सोमवार, ११ एप्रिल, २०११

महात्मा फुले जयंतीनिमित्त मंत्रालयात सुमनांजली

महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विधान भवनाच्या आवारातील पुतळ्याला आज मान्यवारानी सुमनांजलि वाहिली. विधान सभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह उपाध्यक्ष वसंत पुरके, मंत्री छगन भुजबळ, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री मधुकर चव्हाण, मुख्य सचिव अनंत कळसे आदी यावेळी उपस्थित होते.

'दै. विश्वरुप'च्या महात्मा फुले जयंती विशेषांकाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 11 एप्रिल :  महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथील 'दै. विश्वरुप'ने काढलेल्या 'महात्मा' या विशेषांकाचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज सकाळी प्रकाशन करण्यात आले. श्री. भुजबळ यांच्या 'रामटेक' निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, तरुण पिढीला महात्मा फुले यांच्या कार्याची महती व माहिती ज्ञात करुन देण्याच्या दृष्टीने 'दै. विश्वरुप'ने हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. या विशेषांकास वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी संपादक सतीश धारप यांनी सांगितले की, 'दै. विश्वरुप'च्या या विशेषांकात मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्री सुनिल तटकरे, प्रा. हरि नरके, नरेंद्र दाभोलकर आदी मान्यवरांचे लेख आहेत.

बाळ देशपांडे यांच्या निधनामुळे ज्येष्ठ, जागरूक पत्रकार हरपला: भुजबळ

मुंबई, ता. ११ - ज्येष्ठ पत्रकार बाळ देशपांडे यांच्या निधनामुळे आपण एका जुन्या स्नेह्याला आणि वृत्तपत्रसृष्टी ज्येष्ठ जागरूक पत्रकाराला कायमची अंतरली आहे. या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
बाळ देशपांडे हे पत्रकारितेच्या क्षेत्रातले दीपस्तंभासारखे व्यक्तीमत्व होते. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे अनेक वर्षे सदस्य असलेल्या देशपांडे यांनी विविध वृत्तपत्रांमधून समतोल आणि अभ्यासपूर्ण लेखन केले. पत्रकारांच्या हक्काबद्दल ते अत्यंत जागरूक होते. त्यांच्या निधनामुळे तरूण पिढीला मार्गदर्शन करणारा ज्येष्ठ पत्रकार काळाच्या पडद्याआड गेल्याचे श्री. भुजबळ म्हणाले.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानला शासनाकडून ४० लाख रूपयांचा धनादेश प्रदान


कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने प्रतिष्ठानाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शासनाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते कुसुमाग्रज प्रतिष्ठानला ४० लाख रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

गंगापूररोड वरील कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये झालेल्या या कार्यक्रमात प्रतिष्ठानच्या वतीने कार्यवाह लोकेश शेवडे, उपाध्यक्ष रंजना पाटील व कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते हा धनादेश स्विकारला. यावेळी जिल्हाधिकारी पी.वेलरासू, उपविभागीय अधिकारी निलेश सागर, कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास लोणारी, प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे, विश्वस्त विनायक रानडे, उपकार्यवाह विनायक जोशी, आर्किटेक्ट संजय पाटील आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष श्रीमती पाटील यांनी यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांना कुसुमाग्रजांच्या पुस्तकांचा संच भेट दिला तर श्री. लोणारी यांनी जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाचे स्मृतीचिन्ह पालकमंत्र्यांना देवून त्यांचे स्वागत केले.
महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमी संधारण अभियानाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ


महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला येथे महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियानाचा प्रारंभ झाला. या अभियानाच्या निमित्ताने श्री. भुजबळ यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच शेतकर्‍यांना शेत तळ्यासाठीच्या चेकचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी अभियानास शुभेच्छा दिल्या. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, व जनतेने सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष मायावती पगारे, जिल्हाधिकारी पी.वेलरासू, येवला पंचायत समिती सभापती आर. डी. खैरनार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बापू काळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कैलास मोते, निफाड व चांदवड येथील उपविभागीय कृषी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Good Morning...सुप्रभातम् ।

9 एप्रिल 2011 ला धावत्या बसमधून ओझरनजीक सूर्योदयाचे मोबाईलद्वारे घेतलेले छायाचित्र

रविवार, १० एप्रिल, २०११

आधी हवेत...नंतर पोटात...

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
इंदूर म्हणजे मध्यप्रदेशचे पुणेच...इथेही खवैयेगिरीची अजिबात कमतरता नाही..देणाराने देत जावे..घेणाराने घेत जावे..या उक्तीप्रमाणे राजवाडा परीसरात जवळपास दररोज रात्रीचे चित्र दिसते. जसजसा सराफा बंद होण्याची वेळ जवळ येते तसतशी सराफा दुकानांपुढे विविध खाद्यपदार्थांची दुकानं थाटणे सुरू होते. मनच्युरिअन पासून अगदी पाणीपुरी, कचोरी, समोसा, खमण, मसाला डोसा, दहीवडा असे नाना पदार्थ समोर दिसल्यानंतर खाण्यासाठी कोणीही जीभेवर नियंत्रण ठेवू शकणार नाही. खिशाचा आणि घशाचा अजिबात विचार न करता खाण्यासाठी हात सरसावतात. बस्स. हाता-तोंडाची गाठ..। सराफा परीसरात अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या जोशी वडेवाल्यांच्या दुकानासमोर तर रीघ लागलेली असते. दहीवडा तयार करताना लहरीप्रमाणे हा वडा किमान पाच ते सहा फूट हवेत उडवून नंतर तळणासाठी तेलात बुडवला जातो. तयार झाल्यानंतर पट्टकन कोणाच्या पोटात नाही गेला, तरच नवल..।
ओमप्रकाश जोशी यांचे वडील रामचंद्र जोशी यांनी 1961 मध्ये कचोरीचे दुकान सुरू करून 1978 मध्ये दहीवडे तयार करणे सुरू केले. अल्पावधीतच चोखंदळ ग्राहकांनी सुद्धा त्यांच्या हाताला आणि वडा तयार करण्याच्या हातोटीला दाद दिली. सराफ्यामध्ये गेल्यानंतर जोशी यांचा दहीवडा न खाणे म्हणजे मंदीरात जाऊन घंटेला स्पर्श न करण्यासारखे आहे. दहीवड्यावर घालायचे दही तयार करताना दह्यासाठी साय काढली जात नसल्यामुळे हे दही सुद्धा चवीला मधुर लागते. मूग आणि उडिद यापासून तयार करण्यात येणाऱ्या या दहीवड्यात कोथिंबीर, जीरं, लवंग, तिखट, मिरची चवीनुसार घातली जाते...
(दर रविवारी, इंदूरच्या खवयैगिरीविषयी एखादा विषय देण्याचा मनोदय आहे...याबाबत आपल्याला काय वाटतं, ते कृपया आपली टिप्पणी (comment) लिहून प्रतिसाद द्या.

शुक्रवार, ८ एप्रिल, २०११

कर्नाळा अभयारण्याच्या हद्दीत भुयारी मार्ग प्रस्तावित: भुजबळ

मुंबई, ता. ८ (विशेष प्रतिनिधी) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ च्या चोपदरीकरणाच्या कामामध्ये पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातील कर्नाळा अभयारण्याच्या हद्दीतून जाणार्‍या रस्त्याबाबत गेले वर्षभर केंद्र शासनाकडे पाठपुरावा करूनही काही निष्पन्न न झाल्याने या वनविभागातील हद्दीपुरता भुयारी मार्ग तयार करण्याचे प्रस्तावित असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत सांगितले.
सर्वश्री सुभाष देसाई, भरतशेठ गोगावले, राजन साळवी, सदानंद चव्हाण, रवींद्र वायकर, विनोद घोसाळकर, प्रकाश सावंत, सूर्यकांत दळवी, विजय शिवतारे, महादेव बाबर या सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेसंदर्भात निवेदन करताना श्री. भुजबळ बोलत होते. महाड-संगमेश्वर येथे ट्रॉमा केअर हॉस्पिटलची कामे गतीने सुरू असून लवकरच ती कार्यान्वित होतील अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली.
यावेळी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी ट्रॉमा केअर सेंटरला परवानगी देत असतानाच त्याठिकाणी आवश्यक पदनिर्मिती तसेच आधुनिक यंत्रणा उपलब्ध करण्याची तरतूद करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांना केली. यावर, ट्रॉमा केअर सेंटर उभारतानाच त्यासाठीच्या फर्निचरसह अन्य वैद्यकीय सामग्रीसाठी तरतूद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती श्री. पवार यांनी दिली.

'धन्य धन्य ज्योतिबा फुले' सीडीचे प्रकाशन

मनमाड येथील वैशाली व महेश खरे निर्मित 'धन्य धन्य ज्योतिबा फुले' सीडीचे प्रकाशन करताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ.

अण्णांच्या आंदोलनास वीक-एन्डचा लाभ होण्याची शक्यता...

लोक-पाल विधेयकाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी दिल्ली येथील जंतरमंतर समोर गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत उपोषणास बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनास या आठवड्याच्या वीक-एन्डचा (ता. ९ व १० एप्रिल) लाभ निश्चित होऊ शकतो. अण्णांचे सपोर्टर्स म्हणून युवक देखील मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. इतकेच नाही, तर बॉलीवुडमधील कलाकार देखील अण्णांना पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. शनिवारी आणि रविवारी अनेक ठिकाणी कार्यालयांना वीक-एन्डची सुटी आहे. परिणामी या कार्यालयात नोकरी करणारे अनेक युवक या दोन दिवसात अण्णा हजारे यांच्या उपोषण स्थळी भेट देऊन आपला पाठिंबा देतील, अशी शक्यता आहे.

आसाम मध्ये सर्वत्र साजरा केला जाणारा "बिहु"..

आमच्या आसामच्या मित्राने दिलेली "बिहू" विषयी थोडक्यात माहिती...

प्रत्‍येक बिहू कृषि कलेन्‍डर के विशिष्‍ट अवसर पर पड़ता है। तीनों बिहू उत्‍सवों में सबसे आकर्षक, बसंत ऋतु का उत्‍सव 'बोहाग बिहू' अथवा रंगाली बिहू होता है जो मध्‍य अप्रैल में मनाया जाता है, जिससे कृषि ऋतु का प्रारम्‍भ होता है। बिहू असम के सबसे ज्‍यादा प्रचलित लोक नृत्य को दिया गया नाम है, जिसका सभी जवान व बूढ़े, अमीर व ग़रीब आनन्‍द लेते हैं। नृत्‍य बिहू उत्‍सव का अंग हैं, जो मध्‍य अप्रैल में पड़ता है। जब फ़सल कटाई होती है और जो लगभग एक महीने तक चलती है। इससे असम के कलेन्‍डर की भी शुरूआत होती है।

बिहू नृत्‍य युवा लड़के व लड़कियों द्वारा खुले मैदान में किया जाता है, तथापि वे आपस में नहीं मिलते हैं। पूरा गांव नृत्‍य में हिस्‍सा लेता है, चूंकि नर्तक घर-घर में जाते हैं। इस नृत्‍य की पहचान तेजी से क़दम उठाना, हाथों को उछालना व चुटकी बजाना तथा कूल्‍हे मटकाना है जो कि युवाओं के मनोभाव का द्योतक है। कलाकार कभी-कभी गीत गाते हैं। नृत्‍य धीमी गति से आरंभ होता है, और जैसे-जैसे नृत्‍य आगे बढ़ता है इसकी गति तेज़ होती जाती है। 'ढोल' की सम्‍मोहक थाप और 'पेपा' (भैंसे के सींग से बनी तुरही) इस नृत्‍य का अंग हैं। बिहू नृत्‍य करते समय पारंपरिक वेशभूषा जैसे धोती, गमछा और चादर व मेखला पहनना अनिवार्य होता है। बिहू नृत्‍य, इसके विभिन्‍न रूपों में, फ़सल कटाई के विभिन्‍न स्‍तरों पर व नए मौसम के आगमन पर भी किया जाता है। इसकी सबसे सामान्‍य रचना गोलाकार अथवा समानान्‍तर पंक्तियों में होती है। बिहू के नृत्‍य व संगीत द्वारा असम वासियों की जीवन शक्ति के सर्वश्रेष्‍ठ रूप का दिग्‍दर्शन होता है।

बिहू सिर्फ हिंदू और असमिया ही नहीं मनाते, असम का पूरा जनसमुदाय इसके रंगों में सराबोर हो जाता है। वैसे तो असम में सालभर के दौरान तीन बार इस उत्सव का आयोजन होता है। किंतू बोहाग बिहू ही इनमें सबसे प्रमुख है। इस दौरान पूरे राज्य के लोग ही नहीं, बल्कि पेड, पौधे, पहाड भी सजीव हो उठते है। पहले तो यह उत्सव पूरे एक महीने तक चलता था। लेकिन जिंदगी की आपाधापी ने अब इसे एक सप्ताह तक सीमित कर दिया है। बिहु की शुरूआत सबसे पहले कब हुई, इसका क हीं कोई साफ जिक्र नही मिलता। लेकिन समझा जाता है कि ईसा से लगभग साढे तीन हजार साल पहले इसका आयोजन शुरू हुआ।
बिहु के दौरान राज्य में जगह-जगह मंच बना कर सात दिनों तक बिहूगीत व नृत्य का आयोजन किया जाता है। लोग नए कपडे पहनते है। सरकारी दफ्तरों में भी छुट्टियाँ होती है। यह उत्सव अनूमन हर साल १४ अप्रेल से शुरू होता है। असमिया नववर्ष भी बिहू से शुरू होता है।

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...