मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

पुणे येथे कसबा मंडळातर्फे गणेश चतुर्थीला पुरस्कार वितरण

पुणे, ता. १८- येथील श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेसोत्सव मंडळातर्फे उद्या (ता. १९) गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मंडळातर्फे पुण्यातील नामवंतांना श्री कसबा पुरस्कार देण्यात येणार आहेत. अभ्यासक विजय भटकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येईल. पुण्यातील मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती मंडळाचे यंदाचे १२० वे वर्ष आहे. यावर्षी श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा संगणकतज्ज्ञ, शास्त्रज्ञ व संत साहित्याचे अभ्यासक विजय भटकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. याचबरोबर पुण्यातील नामवंतांना श्री. भटकर यांच्या हस्ते यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. सर्वश्री वैद्य खडीवाली, कॉटनकिंग चे मालक प्रदीप मराठे, सरहद संस्थेचे संजय नहार, सनईवादक प्रमोद गायकवाड आणि गिरीप्रेमी संस्थेचे गिर्यारोहक उमेश झिरपे यांना पुरस्कार देण्यात येईल. मंडळाचे माजी अध्यक्ष व नामवंत कायदेतज्ज्ञ अॅड. भाऊसाहेब निरगुडकर यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने निरगुडकर परिवार व कसबा गणपती मंडळातर्फे भाऊसाहेब निरगुडकर पुरस्कार देण्याचे ठरविण्यात आले असून हा पुरस्कार यंदा सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना श्री. भटकर यांच्या हस्ते देण्यात येईल.

Grasshopper green...

मीरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी सरासरी ५२ टक्के मतदान-सोमवारी मतमोजणी

मुंबई, ता. १२- मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सरासरी ५२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली व कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद झाली नाही, अशी माहिती राज्य निवडणुक आयुक्त श्रीमती नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिकेत ४७ प्रभागात एकूण ९५ जागा असून त्यासाठी एकूण ५१६ उमेदवार रिंगणात होते. मतदानासाठी सर्वत्र आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोमवारी (ता. १३ ऑगस्ट) सकाळी नऊ वाजता मतमोजणी होईल, असेही श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.

राज्यातील ७,७५६ ग्रामपंचायतींच्या ९ सप्टेंबरला सार्वत्रिक निवडणुका

मुंबई, ता. १- राज्यातील ७ हजार ७५६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ९ सप्टेंबर २०१२ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केली आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आज मध्यरात्रीपासून मतमोजणी होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील, असेही त्यांनी म्हटले आहे. नामनिर्देशनपत्रे २१ ऑगस्ट २०१२ ते २५ ऑगस्ट २०१२ या कालावधीत स्वीकारण्यात येतील. यांची छाननी २७ ऑगस्टला होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत २९ ऑगस्ट असेल. त्याच दिवशी चिन्ह नेमून देऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ९ सप्टेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान होईल. दुसर्‍या दिवशी १० सप्टेंबरला मतमोजणी होईल. सर्व ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे मतदान घेण्यात येईल. उमेदवारांना दैनंदिन खर्च सादर करणे आवश्यक राहील. तसेच निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत एकूण खर्चाची माहिती सादर करावी लागेल. जिल्हानिहाय मतदान होणार्‍या ग्रामपंचायतींची संख्या अशी-  ठाणे ९८, रायगड २४७, रत्नागिरी २२६, सिंधुदुर्ग ३२९, नाशिक १८९, अहमदनगर २१०, धुळ

मृणाल गोरे यांना सिडको तर्फे श्रद्धांजली

मुंबई, ता. २० - राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून मृणालताई गोरे यांनी आपल्या सामाजिक लढ्याचा प्रवास सुरू केला तेव्हापासून गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्या सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन लढत होत्या. त्यांच्या निधनाने राज्याने एक तेजस्वी, झुंजार नेतृत्व गमावले आहे. या शब्दात सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी श्रीमती मृणालताई गोरे यांना श्रद्धांजली अपर्ण केली. ते पुढे म्हणाले, की पाण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर पाणीवाली बाई म्हणून ओळखल्या जाणार्‍या मृणालताई यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली, प्रसंगी तुरुंगवासही भोगला. स्वा. अहिल्या रांगणेकर यांच्यासोबत त्यांनी महिला आणि पीडितांच्या सेवेत स्वतःस झोकून दिले. नागरी प्रश्न, महिलांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न, भटक्या विमुक्तांचे, झोपडपट्टीवासीयांचे प्रश्न अथवा महागाईविरोधी लढा असो, मृणालताईंनी सर्वसामान्यांची साथ कधीही सोडली नाही. त्यांनी सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेली पहिली महिला लोकप्रतिनिधी बनण्याचा विक्रम करून दाखविला. मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविकेपासून खासदार पदापर्यंत त्यांचा स

रमाबाई रानडे...

मी आहे, रमा....हो, खर्रेच...। तुमचीच रमा म्हणजेच रमाबाई रानडे...यांची भूमिका करणारी "तेजश्री वालावलकर"आमच्या असंख्य अभ्यागतांनी आग्रह केल्यामुळे रमाबाई रानडे यांच्या संबंधी एक लिंक इथे...।रमाबाई रानडे लिखित- आमच्या आयुष्यातील काही आठवणींची...नेटवर शोधुन शोधुन थकलो आणि ही लिंक सापडली- http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=190612112607&PreviewType=ebooks (या लिंकरुपी ईपुस्तक उपलब्ध करून देणार्‍यांचेही शतशः आभार आणि धन्यवाद).

नवी मुंबई येथे जिल्हा महिला काँग्रेस आढावा बैठक

नवी मुंबई जिल्हा महिला काँग्रेस आढावा बैठक काँग्रेस भवन वाशी येथे नुकतीच संपन्न झाली...

Thousands of school students to attempt to create a Guinness World Record

Vashi (Navi Mumbai), June 12: The Fortis Foundation in association with the Navi Mumbai District Lions International, Fortis Hiranandani Hospital, Vashi, Navi Mumbai Association of Paediatrics and Indian Association of Occupational Health, Thane and Raigad branch have joined hands to launch an impactful series of community campaign - Clean Hands To Save Life ™ that endeavours at highlighting the need and importance of hand hygiene in maintaining good health. According to India’s public health association statistics only 30 percent of Indian population wash their hands before preparing food, 38 percent wash their hands before eating and just over 53 percent of the country’s population wash their hands after defecating. Large sections of the country’s population have the ‘misconception’ that they do not need to wash their hands which apparently look clean and will not make them sick.   Proper hand hygiene practice can keep deadly diseases like typhoid, diarrhoea and hep

नामयोगी दत्ताभैया यांना आदरांजली...

नागपूर, ता. ११ - नामयोगी दत्ताभैया यांना आदरांजली वाहण्यात आली. सिद्धारुढ शिवमंदीर, रामनगर येथे आदरांजली कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी वासुदेवराव चोरघडे होते. यावेळी सद्गुरुदास महाराज, प्रा. अरविंद खांडेकर, वेदमूर्ती गोविंदराव आर्विकर आणि शरदराव पुसदकर यांनी दत्ताभैयांच्या कार्यावर प्रकाश टाकला. उदयन ब्रह्म यांनी सूत्रसंचालन केले. मायाताई मानकर, आनंद तायडे, डॉ. मेघाताई बालंखे, प्रकाश बारापात्रे, सुधाकरराव इंगोले, किसोर गलांडे, पद्माकर जोशी यांनी आपले विचार मांडले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कल्याण परिसरातील गुणवंतांचा आज सत्कार

मुंबई, ता. १० - प्रियजन गुणगौरव समिती आणि प्रियजन महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. १० जून) सायंकाळी चार वाजता कल्याण परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. कल्याण येथील मराठा ज्ञाती समाज शिक्षण मंडळ, मराठा मंदिर कार्यालय अत्रे नाट्यगृहासमोर, शंकरराव झुंजारराव चौक येथे आयोजित या कार्यक्रमात सिने-नाट्य आणि दूरचित्रवाणी तारका मृणाल कुलकर्णी प्रमुख पाहुण्या तर सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव अध्यक्षस्थानी असतील. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या-पुस्तकांचे वितरण दरवर्षी करण्यात येते. मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन प्रियजन महिला बचत गटाच्या अध्यक्षा ज्योती हिंदुराव यांनी केले आहे.