सोमवार, १८ ऑक्टोबर, २०१०
उपमुख्यमंत्री भुजबळ यांचा वाढदिवस उत्साहत
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा ६२ वा वाढदिवस (ता. १५) त्यांच्या निवासस्थानी उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यासह राजस्थान, बिहार आदी राज्यातून भुजबळ यांना शुभेच्छा संदेश देण्यात आले. याचबरोबर विविध ज्येष्ठ राजकीय नेत्यांसह, अनेक कार्यकर्ते, हितचिंतक, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०१०
उपमुख्यमंत्री भुजबळ यांच्याकडून राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज राज्यपाल के. शंकरनारायणन यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.
भुजबळ यांच्यासमवेत खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ हे सुद्धा होते. या दोघांनीही राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री भुजबळ यांचाही आज वाढदिवस असून त्यांनाही राज्यपालांनी शुभेच्छा दिल्या.
दसर्यानिमित्त बाजारपेठ तेजीत
मध्यंतरी पितृपक्ष, श्राद्धपक्षामुळे मरगळलेल्या स्थितीत असलेल्या बाजारपेठेत दसर्यापूर्वीच आज अष्टमीपासूनच तेजी आली आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडले असले तरी देखील दिवाळी व आगामी लगीनसराई पाहता, सोने खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यापारी बांधवांनी व्यक्त केली आहे.
विसाव्या राष्ट्रकुल स्पर्धा २०१४ ला ग्लासगो येथे
एकोणीसव्या राष्ट्रकुल स्पर्धांची सांगता काल दिल्ली येथे झाल्यानंतर राष्ट्रकुलाचा ध्वज ग्लासगो प्रशासनाच्या सुपुर्द करण्यात आला. तत्पूर्वी न भूतो न भविष्यति इतक्या चांगल्या प्रकारे सांगता समारंभ पार पडला.सध्याच्या नियोजित योजनेनुसार सन 2014 मध्ये 3 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत ग्लासगो येथे राष्ट्रकुल स्पर्धा अर्थातच commonwealth games चालतील. यात वेटलिफ्टिंग, जिम्नॅशियम, ऍथेलेटिक्स, रेसलिंग, मॅरेथॉन, रग्बी, टेनिस अशा प्रमुख १७ क्रीडा स्पर्धा होणार आहेत.
गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०१०
राष्ट्रकुल स्पर्धेत अखेर शंभरी पार..स्वप्न साकार
राष्ट्रकुल स्पर्धेचा आज समारोप होत असून, सुरवातीस मनोदय व्यक्त केल्याप्रमाणे भारत द्वितीय स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला. दुसर्या स्थानासाठी इंग्लंडने सुद्धा भारताची बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेर भारतीय खेळाडुंनी आपले स्वप्न खरे ठरवत, मनोदयाला जागून दुसरे स्थान टिकवून ठेवले. भारताला एकूण १०१ पदकं मिळाली असून यात ३८ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३६ ब्राँझ अशी पदकं प्राप्त झाली.
हेही नसे थोडके...अखेर शंभरी गाठली।
राष्ट्रकुल (CWG) स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दुपारपर्यंत अखेर पदकांची शंभरी गाठलीच..। भारत सध्या (१४ ऑक्टोबर दुपारी ३.००) तिसर्या स्थानावर असला, तरीही दुसर्या स्थानावर पुन्हा पोहोचण्यासाठी एक संधी अजून हातात आहे. आतापावेतो भारताला ३७ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३६ कांस्य पदकं मिळाली आहेत..पाहू या आणखी काय होते ते..।
चिलीमधील कामगारांना वाचवण्याच्या यशामागे तंत्रज्ञानाचे यश...
चिलीच्या उत्तरेस असलेल्या ऍटाकामा प्रांतातल्या सोन्याच्या खाणीत अडकलेल्या ३३ कामगारांना बाहेर काढण्यात नौदलास यश आले. यासाठी एक विशिष्ट आकाराची कॅप्सुल (५४ सेंटीमीटर रुंद) तयार करून ती कॅप्सुल खाणीमध्ये ६२२ मीटर खोलीपर्यंत ते सोडण्यात आली होती. या कॅप्सुलमध्ये एकावेळी एक व्यक्तीच समाविष्ट केली जात होती. यामुळे खाणीतल्या अडकलेल्या ३३ कामगारांना बाहेर काढण्यात जास्त वेळ लागला. परंतु कोणाचीही अखेर न होता..अखेर या सर्वांना बाहेर काढण्यात यश मिळाले. प्राप्त सूत्रांनुसार नासा या संस्थेच्या मदतीने ही मोहिम राबविण्यात आली. या यशात खरंतर या तंत्रज्ञानाचे देखील यश महत्वाचे आहे. लाख मोलाचा जीव वाचविण्यासाठी लाखो रुपये किंमतीची यंत्रणाच अखेर उपयोगी पडली...।
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...


