मुख्य सामग्रीवर वगळा

पुणे येथे कसबा मंडळातर्फे गणेश चतुर्थीला पुरस्कार वितरण

पुणे, ता. १८- येथील श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेसोत्सव मंडळातर्फे उद्या (ता. १९) गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मंडळातर्फे पुण्यातील नामवंतांना श्री कसबा पुरस्कार देण्यात येणार आहेत. अभ्यासक विजय भटकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येईल.

पुण्यातील मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती मंडळाचे यंदाचे १२० वे वर्ष आहे. यावर्षी श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा संगणकतज्ज्ञ, शास्त्रज्ञ व संत साहित्याचे अभ्यासक विजय भटकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. याचबरोबर पुण्यातील नामवंतांना श्री. भटकर यांच्या हस्ते यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. सर्वश्री वैद्य खडीवाली, कॉटनकिंग चे मालक प्रदीप मराठे, सरहद संस्थेचे संजय नहार, सनईवादक प्रमोद गायकवाड आणि गिरीप्रेमी संस्थेचे गिर्यारोहक उमेश झिरपे यांना पुरस्कार देण्यात येईल.

मंडळाचे माजी अध्यक्ष व नामवंत कायदेतज्ज्ञ अॅड. भाऊसाहेब निरगुडकर यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने निरगुडकर परिवार व कसबा गणपती मंडळातर्फे भाऊसाहेब निरगुडकर पुरस्कार देण्याचे ठरविण्यात आले असून हा पुरस्कार यंदा सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना श्री. भटकर यांच्या हस्ते देण्यात येईल. बुधवारी (ता. १९ सप्टेंबर) रोजी सकाळी ११ वाजता कसबा गणपती उत्सव मंडपात कार्यक्रम संपन्न होईल. असे सचिव मोरेश्वर घोळे यांनी मंडळ व कार्यकारिणीतर्फे कळविले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012