मुख्य सामग्रीवर वगळा

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत समाधान घोडकेचे आव्हान संपुष्टात

पिंपरी (3 डिसेंबर 2013) : महाराष्ट्र केसरीचा दुसरा मुख्य दावेदार असलेला सोलापूरचा समाधान घोडके याचे आव्हान मुंबई उपनगरच्या सुनिल साळुंके याने एक गुणाने कुस्ती जिंकून संपुष्टात आणले. महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या मान्यतेने व महेशदादा स्पोटर्स फाउंडेशनच्या वतीने पै. किसनराव लांडगे यांच्या 71 व्या वाढ दिवसानिमित्त भोसरी येथे कै. पै. मारुती रावजी लांडगे क्रिडा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी व 57 वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या तिस-या दिवशीच्या पहिल्या सत्रात हे सामने घेण्यात आले. यावेळी उपमहापौर राजू मिसाळ, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, स्पर्धा प्रमुख विलास कथुरे, संयोजक व नगरसेवक महेश लांडगे, ऑलिम्पीक मारुती आडकर, सितारामभाऊ भोतमांगे, पिंपरी चिंचवड कुस्तिगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे, हिंद केसरी अमोल बराटे, योगेश दोडके, भारत केसरी विजय गावडे, महाराष्ट्र केसरी शिवाजी केकान, मुन्नालाल शेख, रावसाहेब मगर, विजय बनकर, पंच उत्तमराव पाटील, दिनेश गुंड, अंकुश वलकडे, दिलीप पवार, संभाजी वरुटे, बंकट यादव आदींसह हजारो कुस्ती शौकिन उपस्थित होते. या कुस्ती सामन्यांचे सुत्रसंचालन बाबा लिम्हण, शंकर पुजारी यांनी केले. 74 किलो गादी विभागात संतोष गायकवाड (अहमदनगर) आणि रणजित नलावडे (कोल्हापूर जिल्हा) हे सुवर्ण पदकासाठी भिडणार आहे. तर प्रसाद सस्ते (पिंपरी चिंचवड) आणि चंद्रशेखर पाटील (लातूर) हे दोघे कांस्यपदकाचे मानकरी ठरले आहेत. 74 किलो माती विभागात रविंद्र करे (पुणे जिल्हा) याने जयदिप गायकवाड (सातारा) याच्यावर 11 विरुध्द 4 असा 7 गुणांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर विश्वभंर खैरे (बीड) याने अण्णा गायकवाड (अहमदनगर) याच्यावर 8 विरुध्द 0 असा 8 गुणांनी विजय मिळवित अंतिम फेरीत फेरी गाठली. 60 किलो माती विभागात दादा सरवदे (सोलापूर शहर) याने देवानंद पवार (लातूर) याचा 5 विरुध्द 3 अशा 2 गुणांनी विजय मिळवित अंतिम फेरी गाठली. तर अरुण खेंगले (पुणे जिल्हा) याने राहूल यादव (मुंबई उपनगर) याच्यावर 7 विरुध्द 5 अशा 2 गुणांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. 60 किलो गादी विभागात विशाल माने (कोल्हापूर जिल्हा) आणि सोनबा गोंगाणे (कोल्हापूर शहर) यांची अंतिम फेरीत सुवर्ण पदकासाठी लढत होणार आहे. 96 किलो माती विभागात दुस-या फेरीत मुंबईच्या संतोष सुतारने पिंपरी चिंचवडच्या प्रमोद मांडेकरवर 8 विरुध्द 0 असा 8 गुणांनी विजय मिळवित आपली घौडदौड सुरु ठेवली असे तुळशीदास शिंदे यांनी कळविले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012