ग्वालियर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २४ फेब्रुवारीला भारताने आक्रमक खेळी करून विजयाची माळ गळ्यात तर घातलीच, मात्र, सचिन तेंडुलकर याने चक्क दोनशे धावांचा सहजगत्या विश्वविक्रम नोंदवून भारताच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला आहे. एक दिवसीय सामन्यात सेहेचाळीसावे शतक ठोकून सचिनने इतर कसोटीपटूंपुढे आव्हान उभे केले असून एक आदर्श देखील घालून दिला आहे. आणखी चार शतके करून आपले पन्नासावे शतक सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात करून, उन्मत्त झालेल्या कांगारूंना धूळ चारावी, हीच अपेक्षा...।