गुरुवार, २१ एप्रिल, २०११
सुट्टीची भटकंती...
उन्हाळ्याच्या सुट्ट्या अनेक ठिकाणी लागल्या आहेत. काही ठिकाणी लवकरच लागतील. आता काय? किमान पंचेचाळीस दिवस म्हणजेच दीड महिना मज्जाच मज्जा...। मध्यंतरी वार्षिक परीक्षा असल्यामुळे आम्हाला आई-बाबांनी अभ्यासाव्यतिरिक्त काहीच करू दिलं नव्हतं. तुझी परीक्षा झाल्यानंतर करायचं, ते कर..असं सांगून ते मोकळे झाले होते.
परीक्षा संपली आणि काय? दरवर्षाप्रमाणे आम्ही मित्र-मैत्रिणी सिनेमाला गेलो. आजकाल तर मल्टीप्लेक्स असल्यामुळे सगळीच धमाल येते. तिकिटाचे पैसे जास्त द्यावे लागतात हे खरं असलं तरीही तिथे छान एअर-कंडीशन, पॉपकॉर्न, सूप, आईस्क्रीम, शेंगदाणे, चिप्स, कोल्ड्रिंक्स अशा सगळ्या सोयी आतल्या आतच केलेल्या असल्यामुळे मध्यांतरात रस्त्यावर जायची गरज नाही. असंही रस्त्यावर वाहनांची इतकी वर्दळ असते की रस्ता ओलांडताना अपघात झाला नाही म्हणजे सुटलो एकदाचा...असं म्हणून परत येऊन आपल्या चेअरवर बसून सिनेमा पहायचा. हो, एक मात्र आहे..पूर्वी चित्रपटगृहात असलेले उंदीर आजही मल्टीप्लेक्समध्ये आहेत. ए.सी. ची हवा खाऊन ते अजूनच गलेलठ्ठ झाले आहेत. त्यांचीही नवीन पीढी आली असेल...
अनेक दिवसांपासून साचलेली झोप मी आता आठवडाभर घेणार आहे. नंतर गावाला जाण्याचा विचार करेन. पण गावाला नेमकं कुठे जाऊ? मित्रांबरोबर कुठेतरी ७-८ दिवसांसाठी जाऊ की नेहमीप्रमाणे गावाकडे, गावाला मामाकडे जाऊ? अशा द्विधा स्थितीत मी आहे. बघू या, काय प्लॅनिंग होतंय ते...। पुन्हा उद्या तुम्हांला मी भेटायला येईन..
नमस्कार!
परीक्षा संपली आणि काय? दरवर्षाप्रमाणे आम्ही मित्र-मैत्रिणी सिनेमाला गेलो. आजकाल तर मल्टीप्लेक्स असल्यामुळे सगळीच धमाल येते. तिकिटाचे पैसे जास्त द्यावे लागतात हे खरं असलं तरीही तिथे छान एअर-कंडीशन, पॉपकॉर्न, सूप, आईस्क्रीम, शेंगदाणे, चिप्स, कोल्ड्रिंक्स अशा सगळ्या सोयी आतल्या आतच केलेल्या असल्यामुळे मध्यांतरात रस्त्यावर जायची गरज नाही. असंही रस्त्यावर वाहनांची इतकी वर्दळ असते की रस्ता ओलांडताना अपघात झाला नाही म्हणजे सुटलो एकदाचा...असं म्हणून परत येऊन आपल्या चेअरवर बसून सिनेमा पहायचा. हो, एक मात्र आहे..पूर्वी चित्रपटगृहात असलेले उंदीर आजही मल्टीप्लेक्समध्ये आहेत. ए.सी. ची हवा खाऊन ते अजूनच गलेलठ्ठ झाले आहेत. त्यांचीही नवीन पीढी आली असेल...
अनेक दिवसांपासून साचलेली झोप मी आता आठवडाभर घेणार आहे. नंतर गावाला जाण्याचा विचार करेन. पण गावाला नेमकं कुठे जाऊ? मित्रांबरोबर कुठेतरी ७-८ दिवसांसाठी जाऊ की नेहमीप्रमाणे गावाकडे, गावाला मामाकडे जाऊ? अशा द्विधा स्थितीत मी आहे. बघू या, काय प्लॅनिंग होतंय ते...। पुन्हा उद्या तुम्हांला मी भेटायला येईन..
नमस्कार!
सोमवार, १८ एप्रिल, २०११
वि.आ. बुवा यांच्या निधनामुळे उत्कृष्ट विनोदी साहित्यिक हरपला - छगन भुजबळ
मुंबई, दि. 17 एप्रिल : ज्येष्ठ साहित्यिक वि.आ. बुवा यांच्या निधनामुळे मराठी विनोदी साहित्यसृष्टी समृध्द करणारा उत्कृष्ट साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, मराठी विनोदी साहित्यात चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे यांच्यानंतर उदयाला आलेल्या रमेश मंत्री, सुभाष भेंडे, बाळ गाडगीळ या विनोदी साहित्यिकांच्या पंक्तीमध्ये वि.आ. बुवा यांचाही अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. खुमासदार शैली, प्रासंगिक विनोद आणि अत्यंत साधी सोपी भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्टये होती. 'बुवा उवाच', 'परमेश्वराला रिटायर करा' आदी अनेक विनोदी कथासंग्रह, लेखसंग्रह, ललितसंग्रह, कादंबरी अशा विविध साहित्यप्रकारांतून त्यांनी विपुल विनोदी लेखन केले. विविध वृत्तपत्रांतून त्यांच्या स्तंभलेखनालाही मोठी वाचकप्रियता लाभली. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्यसृष्टीची मोठी हानी झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
रविवार, १७ एप्रिल, २०११
गुरुवार, १४ एप्रिल, २०११
डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतीस छगन भुजबळ यांचे अभिवादन
मुंबई, दि. 14 एप्रिल : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 120व्या जयंतीनिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज सकाळी दादरच्या चैत्यभूमीस भेट देऊन त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.
चैत्यभूमी येथे आज सकाळपासूनच आंबेडकरी जनतेच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. यावेळी चैत्यभूमीचे दर्शन घेणाऱ्या मान्यवरांमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मंत्री जयंत पाटील, मंत्री वर्षा गायकवाड, मुंबईच्या महापौर श्रध्दा जाधव, खासदार एकनाथ गायकवाड, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र वर्मा, डॉ. राजेंद्र गवई, माजी आमदार संजय दत्त, महेंद्र साळवे, चंद्रकांत कसबे, नागसेन कांबळे आदींचा समावेश होता.
याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग नाक्यावरील चौकाचे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक चौक' असे नामकरण करण्यात आले. या कार्यक्रमासही मुख्यमंत्र्यांसह सर्व मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी आंबेडकर यांच्याविषयी नरेंद्र वाबळे यांनी तयार केलेल्या विशेषांकाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भूमीपुत्रांना विकासातील भागीदार बनविणे आवश्यक - भुजबळ
मुंबई, दि. 14 एप्रिल : महाराष्ट्राची तसेच देशाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी भूमीपुत्रांना विकासातील भागीदार बनविणे अत्यावश्यक आहे, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ (एमईडीसी) आणि अमेरिकास्थित लॅम्ब्डा-अल्फा इंटरनॅशनल (एलएआय) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 'युज ऑफ लँड रिसोर्सेस इन द डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्रा' या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय परिषदेचे उद्धाटन केल्यानंतर ते बोलत होते. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात हा उद्धाटन समारंभ झाला.
विकासकामांमध्ये राजकारण आणण्याऐवजी विकासासाठी राजकारण करण्यास आपले प्राधान्य असल्याचे सांगून श्री. भुजबळ म्हणाले की, कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी जमीन हा अत्यंत मूलभूत व आवश्यक घटक आहे. शासन अथवा खाजगी विकासक या दोन्ही घटकांनी जमीनमालकांना विश्वासात घेऊन आपल्या सद्हेतूंविषयी त्यांची खात्री पटविली तर कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळे कोणताही प्रकल्प उभारत असताना तो ज्या जमिनीवर उभा करण्यात येत आहे, त्या शेतकरी, अल्पभूधारक तसेच सर्वसामान्य जनतेच्या हितरक्षणास सर्वच संबंधितांनी सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.
यापुढील काळात राज्याची आर्थिक प्रगती खऱ्या अर्थाने साधावयाची झाल्यास सार्वजनिक-खाजगी भागीदारीला (पी-पी-पी) पर्याय नसल्याचे स्पष्ट करून श्री. भुजबळ म्हणाले की, केवळ शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदींतून पायाभूत सुविधा विकासाचे मोठमोठे प्रकल्प हाती घेणे आणि विहित मुदतीत पूर्ण करणे अशक्य असते. त्यामुळे 'पीपीपी' तत्त्वावर प्रकल्प उभारणेच अधिक उपयुक्त ठरते. सार्वजनिक बांधकाम विभागासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात केवळ 2749 कोटींची तरतूद करण्यात आली असताना अजघडीला राज्यात सुमारे 50 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे प्रकल्प खाजगीकरणाच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहेत. केवळ अर्थसंकल्पावर अवलंबून राहिल्यास यातला एखादा प्रकल्पही निर्धारित वेळेत पूर्ण करणे शक्य होऊ शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी श्री. भुजबळ यांच्या उपस्थितीत 'एमईडीसी' व 'एलएआय' यांच्यात 'आर्थिक विकासासाठी जमिनीचा वापर' यासंदर्भात परस्पर सहकार्याचा सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि आर्थिक विकासाला निश्चितपणे लाभ होईल, अशी आशा श्री. भुजबळ यांनी व्यक्त केली.
सुरवातीला 'एमईडीसी'चे अध्यक्ष विठ्ठल कामत यांनी प्रास्ताविक केले. अमेरिकन कॉन्सुलेटचे राजकीय व आर्थिकविषयक प्रमुख रॉबर्ट कार्लसन यांचेही यावेळी भाषण झाले. या कार्यक्रमास 'एलएआय'च्या अध्यक्ष डॉ. कॅरन सिएरॅकी, राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकारी, एमईडीसीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. डॉ.सी.एस. देशपांडे यांनी आभार मानले.
राज्यात 3 लाख 36 हजार किलोमीटर रस्तेविकासाचे उद्दिष्ट- भुजबळ
मुंबई, दि. 13 एप्रिल : राज्याच्या रस्ते विकास योजना 1981-2001ची मुदत संपली असल्याने रस्ते विकासाचा पुढील 20 वर्षीय आराखडा तयार करण्यात आलेला असून त्यानुसार 3,36,994 किलोमीटर लांबीच्या रस्तेविकासाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत दिली.
सार्वजनिक बांधकाम व पर्यटन विभागांच्या सन 2011-12च्या अर्थसंकल्पातील मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 7880.71 कोटी रुपयांच्या 11 मागण्या मंजुरीसाठी असून यापैकी 3812.68 कोटी रुपयांच्या मागण्या योजनांतर्गत तर 4068.03 कोटी रुपयांच्या मागण्या योजनेतर असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
श्री. भुजबळ म्हणाले, राज्याच्या सन 2001-21च्या नूतन रस्ते विकास आराखडयानुसार राज्यातील 100 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेली खेडी किमान एका बारमाही रस्त्याने जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा आराखडा पूर्ण होण्यासाठी साधारणपणे 1,09,000 कोटी रुपये एवढया निधीची आवश्यकता भासणार आहे. राज्याच्या वार्षिक योजनेतून उपलब्ध होणारा अल्प निधी विचारात घेता हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नाबार्ड कर्जसहाय्य, केंद्रीय मार्ग निधी, पंतप्रधान ग्रामसडक योजना, जिल्हा नियोजन समिती इत्यादी योजनांच्या माध्यमातून तसेच खाजगीकरणाच्या माध्यमातूनही जास्तीत जास्त रस्त्यांचा विकास करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सन 2011-12मध्ये रस्ते विकासासाठी अर्थसंकल्पामध्ये एकंदरीत 2749 कोटी रुपयांचा नियतव्यय प्राप्त झाल्याची माहिती देऊन श्री. भुजबळ म्हणाले की, या निधीमधून केंद्रीय मार्ग निधीसाठी 435 कोटी रुपये, नाबार्डसाठी 500 कोटी रुपये, खाजगीकरणातील शासन सहभागासाठी 150 कोटी रुपये, राज्यमार्गावरील कामांकरिता 795 कोटी रुपये, जिल्हा व इतर कामांसाठी 706 कोटी रुपये, साकवांसाठी 17.76 कोटी रुपयांची तसेच राज्य रस्ते विकास महामंडळासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. विभागाच्या निवासी इमारतींसाठी 22.96 कोटी आणि शासकीय इमारती, विश्रामगृहे यांच्यासाठी 104 कोटी अशी एकूण 127 कोटींची तरतूद प्रस्तावित असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामाची माहिती देताना श्री. भुजबळ म्हणाले, सध्या राज्यात 669 किलोमीटर लांबीची 2838 कोटी रुपये किंमतीच्या राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच 3049 किलोमीटर लांबीची 19,000 कोटी रुपयांची चौपदरीकरणाची कामे मंजूर अथवा प्रगतीपथावर आहेत. राष्ट्रीय महामार्गांच्या सहापदरीकरणाची 413 किलोमीटर लांबीची 4762 कोटी रुपये किंमतीची कामे प्रगतीपथावर आहेत. यात सूरत-दहिसर, पुणे-सातारा-कागल राज्यहद्द, गोंदे-नाशिक-पिंपळगाव या कामांचा समावेश आहे. राज्यातील एकूण 4327 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांपैकी 3478 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे चौपदरीकरण वा सहापदरीकरण 21,937 कोटी रुपये खर्चून करण्यात येत आहे. खाजगीकरणातून राज्यात 1923 किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाचे 9305 कोटी रुपयांचे प्रकल्प नियोजन स्तरावर असून खाजगीकरणाच्या माध्यमातून जे प्रकल्प पूर्णत: सुसाध्य होत नाहीत, अशा 1262 किलोमीटर लांबीच्या 4736 कोटीच्या 15 प्रकल्पांमध्ये शासनाने आर्थिक सहभाग देण्याचे ठरविले आहे. यासाठी 1847 कोटी रुपयांचा एकूण निधी शासन सहभाग म्हणून मंजूर करण्यात आला असून यातील 854 कोटी एवढी रक्कम केंद्र शासनाकडून प्राप्त होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 17 च्या कामाच्या प्रगतीविषयीही श्री. भुजबळ यांनी माहिती दिली. ते म्हणाले, महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातील काम येत्या दोन महिन्यांत सुरू होणे अपेक्षित आहे. कर्नाळा अभयारण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याचे काम मागे ठेवण्यात येणार असले तरी त्यावर आता भुयारी मार्गाच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार सुरू आहे. इंदापूर ते झाराप या टप्प्यातील मार्गाचा सुसाध्यता अहवाल येत्या महिन्याभरात मिळेल. त्यानंतर अन्य प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्यास एक वर्ष लागेल. झाराप ते पत्रादेवी या टप्प्यातील मार्गाचे काम समाधानकारकरित्या सुरू असून 183 कोटी रुपयांपैकी 157 कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले आहेत.
राज्यात सप्तशृंगीगड व हाजी मलंग गड या ठिकाणी फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम लवकरच सुरू होणार असून जेजुरी गड आणि माहूर गड येथील कामांना लवकरच मंजुरी मिळणे अपेक्षित असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
राज्यात सागरी महामार्गाच्या एकूण 786 किलोमीटर लांबीपैकी 759 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, या महामार्गावरील एकूण 51 पुलांपैकी 41 पुलांचे काम पूर्ण झाले असून 4 पुलांची कामे मंजूर झाली आहेत. उर्वरित सहा पुलांची व सुटलेल्या लांबीची (Missing Link) काम पूर्ण करणे आवश्यक असून त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात बाणकोट, काळेश्री व धरमतर खाडी तसेच 10 किलोमीटर लांबीची मिसिंग लिंक असा एकूण 504 कोटी रुपये एवढया किंमतीचा प्रस्ताव नाबार्डकडे प्रस्तावित केलेला असून त्यापैकी बाणकोट खाडीवरील 297 कोटी रुपये किंमतीच्या कामास नाबार्डने मान्यता दिल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर कामे हाती घेण्यात आली असून आतापर्यंत राज्यात 2440 कोटी रुपये किंमतीची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामधून सुमारे 5171 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सुधारणा करण्यात आली आहे. 443 पुलांची कामे पूर्ण झाली आहेत. या आर्थिक वर्षात या योजनेंतर्गत 435.50 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित असून त्यातून 850 किलोमीटर लांबीच्या रस्तेविकासाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नाबार्ड कर्जसहाय्यित रस्ते विकासासाठी आतापर्यंत 2712 कोटी रुपयांचे कर्जसहाय्य प्राप्त झाले असून त्यातून 17,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सुधारणा करण्यात आली असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.
जगातल्या लक्झरी ट्रेनपैकी एक उत्कृष्ट म्हणून गणल्या जाणाऱ्या डेक्कन ओडिसीच्या राज्यात पूर्ववत सहली सुरू होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असून सात दिवसांच्या मोठया सहलींऐवजी दोन-तीन दिवसांच्या छोटया सहली चालविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
लोणार सरोवरात मंगळावरील विषाणूंप्रमाणे विषाणू सापडल्याची माहिती आजच प्रसिध्द झाली असून तज्ज्ञ समिती नेमून त्यासंदर्भात अभ्यास करण्यात येईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.
कोकणच्या पर्यटन विकासासाठी केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या 225 कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला ही बाब खरी असली तरी येत्या वर्षभरात त्यातला जास्तीत जास्त निधी खर्च करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या 225 कोटी रुपयांमध्ये मुंबई व एमटीडीसीसाठी 33.5 कोटी, ठाणे जिल्ह्यासाठी 18.89 कोटी, सिंधुदुर्गसाठी 70.90 कोटी, रत्नागिरीसाठी 36.86 कोटी आणि रायगड जिल्ह्यासाठी 24.60 कोटी रुपयांची तरतूद असल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक बांधकाम व पर्यटन विभागांच्या सन 2011-12च्या अर्थसंकल्पातील मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 7880.71 कोटी रुपयांच्या 11 मागण्या मंजुरीसाठी असून यापैकी 3812.68 कोटी रुपयांच्या मागण्या योजनांतर्गत तर 4068.03 कोटी रुपयांच्या मागण्या योजनेतर असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
श्री. भुजबळ म्हणाले, राज्याच्या सन 2001-21च्या नूतन रस्ते विकास आराखडयानुसार राज्यातील 100 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेली खेडी किमान एका बारमाही रस्त्याने जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा आराखडा पूर्ण होण्यासाठी साधारणपणे 1,09,000 कोटी रुपये एवढया निधीची आवश्यकता भासणार आहे. राज्याच्या वार्षिक योजनेतून उपलब्ध होणारा अल्प निधी विचारात घेता हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नाबार्ड कर्जसहाय्य, केंद्रीय मार्ग निधी, पंतप्रधान ग्रामसडक योजना, जिल्हा नियोजन समिती इत्यादी योजनांच्या माध्यमातून तसेच खाजगीकरणाच्या माध्यमातूनही जास्तीत जास्त रस्त्यांचा विकास करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सन 2011-12मध्ये रस्ते विकासासाठी अर्थसंकल्पामध्ये एकंदरीत 2749 कोटी रुपयांचा नियतव्यय प्राप्त झाल्याची माहिती देऊन श्री. भुजबळ म्हणाले की, या निधीमधून केंद्रीय मार्ग निधीसाठी 435 कोटी रुपये, नाबार्डसाठी 500 कोटी रुपये, खाजगीकरणातील शासन सहभागासाठी 150 कोटी रुपये, राज्यमार्गावरील कामांकरिता 795 कोटी रुपये, जिल्हा व इतर कामांसाठी 706 कोटी रुपये, साकवांसाठी 17.76 कोटी रुपयांची तसेच राज्य रस्ते विकास महामंडळासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. विभागाच्या निवासी इमारतींसाठी 22.96 कोटी आणि शासकीय इमारती, विश्रामगृहे यांच्यासाठी 104 कोटी अशी एकूण 127 कोटींची तरतूद प्रस्तावित असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामाची माहिती देताना श्री. भुजबळ म्हणाले, सध्या राज्यात 669 किलोमीटर लांबीची 2838 कोटी रुपये किंमतीच्या राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच 3049 किलोमीटर लांबीची 19,000 कोटी रुपयांची चौपदरीकरणाची कामे मंजूर अथवा प्रगतीपथावर आहेत. राष्ट्रीय महामार्गांच्या सहापदरीकरणाची 413 किलोमीटर लांबीची 4762 कोटी रुपये किंमतीची कामे प्रगतीपथावर आहेत. यात सूरत-दहिसर, पुणे-सातारा-कागल राज्यहद्द, गोंदे-नाशिक-पिंपळगाव या कामांचा समावेश आहे. राज्यातील एकूण 4327 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांपैकी 3478 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे चौपदरीकरण वा सहापदरीकरण 21,937 कोटी रुपये खर्चून करण्यात येत आहे. खाजगीकरणातून राज्यात 1923 किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाचे 9305 कोटी रुपयांचे प्रकल्प नियोजन स्तरावर असून खाजगीकरणाच्या माध्यमातून जे प्रकल्प पूर्णत: सुसाध्य होत नाहीत, अशा 1262 किलोमीटर लांबीच्या 4736 कोटीच्या 15 प्रकल्पांमध्ये शासनाने आर्थिक सहभाग देण्याचे ठरविले आहे. यासाठी 1847 कोटी रुपयांचा एकूण निधी शासन सहभाग म्हणून मंजूर करण्यात आला असून यातील 854 कोटी एवढी रक्कम केंद्र शासनाकडून प्राप्त होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 17 च्या कामाच्या प्रगतीविषयीही श्री. भुजबळ यांनी माहिती दिली. ते म्हणाले, महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातील काम येत्या दोन महिन्यांत सुरू होणे अपेक्षित आहे. कर्नाळा अभयारण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याचे काम मागे ठेवण्यात येणार असले तरी त्यावर आता भुयारी मार्गाच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार सुरू आहे. इंदापूर ते झाराप या टप्प्यातील मार्गाचा सुसाध्यता अहवाल येत्या महिन्याभरात मिळेल. त्यानंतर अन्य प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्यास एक वर्ष लागेल. झाराप ते पत्रादेवी या टप्प्यातील मार्गाचे काम समाधानकारकरित्या सुरू असून 183 कोटी रुपयांपैकी 157 कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले आहेत.
राज्यात सप्तशृंगीगड व हाजी मलंग गड या ठिकाणी फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम लवकरच सुरू होणार असून जेजुरी गड आणि माहूर गड येथील कामांना लवकरच मंजुरी मिळणे अपेक्षित असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
राज्यात सागरी महामार्गाच्या एकूण 786 किलोमीटर लांबीपैकी 759 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, या महामार्गावरील एकूण 51 पुलांपैकी 41 पुलांचे काम पूर्ण झाले असून 4 पुलांची कामे मंजूर झाली आहेत. उर्वरित सहा पुलांची व सुटलेल्या लांबीची (Missing Link) काम पूर्ण करणे आवश्यक असून त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात बाणकोट, काळेश्री व धरमतर खाडी तसेच 10 किलोमीटर लांबीची मिसिंग लिंक असा एकूण 504 कोटी रुपये एवढया किंमतीचा प्रस्ताव नाबार्डकडे प्रस्तावित केलेला असून त्यापैकी बाणकोट खाडीवरील 297 कोटी रुपये किंमतीच्या कामास नाबार्डने मान्यता दिल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर कामे हाती घेण्यात आली असून आतापर्यंत राज्यात 2440 कोटी रुपये किंमतीची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामधून सुमारे 5171 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सुधारणा करण्यात आली आहे. 443 पुलांची कामे पूर्ण झाली आहेत. या आर्थिक वर्षात या योजनेंतर्गत 435.50 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित असून त्यातून 850 किलोमीटर लांबीच्या रस्तेविकासाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नाबार्ड कर्जसहाय्यित रस्ते विकासासाठी आतापर्यंत 2712 कोटी रुपयांचे कर्जसहाय्य प्राप्त झाले असून त्यातून 17,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सुधारणा करण्यात आली असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.
पर्यटनासाठी 215 कोटी रुपयांची तरतूद
राज्याच्या पर्यटन विकासासाठी यंदा 215 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी प्रादेशिक विकास योजनेसाठी 180 कोटी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासाठी 25 कोटी आणि केंद्र पुरस्कृत राज्य शासनाच्या सहभागासाठी 10 कोटी रुपये अशी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती श्री. भुजबळ यांनी यावेळी दिली.जगातल्या लक्झरी ट्रेनपैकी एक उत्कृष्ट म्हणून गणल्या जाणाऱ्या डेक्कन ओडिसीच्या राज्यात पूर्ववत सहली सुरू होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असून सात दिवसांच्या मोठया सहलींऐवजी दोन-तीन दिवसांच्या छोटया सहली चालविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
लोणार सरोवरात मंगळावरील विषाणूंप्रमाणे विषाणू सापडल्याची माहिती आजच प्रसिध्द झाली असून तज्ज्ञ समिती नेमून त्यासंदर्भात अभ्यास करण्यात येईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.
कोकणच्या पर्यटन विकासासाठी केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या 225 कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला ही बाब खरी असली तरी येत्या वर्षभरात त्यातला जास्तीत जास्त निधी खर्च करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या 225 कोटी रुपयांमध्ये मुंबई व एमटीडीसीसाठी 33.5 कोटी, ठाणे जिल्ह्यासाठी 18.89 कोटी, सिंधुदुर्गसाठी 70.90 कोटी, रत्नागिरीसाठी 36.86 कोटी आणि रायगड जिल्ह्यासाठी 24.60 कोटी रुपयांची तरतूद असल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
बुधवार, १३ एप्रिल, २०११
भूकंपांमुळे जपानवर किरणोत्सर्गाचा धोका वाढतोय
११ मार्च २०११ ला जपानमध्ये झालेल्या मोठ्या भूकंपानंतर सावरण्याच्या बेतात असलेल्या जपानवर पुन्हा एकदा निसर्गाची कुर्हाड कोसळली आहे. एक महिन्याने म्हणजेच ११ एप्रिलला देखील येथे भूकंप झाला, परंतू ६.३ रिश्टर स्केल झाल्यामुळे त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. परंतू फुकूशिमा मधील किरणोत्सर्गाची पातळी दररोज वाढतच असून आता ७ झाली आहे. विविध अन्नपदार्थ, खाद्यपदार्थ, फळभाज्या, पालेभाज्यांमध्ये देखील किरणोत्सर्ग वाढल्यामुळे नागरीकांचा हा चिंतेचा विषय बनला आहे. विविध कार्यालयांमधील कर्मचार्यांची तपासणी देखील विशेष उपकरणांद्वारे करण्यात येत असून बाजारात सुद्धा उपकरणांच्या सहाय्याने भाज्यांची तपासणी केली जात आहे. अणूप्रकल्पाच्या सुमारे चाळीस किलोमीटर परीसरातील लोकांना आणखी दूर पाठविण्याचे नियोजन सरकार करणार आहे.
आता फक्त हल्ला...
26/11 च्या मुंबई हल्ल्यात पाकिस्तान सरकारचाच हात असल्याची कबूली अमेरिकेत सध्या ताब्यात असलेल्या तहव्वूर हुसेन राणा याने दिली आहे. मुंबई हल्ल्याचे कारस्थान पाकिस्तान सरकार आणि "आयएसआय' या गुप्तहेर संघटनेच्या पुढाकाराने रचण्यात आले अशी कबूली राणा याने नुकतीच दिल्याचे सूत्रांनी सांगितले. राणा याच्या विरुद्ध मुंबई हल्ल्याचा कट रचल्याबद्दल खटला अमेरिकेच्या एका न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. आपल्या बचावासाठी तो महत्वाची कागदपत्रं सादर करणार असून येत्या १६ मे स खटला सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. न्यायालयाभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था आतापासूनच उभारण्यात आली आहे.
मंगळवार, १२ एप्रिल, २०११
50th Anniversary of the first Human SpaceFlight (12 Apr. 1961)
युरी गागारिन
युरी अलेक्सेइविच गागारिन ९ मार्च, इ.स. १९३४ - २७ मार्च, इ.स. १९६८ हा सोवियेत संघाचा अंतराळयात्री होता.
युरीचा जन्म सोवियत संघाच्या ग्रामीण भागातील एका गरीब कुटंबात झाला. घरच्या परिस्थितीमुळे लहान वयातच धातूच्या ओतकामाच्या कारखान्यात फाउण्ड्रीमन म्हणून युरी काम करू लागला. अविश्रांत कष्ट आणि तीव्र बुद्धिमत्ता असल्याने एक चांगला कामगार म्हणून युरीचे नाव झाले. त्याला विमानाच्या कारखान्यात नोकरीची संधी आली. याही कामात त्याने मेहनत घेऊन नाव कमावल्याने त्याला विमानदलात घेण्यात आले. हळूहळू युरीला अंतराळवीर होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.
एप्रिल १२, इ.स. १९६१ रोजी गागारिन अंतराळात जाणारा सर्वप्रथम माणूस ठरला. पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरीने ८९ तास ३४ मिनिटे भ्रमण केले. या पराक्रमाबद्दल त्याला अनेक देशांचे पुरस्कार मिळाले. त्यात ऑनर ऑफ लेनिन आणि सोवियत संघाचा नायक या पुरस्कारांचाही समावेश आहे.
वयाच्या ३४ व्या वर्षी एका विमान अपघातात युरीचा मृत्यु झाला.
(सौजन्य- इंटरनेट)
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...


