शुक्रवार, ८ एप्रिल, २०११

कर्नाळा अभयारण्याच्या हद्दीत भुयारी मार्ग प्रस्तावित: भुजबळ

मुंबई, ता. ८ (विशेष प्रतिनिधी) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ च्या चोपदरीकरणाच्या कामामध्ये पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातील कर्नाळा अभयारण्याच्या हद्दीतून जाणार्‍या रस्त्याबाबत गेले वर्षभर केंद्र शासनाकडे पाठपुरावा करूनही काही निष्पन्न न झाल्याने या वनविभागातील हद्दीपुरता भुयारी मार्ग तयार करण्याचे प्रस्तावित असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत सांगितले.
सर्वश्री सुभाष देसाई, भरतशेठ गोगावले, राजन साळवी, सदानंद चव्हाण, रवींद्र वायकर, विनोद घोसाळकर, प्रकाश सावंत, सूर्यकांत दळवी, विजय शिवतारे, महादेव बाबर या सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेसंदर्भात निवेदन करताना श्री. भुजबळ बोलत होते. महाड-संगमेश्वर येथे ट्रॉमा केअर हॉस्पिटलची कामे गतीने सुरू असून लवकरच ती कार्यान्वित होतील अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली.
यावेळी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी ट्रॉमा केअर सेंटरला परवानगी देत असतानाच त्याठिकाणी आवश्यक पदनिर्मिती तसेच आधुनिक यंत्रणा उपलब्ध करण्याची तरतूद करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांना केली. यावर, ट्रॉमा केअर सेंटर उभारतानाच त्यासाठीच्या फर्निचरसह अन्य वैद्यकीय सामग्रीसाठी तरतूद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती श्री. पवार यांनी दिली.

'धन्य धन्य ज्योतिबा फुले' सीडीचे प्रकाशन

मनमाड येथील वैशाली व महेश खरे निर्मित 'धन्य धन्य ज्योतिबा फुले' सीडीचे प्रकाशन करताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ.

अण्णांच्या आंदोलनास वीक-एन्डचा लाभ होण्याची शक्यता...

लोक-पाल विधेयकाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी दिल्ली येथील जंतरमंतर समोर गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत उपोषणास बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनास या आठवड्याच्या वीक-एन्डचा (ता. ९ व १० एप्रिल) लाभ निश्चित होऊ शकतो. अण्णांचे सपोर्टर्स म्हणून युवक देखील मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. इतकेच नाही, तर बॉलीवुडमधील कलाकार देखील अण्णांना पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. शनिवारी आणि रविवारी अनेक ठिकाणी कार्यालयांना वीक-एन्डची सुटी आहे. परिणामी या कार्यालयात नोकरी करणारे अनेक युवक या दोन दिवसात अण्णा हजारे यांच्या उपोषण स्थळी भेट देऊन आपला पाठिंबा देतील, अशी शक्यता आहे.

आसाम मध्ये सर्वत्र साजरा केला जाणारा "बिहु"..

आमच्या आसामच्या मित्राने दिलेली "बिहू" विषयी थोडक्यात माहिती...

प्रत्‍येक बिहू कृषि कलेन्‍डर के विशिष्‍ट अवसर पर पड़ता है। तीनों बिहू उत्‍सवों में सबसे आकर्षक, बसंत ऋतु का उत्‍सव 'बोहाग बिहू' अथवा रंगाली बिहू होता है जो मध्‍य अप्रैल में मनाया जाता है, जिससे कृषि ऋतु का प्रारम्‍भ होता है। बिहू असम के सबसे ज्‍यादा प्रचलित लोक नृत्य को दिया गया नाम है, जिसका सभी जवान व बूढ़े, अमीर व ग़रीब आनन्‍द लेते हैं। नृत्‍य बिहू उत्‍सव का अंग हैं, जो मध्‍य अप्रैल में पड़ता है। जब फ़सल कटाई होती है और जो लगभग एक महीने तक चलती है। इससे असम के कलेन्‍डर की भी शुरूआत होती है।

बिहू नृत्‍य युवा लड़के व लड़कियों द्वारा खुले मैदान में किया जाता है, तथापि वे आपस में नहीं मिलते हैं। पूरा गांव नृत्‍य में हिस्‍सा लेता है, चूंकि नर्तक घर-घर में जाते हैं। इस नृत्‍य की पहचान तेजी से क़दम उठाना, हाथों को उछालना व चुटकी बजाना तथा कूल्‍हे मटकाना है जो कि युवाओं के मनोभाव का द्योतक है। कलाकार कभी-कभी गीत गाते हैं। नृत्‍य धीमी गति से आरंभ होता है, और जैसे-जैसे नृत्‍य आगे बढ़ता है इसकी गति तेज़ होती जाती है। 'ढोल' की सम्‍मोहक थाप और 'पेपा' (भैंसे के सींग से बनी तुरही) इस नृत्‍य का अंग हैं। बिहू नृत्‍य करते समय पारंपरिक वेशभूषा जैसे धोती, गमछा और चादर व मेखला पहनना अनिवार्य होता है। बिहू नृत्‍य, इसके विभिन्‍न रूपों में, फ़सल कटाई के विभिन्‍न स्‍तरों पर व नए मौसम के आगमन पर भी किया जाता है। इसकी सबसे सामान्‍य रचना गोलाकार अथवा समानान्‍तर पंक्तियों में होती है। बिहू के नृत्‍य व संगीत द्वारा असम वासियों की जीवन शक्ति के सर्वश्रेष्‍ठ रूप का दिग्‍दर्शन होता है।

बिहू सिर्फ हिंदू और असमिया ही नहीं मनाते, असम का पूरा जनसमुदाय इसके रंगों में सराबोर हो जाता है। वैसे तो असम में सालभर के दौरान तीन बार इस उत्सव का आयोजन होता है। किंतू बोहाग बिहू ही इनमें सबसे प्रमुख है। इस दौरान पूरे राज्य के लोग ही नहीं, बल्कि पेड, पौधे, पहाड भी सजीव हो उठते है। पहले तो यह उत्सव पूरे एक महीने तक चलता था। लेकिन जिंदगी की आपाधापी ने अब इसे एक सप्ताह तक सीमित कर दिया है। बिहु की शुरूआत सबसे पहले कब हुई, इसका क हीं कोई साफ जिक्र नही मिलता। लेकिन समझा जाता है कि ईसा से लगभग साढे तीन हजार साल पहले इसका आयोजन शुरू हुआ।
बिहु के दौरान राज्य में जगह-जगह मंच बना कर सात दिनों तक बिहूगीत व नृत्य का आयोजन किया जाता है। लोग नए कपडे पहनते है। सरकारी दफ्तरों में भी छुट्टियाँ होती है। यह उत्सव अनूमन हर साल १४ अप्रेल से शुरू होता है। असमिया नववर्ष भी बिहू से शुरू होता है।

What is "Jan Lokpal Bill"?

So many visitors of "Lekhani" Blog, were demanding that they want to know about "Jan Lokpal Bill". As per this demand, here tried to give few information for the same, through courtesy of internet and sources:


Jan Lokpal Bill
In India, the Jan Lokpal Bill (Citizen's ombudsman Bill) is a draft anti-corruption bill that would create a Jan Lokpal, an independent body like the Election Commission, which would have the power to prosecute politicians and bureaucrats without government permission.

The bill was drafted by Shanti Bhushan, former IPS Kiran Bedi, Justice N. Santosh Hegde, advocate Prashant Bhushan, former chief election commissioner J. M. Lyngdoh in consultation with the leaders of the India Against Corruption movement and the civil society. The bill proposes institution of the office of Lokpal (Ombudsman) at center and Lok Ayukta at state level. The Jan Lokpal Bill is designed to create an effective anti-corruption and grievance redressal systems and to assure that an effective deterrent is created against corruption and to provide effective protection to whistleblowers.

The Lokpal Bill drafted by the government has failed to pass the Rajya Sabha for 42 years. The first Lokpal Bill was passed in the 4th Lok Sabha in 1969 but could not get through in Rajya Sabh. Subsequently, Lokpal bills were introduced in 1971, 1977, 1985, 1989, 1996, 1998, 2001, 2005 and in 2008. Yet none of these bills were ever passed.

The movement for Jan Lokpal Bill started due to the resentment because of the serious differences between the draft Lokpal Bill 2010 prepared by the government and the Jan Lokpal Bill prepared by the members of this movement, which has received significant public support. Supporters of the bill consider existing laws to be too weak and insufficiently enforced to stop corruption.

Protests:
A group of Delhi residents dressed in white shirts and t-shirts took a four-hour drive around the city on March 13, 2011 to support a campaign against corruption and the Jan Lokpal Bill.

On April 5, 2011, anti-corruption activist Anna Hazare began a fast unto death till Jan Lokpal Bill enacted Around 6,000 Mumbai residents also started a one-day fast to support the demand for implementation of the Jan Lokpal Bill. Protesters have chosen yellow as the color of protests. They were seen wearing yellow dresses, T shirts and having yellow banners. Protesters in different cities are co-ordinating to observe Yellow Sunday.

Hazare also announced plans to start a Jail Bharo Andolan protest on 12th April, 2011 if the Jan Lokpal bill is not passed by the government. Hazare stated that his group has received six crore (60 million) SMSes in its support. He is further supported by a large number of Internet activists.

The protests are not political in nature. Political leaders were discouraged by Hazare supporters from joining in his protests, as Hazare indicated his belief that these parties were using the campaign for their own political advantage.
(this information & original may be vary)

कोकणच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन विकासासाठी प्रभावी प्रस्ताव सादर करा: भुजबळ

मुंबई, ता. ७ - कोकणात, विशेषतः सिंधूदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढीची मोठी क्षमता आहे. तसेच कोकणच्या किनारपट्टीवर निसर्ग सौंदर्याने समृद्ध असे समुद्र किनारे आहेत. यामुळे जगभरातून पर्यटक यावेत यासाठी कोकणला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर स्थान मिळावे, यासाठी पर्यटनविषयक मोजकेच परंतू प्रभावी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
बाराव्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या निधी अंतर्गत ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधूदुर्ग या कोकणपट्टीतल्या चार जिल्ह्यांमध्ये प्रस्तावित तसेच प्रगतीपथावरील कामांच्या सद्यस्थितीचा तपशीलवार आढावा घेण्यासाठी संबंधितांची बैठक भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जिल्ह्यातील पर्यटन, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते. या आयोगाच्या शिफारसीनुसार महाराष्ट्राला सन २००६ ते २०१० या तीन वर्षांच्या कालावधीत सागरी किनारा विकासाकरिता दरवर्षी ६२ कोटी ५० लाख रुपये यानुसार २२५ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. यापैकी ठाणे रु. १८ कोटी ८९ लाख, रायगड रु. २४ कोटी ८० लाख, रत्नागिरी रु. ५२ कोटी ५७ लाख, सिंधुदुर्ग रु. ८८ कोटी ९९ लाख आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ रु. ४५ कोटी ७३ लाख याप्रमाणे निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीत श्रीवर्धन, गणपतीपुळे, माथेरान, नेरळ, किल्लेरायगड, मुरुड जंजिरा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, बाणकोट किल्ला, बागमांडला, लोटे-परशुराम, हर्णे-मुरुड, गुहागर, आंगणेवाडी, रांगणागड, तारकर्ली, सावंतवाडी, कुणकेश्वर, मालवण, मिठबाव, आंबोली, निवती भोगवे, जयगड इ. विविध ठिकाणी मंजूर तसेच प्रगतीपथावरील कामांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.

मंगळवार, ५ एप्रिल, २०११

तर विश्वचषकाविषयी वास्तव सहज सामोरे येईल...

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
नुकत्याच पार पडलेल्या क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेच्या चषकाबद्दल सध्या दावे-प्रतिदावे सुरू आहेत. पूर्वविजेत्या श्रीलंकेतून आलेला विश्वचषक अद्याप आपल्याच ताब्यात असल्याचे कस्टम विभागाने म्हटले आहे. तर आयसीसी आणि बीसीसीआय ने विजेत्या भारतीय संघास देण्यात आलेला चषकच खरा विश्वचषक असल्याचे म्हटले आहे.
विविध वृत्तवाहिन्यांसह तज्ज्ञ मंडळी याबाबत विविध निष्कर्श काढत असून आयसीसी अध्यक्षांपासून कस्टम विभागाच्या वरिष्ठांपर्यंत सगळेच विविध विधाने करीत आहेत. हा चषक श्रीलंकेतून भारतात आणला गेल्यानंतर याची कस्टम ड्युटी २२ लाख रूपये देऊन चषक नेण्याबाबत सूत्रांना कळविण्यात आले होते. यानंतर विचाराअंती १५ लाख रूपये भरून चषक नेण्याबाबत कळविण्यात आल्याचे कस्टम विभागातर्फे सांगण्यात आल्याचे वृत्त आहे.
वास्तविक इतका घोळ घालण्याऐवजी गत विश्वचषक विजेत्या श्रीलंका संघाच्या पदाधिकार्‍यांना पाचारण करून विश्वचषकाचे खरे-खोटे सहज करता येणे शक्य आहे. याशिवाय कस्टम विभागाने आपल्या विधानाची सत्यता पडताळून दाखविण्यासाठी चषक श्रीलंकेतून आल्यानंतरची तयार झालेली कागदपत्रं अथवा पावती लोकांसमोर ठेवून वास्तव सामोरे आणावे. विश्वचषक स्पर्धा होऊन तीन दिवस झाल्यानंतर देखील अद्याप विविध विधाने करणे कोणासही साजेशे नाही...

भुजबळांनी गोव्यात पाहिली जीवरक्षक दलाची प्रात्यक्षिके!

म्हापसा, गोवा, दि. 4 एप्रिल : महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यांवर (बीचेस) जीवरक्षक सेवा सुरू करण्याचा आमचा मानस असून त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या समता मेळाव्याच्या निमित्ताने गोव्यात आलेल्या श्री. भुजबळ यांनी आज सकाळी येथील सिंकेरी बीचवर कार्यरत असलेल्या 'दृष्टी लाइफगाड्र्स'तर्फे करण्यात येत असलेल्या कामकाजाची, त्यांच्या यंत्रणेची प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. भुजबळ यावेळी म्हणाले की, बीचवर आनंदासाठी येणाऱ्या पर्यटकांना पाण्याचा अंदाज न आल्यास जीवघेण्या अपघातांना सामोरे जावे लागू शकते. या पार्श्वभूमीवर गोव्यामधील विविध बीचेसवर लाईफगाड्र्सच्या माध्यमातून पर्यटकांची सुरक्षितता उत्तमरित्या जपली जात आहे. महाराष्ट्रातही अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करण्याचा विचार सुरू आहे. त्या दृष्टीने आज या सिंकेरी बीचवरील लाईफगाड्र्सच्या कामकाजाची माहिती घेतली असता यंदाच्या मोसमात एकाही व्यक्तीचा बळी याठिकाणी गेलेला नाही, ही नोंद घेण्यासारखी बाब आहे. लाईफगाड्र्सच्या जलद प्रतिसादामुळे येथे शेकडो लोकांचे जीव वाचले. त्याचप्रमाणे स्थानिकांना प्राधान्याने उत्तम प्रशिक्षण देऊन लाइफगार्ड म्हणून रोजगार संधीही उपलब्ध होऊ शकते, ही बाबही अधोरेखित झाली, असेही भुजबळ म्हणाले.
यावेळी दृष्टी लाईफगाड्र्सचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर वीरेंद्र कंवर आणि उपाध्यक्ष राजेश गर्ग यांनी श्री. भुजबळ यांना येथील अत्याधुनिक नियंत्रण कक्षाची सविस्तर माहिती दिली. जीवरक्षक दलातील सर्व सदस्य वॉकी-टॉकीद्वारे सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असतात. व्यक्तीगत पातळीवर प्रत्येकजण बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविण्यासाठी सक्षम असून त्याला तातडीच्या मदतीसाठी जेट-स्की, हाय स्पीड क्राफ्ट अशा बोटी तैनात असतात. त्याचप्रमाणे जीवरक्षक दलाच्या जीपही तातडीच्या मदतीसाठी किनाऱ्यावर उपलब्ध असतात, अशी माहिती त्यांनी श्री. भुजबळ यांना दिली. एखाद्या बुडणाऱ्या व्यक्तीला कशा प्रकारे वाचवता येऊ शकते, याचे प्रात्यक्षिकही भुजबळ यांना दाखविण्यात आले. त्यानंतर जीवरक्षक दलाकडे असणाऱ्या अत्याधुनिक साधनसामुग्रीची, जीवरक्षक दलातील सदस्यांसाठी कंपनीने उपलब्ध केलेली सुसज्ज व्यायामशाळा आणि त्यांच्या निवासव्यवस्थेचीही भुजबळ यांनी पाहणी केली.

सोमवार, ४ एप्रिल, २०११

संगम..शास्त्र - संस्कृतीचा...!!!

भारतीय क्रिकेट संघाच्या विश्वविजयाने झालेला आनंद शब्दातीत- छगन भुजबळ

मुंबई, दि. 2 एप्रिल : महेंद्रसिंग धोणी याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकून सन 1983च्या विजयाची पुनरावृत्ती केल्यामुळे आपण अत्यंत हर्षभरित झालो असून आपल्याला झालेला आनंद शब्दातीत आहे. या ऐतिहासिक सोनेरी क्षणांचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले, हा माझ्यासाठी लाखमोलाचा ठेवा आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले आहे.
आजच्या सामन्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने शतकांच्या शतकाचा टप्पा ओलांडला असता तर हा आनंद शतगुणित झाला असता. मात्र गौतम गंभीर याच्या 97 धावांच्या खेळीमुळे ही उणीव भरून निघाली, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
कर्णधार धोणीला या मोक्याच्या सामन्यामध्ये सापडलेला सूर आणि त्याने झळकावलेल्या मोलाच्या 91 धावा या सुध्दा संघाच्या विजयासाठी महत्त्वाच्या ठरल्या. युवराज सिंगने षटकार ठोकून विवविजेतेपदावर दिमाखात भारताचे नाव कोरले. एकूणच फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या आघाडयांवर भारतीय संघाने बजावलेली कामगिरी महत्त्वाची ठरली. भारतीय संघाचा आजचा विजय हा सांघिक कामगिरीचा एक उत्कृष्ट नमुना असल्याचे मतही श्री. भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...