मुख्य सामग्रीवर वगळा

मीरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी सरासरी ५२ टक्के मतदान-सोमवारी मतमोजणी

मुंबई, ता. १२- मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सरासरी ५२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली व कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद झाली नाही, अशी माहिती राज्य निवडणुक आयुक्त श्रीमती नीला सत्यनारायण यांनी दिली आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेत ४७ प्रभागात एकूण ९५ जागा असून त्यासाठी एकूण ५१६ उमेदवार रिंगणात होते. मतदानासाठी सर्वत्र आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोमवारी (ता. १३ ऑगस्ट) सकाळी नऊ वाजता मतमोजणी होईल, असेही श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012