मुख्य सामग्रीवर वगळा

“शतकी लग्नगाठ” बांधायला लावणारी...अर्धशतकी लग्नगाठ!

श्री. किशोर कुळकर्णी आणि माझा परिचय तसा ‘दैनिक तरूण भारत ’ पासूनचा..। पण त्यांच्या प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे परिक्षण करण्याइतका काही मी पात्र नाही. जेव्हा विद्यार्थ्याचा शिक्षक होतो, तेव्हा परीक्षक होऊन परीक्षा घेतली जाते, परिक्षण केले जाते, मी मात्र अद्याप विद्यार्थीच आहे. दुसरं म्हणजे माझ्या लग्नगाठीला अद्याप एक तप सुद्धा पूर्ण झालेलं नाही, आणि विविध दिग्गजांनी त्यांची मतं इथे प्रस्तुत केली आहेत परिणामी, मी या पुस्तकाविषयी काय लिहिणार? पण दिलेली जबाबदारी पूर्ण करावीच लागेल, म्हणून या क्षणी पुस्तकाचे परिक्षण करण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न...!
तसं पाहिलं तर ‘किशोर’ नावाच्या व्यक्तींचा स्वभाव जरी भिडस्त वाटत असला तरीही त्यांना लोकांच्या गरजा, आवडी-निवडी यांची जाणीव असते. आपल्या कार्यानेच ते लोकप्रिय होऊन सर्वश्रृत होऊन यशस्वी होतात, त्यांच्या कार्याचा सुगंध त्रिभुवनी पसरतो. स्व. गायक किशोर कुमार यांच्या उदाहरणाने आपला या गोष्टीवर विश्वास नक्की बसावा. सुरवातीला किशोर कुळकर्णी यांचे लेख ‘दैनिक सकाळ’ मध्ये टप्प्याटप्प्याने मालिकेच्या माध्यमातून अनेक भागात प्रसिद्ध करण्यात आले. सोलापूर च्या नागेश सुरवसे यांनी किशोर यांचे लेख आपल्या सनराईज प्रकाशन च्या माध्यमातून पुस्तक रुपाने प्रसिद्ध केले म्हणजे ही किशोर कुळकर्णी यांच्या लेखांना मिळालेली लोकप्रियतेची पोचपावतीच म्हणावे लागेल. एकूण 29 दाम्पत्यांच्या आयुष्याची प्रदीर्घ वाटचाल आणि लग्नानंतर सुरू झालेला सहजीवनाचा प्रवास यात वर्णन करण्यात आला आहे.
विशेष उल्लेखनीय म्हणजे विको वज्रदंती चे मालक श्री. गजानन पेंढरकर यांची मुलाखत मनात घर करते. खानदेशच्या मातीशी त्यांचा संपर्क आल्यामुळे त्यांची खानदेशविषयी ओढ आहे. आणि ‘निसर्ग-पुत्र’ असा बहुमान मिळावा इतके श्री. पेंढरकर यांचे कार्य आहे. बेरोजगार तरुणांनी किंवा संसारात अनंत अडचणी आल्या तरीही त्यावर मात कशा पद्धतीने करावी हे नवदाम्पत्यांनी श्री. व सौ. पेंढरकर यांच्याकडून शिकावे...। स्वतः किशोर यांनी प्रवासात असताना 80 वर्षाच्या आजोबांची आस्थेवाईकपणे केलेली चौकशी, आणि पाटील बायोटेक्स चे प्रमोद पाटील यांच्या आई वडिलांची लगेच घेतलेली मुलाखत यावरुन त्यांच्यातली तगमग लक्षात येते. आईवडिलांविषयी जी बारिक माहिती मुलाला सुद्धा माहिती नव्हती, ती किशोर यांनी त्या आई वडिलांच्या हृदयात डोकावून जाणून घेतली आणि आपल्यातल्या हाडाच्या पत्रकाराची ओळख दिली आहे. खानदेशातील ज्येष्ठ राजकारणी, ज्यांचा विरोधक सुद्धा आदर करतात आणि ज्यांचे मार्गदर्शन सुद्धा घेतले जाते असे श्री. ओंकार आप्पा वाघ यांची लग्नानंतरची यशस्वी 50 वर्ष, अत्यंत हालाखीत असलेले गंभीरखाँ व सौ. तुळसाबाई तडवी दाम्पत्य अशा अनेकांच्या मुलाखती थोडक्यात म्हणजे समाजाच्या सर्व स्तरातल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
सखोल विचार केल्यास बऱ्याच जणांनी आपल्या संसाराची सुरवात करताना अत्यंत गरीबीचे दिवस पाहिले आहेत हे जाणवते. काळ हा झपाट्याने पुढे जातो. आज जरी सगळ्यांचेच सु-दिन असले तरीही अनेकांनी हाडाची काडं करुन संसाराचा रथ यशस्वीपणे पुढे हाकला आहे. अर्थातच प्रत्येकाला पत्नीची साथ आहेच...हे सांगण्याची गरज नाहीच..!
खरं तर या पुस्तकाची संकल्पना सुरवातीला जळगावच्या एका 49 -99 रु. वस्तू विक्रीच्या दुकानासमोर उभे राहून किशोर यांनी त्यांच्या एका जीवलग मित्राशी चर्चा करून मांडली होती, संकल्पनेस मूर्त स्वरुप येईल, अशी पुसटशी कल्पना करण्यापूर्वीच पूर्ण झालेल्या या अर्धशतकी लग्नगाठ- पुस्तकात ज्या दाम्पत्यांची मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यांच्या आजवरच्या वाटचालीचे इतके सुंदर वर्णन पाहून ती सर्व दाम्पत्य त्यांची शतकी लग्नगाठ निश्चितच पूर्ण करतील, ते सुद्धा या पुस्तकातल्या आठवणींच्या सहाय्याने, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही...लेखक किशोर कुळकर्णी यांनी तोपर्यंत त्यांची “अर्धशतकी लग्नगाठ” पूर्ण केली असेल, आणि उपरोक्त सर्वांची “शतकी लग्नगाठ” ते वाचकांपर्यंत पोहोचवतील, हाच विश्वास...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड, ४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ ...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्जता- विमानतळ परिचालनाचा महत्त्वाचा टप्पा

 नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन विमानतळाच्या सज्जतेचा (Readiness) आढावा घेतला.  यापूर्वी नवी मुंबई विमानतळ येथे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय हवाई दलातर्फे घेण्यात आलेली इन्स्ट्रूमेन्ट लँडिंग चाचणी आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोतर्फे घेण्यात आलेली प्रवासी विमान लॅंडिंग चाचणी यशस्वीरीत्या पार पडली होती. या प्रसंगी विपिन कुमार, (भा. प्र. से.) अध्यक्ष, भारतीय विमानतळ प्राधिकरण, श्री. प्रकाश निकम, प्रादेशिक संचालक, नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळ (BCAS), श्री. विजय सिंघल, (भा. प्र. से.), उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शान्तनु गोयल, (भा. प्र. से.), सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्रीमती गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको आणि नवी मुंबई इंटरनॅशनल (एनएमआयएएल) यांचे अधिकारी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी नागरी विमान वाहतूक महासंचलनालय आणि भार...

हेमराज शहा म्हणजे मराठी व गुजराथी बांधवांना जोडणारा दुवा - छगन भुजबळ

मुंबई दि. 23 मार्च : गेली 45 वर्षे समाजकारण, राजकारण, लेखन, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रात अखंडपणे कार्य करीत असलेले हेमराज शहा म्हणजे मराठी व गुजराथी बांधवांना जोडणारा दुवा आहेत, अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी बृहद्मुंबई गुजराथी समाजाचे अध्यक्ष हेमराज शहा यांचे काल अभीष्टचिंतन केले. हेमराज शहा यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार समितीच्या वतीने येथील बिर्ला क्रीडा मंडळाच्या सभागृहात आयोजिलेल्या समारंभात भुजबळ बोलत होते. ते म्हणाले की, प्रसन्न आणि हसतमुख असलेल्या हेमराज शहा यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. गुजराथी समाजातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) समजल्या गेलेल्या अनेक जाती जमातींचा शासनाच्या या बाबतच्या यादीत समावेश करण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. जवळपास 26 पुस्तके लिहून तसेच गुजराथी वृत्तपत्रांमध्ये अनेक वर्षे स्तंभ लेखन करून आपण एक उत्तम पत्रकार व लेखक असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. कच्छी समाजातील कर्तृत्ववान व्यक्तिंना ते सातत्याने प्रोत्साहन देत आहेत. गुजराथी बांधवांना एकत्र येण्यासाठी त्यांनी निर्माण केलेल्या संस्थेच्या माध्य...