मंगळवार, २४ मे, २०११

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेत्या कलाकारांचा अभिमान: उपमुख्यमंत्री

'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटाचे निर्माते सचिन आणि बिंदीया खानोलकर तसेच दिग्दर्शक अनंत महादेवन यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार. शेजारी आमदार विनायक मेटे, आमदार विक्रम काळ     
मुंबई, ता. 23 - यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटसृष्टीचे नाव कोरणार्‍या कलाकार आणि तंत्रज्ञानांचा आपल्याला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या 'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन तसेच निर्माते सचिन आणि बिंदीया खानोलकर यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आमदार विनायक मेटे, आमदार विक्रम काळे यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, दादा कोंडके यांनी मराठी चित्रपट रसिकांना खिळवून ठेवले होते. त्यांच्यानंतर अलिकडे निर्माण झालेल्या काही चांगल्या चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी दिली आहे. 'मी सिंधुताई सपकाळ' हा प्रेरणादायी चित्रपट आहे. येत्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान आमदारांसाठी या चित्रपटाचा खास खेळ आयोजित करण्यात येण्याची विनंती पवार यांनी निर्मात्यांना केली. यावेळी अनंत महादेवन म्हणाले की, बाबूराव पेंटर, व्ही. शांताराम यांच्यानंतर आज मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ पुन्हा अवतरला आहे. दर्जेदार मराठी चित्रपटांच्या निर्मितीमुळे मराठी चित्रपट रसिक पुन्हा मराठी चित्रपटांकडे वळायला लागले आहेत. परदेशात देखील चित्रपटांना प्रतिसाद मिळात आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेत्या कलाकारांचा अभिमान: उपमुख्यमंत्री


मुंबई, ता. 23 - यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटसृष्टीचे नाव कोरणार्‍या कलाकार आणि तंत्रज्ञानांचा आपल्याला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या 'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन तसेच निर्माते सचिन आणि बिंदीया खानोलकर यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आमदार विनायक मेटे, आमदार विक्रम काळे यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, दादा कोंडके यांनी मराठी चित्रपट रसिकांना खिळवून ठेवले होते. त्यांच्यानंतर अलिकडे निर्माण झालेल्या काही चांगल्या चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी दिली आहे. 'मी सिंधुताई सपकाळ' हा प्रेरणादायी चित्रपट आहे. येत्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान आमदारांसाठी या चित्रपटाचा खास खेळ आयोजित करण्यात येण्याची विनंती पवार यांनी निर्मात्यांना केली. यावेळी अनंत महादेवन म्हणाले की, बाबूराव पेंटर, व्ही. शांताराम यांच्यानंतर आज मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ पुन्हा अवतरला आहे. दर्जेदार मराठी चित्रपटांच्या निर्मितीमुळे मराठी चित्रपट रसिक पुन्हा मराठी चित्रपटांकडे वळायला लागले आहेत. परदेशात देखील चित्रपटांना प्रतिसाद मिळात आहे.

'जातिनिहाय जनगणनेला नागरिकांनी उत्स्फूर्त सहकार्य करावे' : भुजबळ

मुंबई 23 : गेली 80 वर्षे प्रलंबित असलेली जातवार जनगणनेची मागणी केंद्र सरकारने मंजूर केली असून त्याचे प्रत्यक्ष काम येत्या एक जूनपासून सुरू होणार असून या कामी समता परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आज येथे केले. समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बांद्रा येथील एम.ई.टी.मध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. भुजबळ म्हणाले की, यापूर्वीची जातिनिहाय जनगणना सन 1931मध्ये झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळात यंदा प्रथमच होणाऱ्या जातिनिहाय जनगणनेमुळे जातवार शिक्षण, नोकऱ्या, निवारा, आरोग्य, मूलभूत सोयीसुविधा, आर्थिक, सामाजिक स्थिती यांची माहिती उपलब्ध होणार आहे. त्याच्या आधारे पुढील विकास योजना आणि मागासवर्गीयांच्या कल्याणाची धोरणे आखली जातील. त्यानुसार राज्यवार व देशाच्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसी, भटके विमुक्त आणि आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या समाजघटकांना न्याय मिळण्याचे दरवाजे उघडले जातील.
समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन जनगणनेला सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना करावे; तसेच, हे काम सुरळीतपणे पार पडण्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी, अशी सूचनाही श्री. भुजबळ यांनी केली.
या बैठकीमध्ये जातिनिहाय जनगणनेची मागणी मंजूर करून घेतल्याबद्दल श्री. भुजबळ यांचे अभिनंदन करण्यात आले. लोकसभेत ही मागणी सर्वप्रथम मांडल्याबद्दल खासदार समीर भुजबळ यांनाही धन्यवाद देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येत्या 10 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या मागासवर्गीयांच्या हक्काच्या सनदेच्या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या बैठकीला खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, जयंत जाधव, प्रा. हरि नरके, डॉ. कैलास कमोद, माजी आमदार लक्ष्मण तायडे, संदेश कोंडविलकर, वसंत वाणी, डॉ. संजय गव्हाणे यांच्यासह सुमारे 125 पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सोमवार, २३ मे, २०११

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांमुळे महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचा गौरव: अजित पवार

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांमुळे राज्याच्या कलाक्षेत्राचा गौरव झाला आहे. या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरस्कारविजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
श्री. पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे की, अठ्ठावन्नाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटसृष्टीचा वरचष्मा आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या या दिमाखदार कामगिरीमुळे मला आनंद झाला आहे. अभिनय, दिग्दर्शन, पार्श्वगायन, निर्मिती या क्षेत्रातील मराठी कलाकार आणि तंत्रज्ञांच्या दमदार कामगिरीमुळे मराठी चित्रपटसृष्टीच्या गुणात्मकतेवर राष्ट्रीय मोहोर उमटली आहे.

संतांनी समाज घडविण्याचे कार्य केले- छगन भुजबळ

कोरेगाव भीमा - संतांनी समाज घडवण्याचे मोठे काम केल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी पहिल्या अखिल भारतीय बहुजन संत साहित्य महासंमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी केले.
वाघोली (ता. हवेली) येथे भारतीय जैन संघटना महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या महासंमेलनाचे उद्‌घाटन आज श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाले. संमेलनाचे अध्यक्ष सत्यपाल महाराज, प्रीतिसुधाजी महाराज, आमदार अशोक पवार, सौ. कमलताई ढोले पाटील, प्रा. हरी नरके, प्रा. लक्ष्मण मुंजाळे, डॉ. अजित नदाफ, पी. रघुनाथ, अशोक शहा, अरुण बुर्गाडे, प्रा. दगडे, प्रा. रमणलाल सोनग्रा, महादेव तरवडेकर, श्रवणकुमार महेंद्रकुमार, तसेच स्वागताध्यक्ष हनुमंत उपरे, शिवदास उबाळे, मुख्य प्रवर्तक महेंद्र धावडे, अमित वाघोलीकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश घुले, प्रदीप कंद, अशोक सावंत, रामदास दाभाडे, शंकर भुमकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भुजबळ आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री.भुजबळ म्हणाले, 'पर्यावरणाचा सामाजिक संदेश संत तुकाराम महाराजांनीच आपल्या अभंगातूनही दिला, तर श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम संत सावता माळी यांनी केले. संतसाहित्याच्या प्रसारासाठी "फेसबुक'सारख्या सोशल नेटवर्किंग माध्यमांचा वापर करावा.''
प्रीतिसुधाजी महाराज यांनी, जातीभेद नष्ट झाला पाहिजे, असे मत व्यक्त करून गोहत्येवरही कडक शब्दांत टीका केली.
हनुमंत उपरे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक डॉ. धावडे यांनी केले. सूत्रसंचालन दिगंबर लोहार यांनी केले, तर आभार सोमनाथ भुजबळ यांनी मानले.

मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करावे - छगन भुजबळ

मुंबई, दि. 20 मे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 17 च्या चौपदरीकरणाचे काम येत्या अडीच वर्षांत टप्प्याटप्प्याने पूर्ण होईलच, पण तोपर्यंत या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक संबंधित विभागाने आपापले काम जबाबदारीने करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे व्यक्त केली. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भात सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात, नागरिकांची सुरक्षा आणि चौपदरीकरणाच्या अनुषंगाने गेल्या 11 मे रोजी श्री. भुजबळ यांनी आपल्या मंत्रालयातील दालनात बैठक बोलाविली होती. त्या बैठकीत सामोऱ्या आलेल्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच तोडगा काढण्याच्या दृष्टीने त्यांनी आज ही बैठक बोलाविली होती. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) धनंजय धवड, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव भूषण गगराणी, पोलिस महानिदेशक (वाहतूक) श्री. शर्मा, मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) श्री. मंडपे यांच्यासह कोकण विभागातील वन, महसूल, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक, गृह विभागांचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी उपस्थित होते.
श्री. भुजबळ म्हणाले, या प्रकरणी प्रत्येक जणच आपल्यावरची जबाबदारी झटकून मोकळा व्हायला पाहतो आहे. असे कसे चालेल? मला सुध्दा केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलता येते; पण, माझ्या राज्यातली माणसं मरत आहेत, म्हणून वेदना होताहेत. राज्यातल्या कुठल्याच रस्त्यावर एकही माणूस अपघातात मरता कामा नये, अशी माझी प्रामाणिक भावना आहे. ते अशक्यप्राय असले तरी त्या दृष्टीने प्रयत्न करणे, योग्य पायाभूत सुविधा निर्माण करणे, या गोष्टी तरी आपल्या हातात आहेत. त्या करण्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे आवाहन भुजबळ यांनी केले.
श्री. भुजबळ यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या 33 हेक्टर वनजमिनीच्या संदर्भात वेळोवेळी उपस्थित करण्यात आलेल्या शेऱ्यांवर समाधानकारक पूर्तता केल्यानंतरही वर्गीकरणाचा प्रश्न अद्याप अलिबाग आणि रोहा येथील उप वनसंरक्षक यांच्याकडे प्रलंबित असून ते काम तातडीने करण्याची सूचना केली. यावेळी वनजमीन हस्तांतरणाला गती देण्यासाठी गुजरात सरकारने कायद्यात सुधारणा केल्याची माहिती देण्यात आली. त्यावर संबंधित कायद्याचा अभ्यास करून आपल्या राज्यात त्याची अंमलबजावणी करता येईल का, यादृष्टीने चाचपणी करण्याची सूचनाही त्यांनी केली.
रायगड जिल्ह्यातील एकूण 67 गावांपैकी आजपर्यंत केवळ 12 गावांतीलच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित गावांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही श्री. भुजबळ यांनी दिले. त्यावर निवाडे आणि निधी उपलब्धता यांच्या संदर्भातील पूर्तता करून येत्या दोन महिन्यांत या गावांतील भूसंपादनाची सर्व प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या सुमारे दीड किलोमीटर लांबीत खात्याकडे 30 मीटर रुंदीची जागा उपलब्ध आहे. या रुंदीत वेगमर्यादा, ध्वनिमर्यादा तसेच भौमितिक मापदंडात मर्यादा घालून चारपदरी रुंदीकरण शक्य आहे. त्यादृष्टीने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वनविभागाला प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा, अशी सूचनाही श्री. भुजबळ यांनी यावेळी केली.
इंदापूर ते झाराप या 366 किलोमीटर लांबीच्या टप्प्यातील चौपदरीकरणाच्या कामाचा सुसाध्यता अहवाल तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून येत्या 15 दिवसांत त्याचा डी.पी.आर. केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी श्री. भुजबळ यांना देण्यात आली.

धोकादायक ठिकाणी सुरक्षिततेसाठी...
महामार्गावरील धोकादायक ठिकाणांची यादी संबंधितांकडून घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी त्या सर्व ठिकाणी आपल्या अखत्यारीतील आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावेत, असे आदेश श्री. भुजबळ यांनी यावेळी दिले. पावसाळयापूर्वी महामार्गाच्या बाजूपट्टया उत्तम प्रकारे भरून घ्याव्यात, ब्लॅक स्पॉट्सच्या ठिकाणी वाहनांची गती कमी करण्यासाठी आधुनिक गतिरोधक 15 दिवसांच्या आत बसवावेत, असे आदेशही त्यांनी दिले.
वडखळ येथील महामार्गावरील अतिक्रमणे दूर करावीत, शक्य असेल तर त्याठिकणी रुंदीकरण करावे तसेच दुभाजक बसवावेत. त्याचप्रमाणे तेथे मागील बाजूने पर्यायी मार्गाची सोय करता येणे शक्य असल्यास ते कामही तातडीने करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

अपघात कमी करण्यासाठी...
या महामार्गावरील अपघात कमी करण्याच्या दृष्टीनेही श्री. भुजबळ यांनी अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या. ते म्हणाले, गेल्या बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे गणेशोत्सवाच्या काळात जसे कंटेनर रस्त्याच्या बाजूला उभे करून लहान वाहने जशी पुढे काढली जातात, तशाच पध्दतीने सुटीच्या हंगामात सुध्दा ही मोहीम राबविता येऊ शकेल. त्याचप्रमाणे मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुध्दही तपासणी मोहीम उघडावी, तसेच असे तपासणी नाके वाढवावेत. महामार्ग पोलिसांनी गतिमापक यंत्रे (स्पीडगन) उपलब्ध करण्याबरोबरच गस्ती वाहनांच्या संख्या आणि फेऱ्या वाढविण्याचीही सूचना त्यांनी केली. क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे धोरण स्विकारण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
त्याचप्रमाणे अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यासाठी भाडोत्री का असेना, पण तातडीने खाजगी क्रेनची उपलब्धता होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

महामार्गावर वैद्यकीय सेवा उपलब्धतेसाठी...
मुंबई-गोवा महामार्गावरील महाड, संगमेश्वर आणि कळंबी येथील ट्रॉमा केअर सेंटर तातडीने कार्यान्वित करण्याची गरज श्री. भुजबळ यांनी व्यक्त केली. त्यावर महाड आणि कळंबी येथील सेंटर्स तातडीने सुरू करण्यात येतील, मात्र संगमेश्वरला थोडा अधिक वेळ लागणार असल्याची माहिती श्री. गगराणी यांनी श्री. भुजबळ यांना दिली. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत राज्याला 950 ऍम्ब्युलन्स मंजूर करण्यात आल्या असून त्यातील 72 कोकणासाठी मिळणार आहेत. तथापि, अद्याप निविदा प्रक्रिया सुरू असल्याने त्या येण्यास विलंब लागणार आहे. त्यामुळे तातडीच्या प्रसंगी स्थानिक पातळीवर भाडोत्री ऍम्ब्युलन्सची सोय करण्यात येऊ शकेल, असेही गगराणी यांनी सांगितले.

शुक्रवार, २० मे, २०११

हवेत उडणारे आले जमिनीवर...

तीव्र उन्हाचेचटके झाडावरही बसू लागल्यामुळे अखेर हवेत उडणार्‍यांनाही जमिनीवर यावेच लागले...

सिडकोची साडेबारा टक्के भूखंड वाटप संगणकीय सोडत संपन्न

नवी मुंबई, ता. १९: येथील मौजे-उलवे नोडमधील भूमीपुत्रांसाठी साडेबारा टक्के योजने अंतर्गत भूखंड वाटपाची संगणकीय सोडत यापूर्वी अंतिम केलेल्या ज्येष्ठता यादीनुसार नुकतीच सिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील यांच्या उपस्थितीत निर्मल-नरिमन पॉईंट येथे संपन्न झाली.
उलवे विभागातील संगणकीय सोडतीला सिडको अध्यक्ष नकुल पाटील,  नगर विकास विभागाचे मुख्यसचिव टी. सी. बेंजामिन, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे आणि नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त भास्कर वानखेडे उपस्थित होते. उलवे सोडतीच्या निकालाशी संबंधित प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या भूखंडांची इरादापत्रे ८ दिवसात रजिस्टर पोस्टाने पाठविण्यात येतील. नागरिकांच्या माहितीसाठी सोडतीच्या निकालाची यादी सिडको भवन, तळमजला, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई व सिडकोच्या www.cidcoindia.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक भूमी व भूमापन अधिकारी सूर्यकांत राठोड यांच्याशी ०२२-६७९९ ८६६४ येथे तसेच सिडको भवन, सातवा मजला, सी. बी. डी. बेलापूर, नवी मुंबई ४००६१४ येथे संपर्क साधावा.

गुरुवार, १९ मे, २०११

अद्ययावत मासळी बाजार उभारण्यासाठी नगरपालिकांना पाच टक्के अनुदान: उपमुख्यमंत्री

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई ता. १९ - मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी नगरपालिका क्षेत्रात अद्ययावत मासळी बाजार उभारण्यासाठी राज्य शासनातर्फे पाच टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
नुकतीच मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात आधुनिक मासळी बाजारपेठ उभारण्यासंदर्भात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मत्स्यविकासमंत्री मधुकरराव चव्हाण, राज्यमंत्री भास्कर जाधव तसेच मत्स्यविकास आयुक्त हणमंतराव पवार आदी वरिष्ठ उपस्थित होते.
यावेळी श्री. पवार म्हणाले, की राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये अद्ययावत मासळीबाजार उभारण्यासाठी राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळातर्फे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. हा बाजार उभारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची कमाल मर्यादा असून यापैकी ९० टक्के रक्कम राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळ देते तर उर्वरीत १० टक्के रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांना भरावी लागेल. या १० टक्क्यांपैकी केवळ नगरपालिका आणि नगरपंचायतींना राज्य शासन ५ टक्के रक्कम अनुदान स्वरुपात देणार आहे. महानगरपालिकांना मात्र १० टक्के रक्कम स्वतः उभारावी लागणार आहे.
अशा प्रकारचा मासळी बाजार उभा करण्यासाठी राज्यातील मुरबाड, कुळगाव-बदलापूर, बारामती, डहाणू नगरपालिकांनी तसेच वसई-विरार महानगरपालिकेने बोळींज, आगाशी, जुचंद्र येथे तसेच पुणे महानगरपालिकेने गणेश पेठ येथे हा बाजार उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. या बाजार उभारणी प्रकल्पांसाठी २३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे. यापैकी मत्स्यिकी विकास मंडळ १७ कोटी ९० लाख रुपये अनुदान स्वरूपात देणार आहे.
भारतात दरवर्षी प्रतिमाणसी केवळ ४ किलो ८०० ग्रॅम मासळी खाल्ली जाते. जपानमध्ये हे प्रमाण ७५ किलो, चीनमध्ये २५ किलो तर अमेरिकेत २२ किलो ६०० ग्रॅम इतके आहे. भारतात मासळी उत्पादनापैकी १५ टक्के उत्पादन निर्यात होते, तर उर्वरीत ८५ टक्के उत्पादनाचा उपयोग खाद्यान्न म्हणून केला जातो.

सोमवार, १६ मे, २०११

कोकणच्या समुद्रकिनार्‍यांची भुजबळांनी केली हवाई पाहणी


मुंबई, ता. १३ - राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आज राज्याच्या निसर्गसंपन्न कोकण किनारपट्टीची हवाई पाहणी केली.
महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा वैभवशाली समुद्रकिनारा लाभला आहे. ही किनारपट्टी म्हणजे कोकणच्या सर्वांगीण पर्यटन विकासाची गुरूकिल्ली आहे. हीच बाब हेरून श्री. भुजबळ यांनी कोकणच्या विकासाला चालना देण्याचे धोरण स्वीकारले आहे. यावेळी त्यांचे समवेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी होते.
श्री. भुजबळ यांनी मांडवा, किहीम, रेवस, जयगड किल्ला जयगड जेटी, कुणकेश्वर येथील केशवसुत स्मारकाची पाहणी केली. याचबरोबर गणपतीपुळे येथील मंदीर व परिसर तसेच तेथील एमटीडीसीच्या रिसॉर्टमधील व्यवस्थेचीही पाहणी केली.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...