मुख्य सामग्रीवर वगळा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन २०१२ – २०१४ जिल्हाध्यक्ष

विशेष प्रतिनिधी (दि. ३० मे):  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश पक्षांतर्गत निवडणूक २०१२-२०१४ जिल्हाध्यक्षपदासाठी जिल्हानिहाय एकत्रित आलेल्या अहवालावर प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्य प्रवक्ता मोहन बाफना यांनी एकत्रित बैठक घेऊन नावांसंदर्भात चर्चा करून जिल्हाध्यक्षांची नावे निश्चित केली. 
यानुसार जिल्हाध्यक्षांच्या नावाची यादी अशी(तालुकाध्यक्ष व अन्य पदाधिकार्‍यांची नावे २ जून नंतर जाहीर करण्यात येतील)-रत्नागिरी- सर्वश्री शेखर निकम, रायगड- वसंत ओसवाल, ठाणे शहर जितेंद्र आव्हाड, ठाणे ग्रामीण- आनंद ठाकूर, भिवंडी- शेख खलिद गुड्डू, 
उल्हासनगर- ज्योती कालानी, नवी मुंबई- गोपीनाथ ठाकूर, मिरा भाईंदर- मोहन पाटील, पुणे ग्रामीण- सुरेश घुले, पिंपरी चिंचवड- योगेश बहल, सातारा- शशिकांत शिंदे, सांगली शहर- इद्रिस नायकवाडी, सांगली ग्रामीण- विलासभाऊ शिंदे, सोलापूर शहर- महेश गादेकर, सोलापूर ग्रामीण- के. पी. पाटील, नाशिक शहर- रविंद्र कोशिरे, नाशिक ग्रामीण- अॅड. रविंद्र पगार, धुळे शहर- चंद्रकांत केले, धुळे ग्रामीण- राजवर्धन कदमबांडे, नंदुरबार- श्रीमती कमलाताई मराठे, 
जळगाव शहर- विनोद देशमुख, जळगाव ग्रामीण- अब्दुल गफ्फार मलिक- आ. दिलीप सोनवणे (कार्याध्यक्ष), अहमदनगर शहर- संग्राम जगताप, अविनाश घुले (कार्याध्यक्ष), अहमदनगर ग्रामीण- घनश्याम शेलार, औरंगाबाद शहर- मुस्ताक अहमद, औरंगाबाद ग्रामीण- सुधाकर सोनवणे, परभणी- विजय भांबळे, हिंगोली- मुनिर पटेल, बीड- अशोक डक, नांदेड ग्रामीण- बापूसाहेब गोरठेकर, उस्मानाबाद- सुरेश बिराजदार, लातूर शहर- मुर्तुझा खान, नवनाथ आल्टे (कार्याध्यक्ष), बुलढाणा- सोपान साठे, वाशिम- सुभाष राठोड, अमरावती शहर- अॅड. किशोर शेळके, अमरावती ग्रामीण- विजय भैसे, यवतमाळ- सुरेश लोणकर, नागपूर शहर- अजय पाटील, भंडारा- अविनाश ब्राह्मणकर, गोंदिया- विनोद हरीणखेडे, चंद्रपूर- राजेंद्र वैद्य.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012