मुख्य सामग्रीवर वगळा

नामयोगी दत्ताभैया यांना आदरांजली...


नागपूर, ता. ११ - नामयोगी दत्ताभैया यांना आदरांजली वाहण्यात आली. सिद्धारुढ शिवमंदीर, रामनगर येथे आदरांजली कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी वासुदेवराव चोरघडे होते. यावेळी सद्गुरुदास महाराज, प्रा. अरविंद खांडेकर, वेदमूर्ती गोविंदराव आर्विकर आणि शरदराव पुसदकर यांनी दत्ताभैयांच्या कार्यावर प्रकाश टाकला. उदयन ब्रह्म यांनी सूत्रसंचालन केले. मायाताई मानकर, आनंद तायडे, डॉ. मेघाताई बालंखे, प्रकाश बारापात्रे, सुधाकरराव इंगोले, किसोर गलांडे, पद्माकर जोशी यांनी आपले विचार मांडले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.