मुख्य सामग्रीवर वगळा

कल्याण परिसरातील गुणवंतांचा आज सत्कार

मुंबई, ता. १० - प्रियजन गुणगौरव समिती आणि प्रियजन महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. १० जून) सायंकाळी चार वाजता कल्याण परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

कल्याण येथील मराठा ज्ञाती समाज शिक्षण मंडळ, मराठा मंदिर कार्यालय अत्रे नाट्यगृहासमोर, शंकरराव झुंजारराव चौक येथे आयोजित या कार्यक्रमात सिने-नाट्य आणि दूरचित्रवाणी तारका मृणाल कुलकर्णी प्रमुख पाहुण्या तर सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव अध्यक्षस्थानी असतील. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या-पुस्तकांचे वितरण दरवर्षी करण्यात येते. मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन प्रियजन महिला बचत गटाच्या अध्यक्षा ज्योती हिंदुराव यांनी केले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.