इंदूर ता. २७- ऊन मी म्हणत असून पार्याने ४१ अंश सेल्सिअस पार केले आहेत. मध्यप्रदेशमध्ये 'नवतपा' म्हणून सध्या(जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत) च्या नऊ दिवसांकडे पाहिले जाते. या नऊ दिवसांमध्ये जितके ऊन कडक असेल तितका पाऊस छान पडतो असे म्हणतात. उन्हाळ्यात विशेषतः लाल मुंग्यांचा त्रास सर्वत्र असतो. मात्र येथील बाजारपेठेत सध्या धान्य व्यापारी त्रस्त आहेत ते म्हणजे यांच्याकडील ज्वारी, बाजरीमध्ये लाल मुंग्या झाल्या आहेत. बाजूलाच साखरेची पोती असून त्यात मात्र मुंग्या झाल्या नाहीत, हे विशेष...
मार्चमध्ये पनवेल येथे चौथे राज्यव्यापी साहित्य संमेलन: कवी, गजलकारांना सहभागी होण्याचे संस्थांचे आवाहन
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. याकरिता सहभागी होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील नामवंत कवी, गजलकारांनी आपल्या स्वरचित कविता, गजल २० फेब्रुवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि विश्वव्यापी मराठी साहित्य, सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे. अभिजात मराठी भाषेच्या जतनाकरिता गेली अनेक वर्षे दोन्ही संस्था कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली कवी संमेलने, गजल मुशायरा, चर्चासत्रांपासून मराठी भाषेचा गोडवा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सकाळी वारकरी दिंडीतून ‘ज्ञानोबा-तुकोबा’ यांच्या गजरासह ग्रंथ दिंडीत टाळ, चिपळ्या, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पारंपरिक पद्धतीने नयनरम्य पालखी काढण्यात येईल. या परंपरेच्या माध्यमातून पनवेल शहराचे साहित्य, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जतन केला जात आहे. सकाळी दिंडी, उद्घाटन सोहळा, एक-एक तासाच्या अवधीची दोन चर्चासत्रे, कवी आख्यान, गजल मुशायरा याशिवाय अन्य ...