रामीण- घनश्याम शेलार, औरंगाबाद शहर- मुस्ताक अहमद, औरंगाबाद ग्रामीण- सुधाकर सोनवणे, परभणी- विजय भांबळे, हिंगोली- मुनिर पटेल, बीड- अशोक डक, नांदेड ग्रामीण- बापूसाहेब गोरठेकर, उस्मानाबाद- सुरेश बिराजदार, लातूर शहर- मुर्तुझा खान, नवनाथ आल्टे (कार्याध्यक्ष), बुलढाणा- सोपान साठे, वाशिम- सुभाष राठोड, अमरावती शहर- अॅड. किशोर शेळके, अमरावती ग्रामीण- विजय भैसे, यवतमाळ- सुरेश लोणकर, नागपूर शहर- अजय पाटील, भंडारा- अविनाश ब्राह्मणकर, गोंदिया- विनोद हरीणखेडे, चंद्रपूर- राजेंद्र वैद्य.

रविवार, २७ मे, २०१२

'ज्वारी-बाजरी' मध्ये लाल मुंग्यांमुळे व्यापारी त्रस्त

इंदूर ता. २७- ऊन मी म्हणत असून पार्‍याने ४१ अंश सेल्सिअस पार केले आहेत. मध्यप्रदेशमध्ये 'नवतपा' म्हणून सध्या(जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत) च्या नऊ दिवसांकडे पाहिले जाते. या नऊ दिवसांमध्ये जितके ऊन कडक असेल तितका पाऊस छान पडतो असे म्हणतात. उन्हाळ्यात विशेषतः लाल मुंग्यांचा त्रास सर्वत्र असतो. मात्र येथील बाजारपेठेत सध्या धान्य व्यापारी त्रस्त आहेत ते म्हणजे यांच्याकडील ज्वारी, बाजरीमध्ये लाल मुंग्या झाल्या आहेत. बाजूलाच साखरेची पोती असून त्यात मात्र मुंग्या झाल्या नाहीत, हे विशेष...

सोमवार, २१ मे, २०१२

SRI GURU GRANTH SAHIB’S INSTALLATION CERMONY

21st May 2012. :- The installation ceremony of “Sri Guru Granth Sahib Ji” at the New Gurudwara Sri Guru Singh Sabha (Regd.), Kharghar, Navi MUmbai was performed at the hands of “Baba Nariender Singh Ji, Head of Langer Saheb Nanded (Mukhee)” on 20th May 2012 (Sunday) with great religious fervor and dedication. According to the “Sikh Mariyada” Bawa Nariender Singh Ji recited the “first hukamnama” from Sri Guru Granth Sahib Ji to the assemble Sadh Sangat. On this occasion, Baba Nariender Singh Ji, explained in depth the historical back ground of compilation of “Sri Guru Granth Sahib Ji by the Guru Arjun Dev Ji”, Its installation at Sri Harmandir Sahib, Amritsar (Punjab) and “THE GURU MANYO GRANTH DICTATE” issued by “Sri Guru Gobind Singh Ji, 10th Guru of the Sikhs in 1707 A. D. at Nanded Sahib (Maharashtra)”. He further exhorted the assembled Sadh Sangat to religiously follow the ideals of the Gurus as enshrined in “Sri Guru Granth Sahib Ji”.

“Punj Piaras” and sewadars carrying Nishaan Saheb, who led the “Nagar Kirtan” carrying “Sri Guru Granth Sahib Ji” were honored at the hands of Baba Nariender Singh Ji. Shri Mehar Singh Randhawa, President of Gurudwara Guru Nanak Darbar, Airoli, Navi Mumbai and General Secretary, Supreme Council Navi Mumbai Grurudwaras paid his obeisance to Baba Nariender Singh Ji on behalf of the Sikh Sadh Sangat of Navi Mumbai. Sh. Sardara Singh Malhotra, President of Gurudwara Sri Guru Singh Sabha (Regd.), Kharghar felicitated the distinguished Sikh personalities for their contribution made towards the successful organization of the installation ceremony.

On this occasion, “Gurbani kirtand and Gurbani katha” was performed by the prominent Raagis which continued till 02.30 P. M. As usual, “Guru-Ka-Langar” was served one and all participating in the installation ceremony. Earlier, “Vishal Nagar Kirtan”, comprising of all the Gurudwaras of Navi Mumbai and Sikh Sadh Sangat was organized which started from the existing Gurudwara Sector–12, Kharghar to the New Gurudwara Plot No. 8, Sector – 22, Kharghar with great enthusiasm. Various “Sikh Martial Arts” was performed en-route to the best interest of the viewers. The procession reached the new Gurudwara Sahib at 10.30 A. M. Nearly Ten thousands of “Sikh Sadh Sangat” comprising of men, women and children, attired in colorful dresses, made the occasion a truly rich and colorful sikh traditions.

Gurudwara Sri Gruru Singh Sabha (Regd.), Kharghar, Navi Mumbai located at Plot No. 8, Sector – 22, Opposite the famous Central Park and adjoining to the most modern “Golf Club” of Navi Mumbai is being built on 1500 Square meter area enjoys added advantages on account of its prominent location. As explained by President, Sh. Saradara Singh Malhotra, the Gurudwara on its completion will have ground plus three floors. Gurudwara’s campus is being provided a land escapic view developed under and horticultural guidance. Additionally 10 rooms are being specially provided to accommodate various schemes being implemented by the Gurudwara Parbandhak Committee. This includes, computer classes, gurmat classes and well contained rooms to be provided to the Cancer patients relatives. “Gurudwara Sri Guru Singh Sabha (Regd.), Kharghar and its Management Committee attaches an utmost importance in providing social services to the poor and needy according to the sikh tenant”, Sh. Malhotra concluded. Shri Balwant Singh Sheera, a puran Gur-Sikh and well informed personality in Sikhs conducted the whole installation ceremony function in a reverent way.

गुरुवार, १९ एप्रिल, २०१२

घडवा सुंदर हस्ताक्षर उपक्रमाबाबत किशोर कुळकर्णी यांची महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याशी भेट



जळगाव दि. १९ (प्रतिनिधी) - सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शक किशोर कुळकर्णी यांनी महामहीम राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई देवीसिंह पाटील-शेखावत यांची काही दिवसांपूर्वी जळगाव दौर्‍यात भेट घेतली व शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपती महोदयांना माहिती दिली. त्यांच्या या स्पृहनिय कार्याबद्दल महामहिम राष्ट्रपतींनी जाणून घेतले व कार्याबाबत समाधान व्यक्त केले. ते जैन इरिगेशनच्या प्रसिद्धी विभागात कार्यरत आहेत.
       
महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या गत २३ ते २५ मार्च १२ दरम्यान जळगाव दौर्‍यावर आल्या होत्या. किशोर कुळकर्णी यांनी राष्ट्रपती महोदयांना आपल्या कार्याबद्दल माहिती व घडवा सुंदर हस्ताक्षर पुस्तक सस्नेह देण्याबाबत विनंती अर्ज केला होता. त्यानुसार २४ मार्च रोजी महामहीम राष्ट्रपतींची भेट निश्‍चित झाली. या भेटीत कुळकर्णी यांनी घडवा सुंदर हस्ताक्षर उपक्रमाबाबत माहिती दिली. गत १७ वर्षांपासून ते शालेय विद्यार्थ्यांचे अक्षर सुघड सुंदर व्हावे यासाठी निस्पृहपणे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शनाचे कार्य करीत आहेत. एकट्या धरणगावमध्ये विविध शाळांच्या सुमारे २००० विद्यार्थ्यांच्या अक्षरांना आपण वळण लावले असून त्या कार्याबद्दल त्यांचा माजी मंत्री अरुणभाई गुजराथी यांच्याहस्ते नागरी सत्कार देखील करण्यात आला होता. याशिवाय त्यांनी महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्था व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षराबाबत अनमोल असे मार्गदर्शन केले आहे. यात स्व. बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवन येथील शाळेत देखील त्यांनी हा उपक्रम यशस्वी राबविला असून त्याबाबत विकास आणि सौ. भारती आमटे यांनी कुळकर्णी यांच्या कार्याबाबत नोंदविलेला अभिप्राय आणि त्यांनी राबविलेल्या उपक्रमाची विविध प्रसिद्धी माध्यमात प्रकाशित बातम्या, लेख आदी साहित्य देखील राष्ट्रपती महोदयांना या भेटीत दाखविण्यात आले. किशोर कुळकर्णी यांच्या कार्याबाबत महामहिम राष्ट्रपती महोदयांनी समाधान व्यक्त केले. या भेटीत कुळकर्णी यांच्या सुविद्य पत्नी सौ. आरती कुळकर्णी देखील सोबत होत्या.

शुक्रवार, १३ एप्रिल, २०१२

भिवंडी-निजामपूर, मालेगाव, चंद्रपूर, परभणी, लातूर महानगरपालिका मतदानासाठी यंत्रणा सज्ज

मुंबई, ता. १३, - भिवंडी-निजामपूर, मालेगाव, चंद्रपूर, परभणी, लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज दिली. येत्या १५ एप्रिलला या महानगरपालिकांसाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे.

श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले, की एकूण ३७१ जागांसाठी २ हजार ४०२ उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. १ हजार ८५३ मतदान केंद्रांवर एकूण १५ लाख १८ हजार १७३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात ८ लाख ४५ हजार ८७८ पुरुष तर ६ लाख ७२ हजार २९५ महिला मतदार हक्क बजावणार आहेत. यासाठी २ हजार ४५० मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. ९१० अतिरिक्त मतदान यंत्रांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. ४३० संवेदनशील तर ७ अतिसंवेदनशील मतदानकेंद्रे आहेत. सर्व सातही संवेदनशील मतदानकेंद्रे परभणी येथील आहेत. सर्वाधिक २२४ मतदानकेंद्रे भिवंडी-निजामपूर येथे आहेत. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

मतदारांनी अधिकाधिक संख्येने आणि निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन श्रीमती सत्यनारायण यांनी केले आहे.
महानगरपालिकानिहाय तपशील-
मालेगाव- जागा ८०, उमेदवार ४७१, मतदान केंद्रे ४६७, संवेदनशील मतदान केंद्रे १४४, मतदार संख्या ३, ६७, ३७४.
लातूर- जागा ७०, उमेदवार ४१८, मतदान केंद्रे ३०८, संवेदनशील मतदान केंद्रे ०, मतदार  संख्या २, ५१, २१०.
चंद्रपूर- जागा ६६, उमेदवार ४५८, मतदान केंद्रे २९९, संवेदनशील मतदान केंद्रे २१, मतदार संख्या २, ३६, ९९५.
परभणी- जागा ६५, उमेदवार ४२३, मतदान केंद्रे २६६, संवेदनशील मतदान केंद्रे ४१, मतदार संख्या २, ०३, ४४९.
एकूण- एकूण जागा ३७१, उमेदवार २, ४०२, मतदान केंद्रे १, ८५३, संवेदनशील मतदान केंद्रे ४३०, मतदार संख्या १५, १८, १७३.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...