मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

"माओवाद" भूमीवाद अजून किती जीव घेणार...

पश्‍चिम बंगालमधील पश्‍चिम मिदनापूर जिल्ह्यामध्ये सिल्धा परिसरात माओवाद्यांनी संयुक्त सुरक्षा दलाच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यात सोमवारी 24 जवान ठार झाले. मोटारसायकलींवरून आलेल्या पन्नासपेक्षा अधिक माओवाद्यांनी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अत्याधुनिक शस्त्रांनी दहा मिनिटे हल्ला केला. अनेक वर्षांपासून माओवाद, भारत-चीन, भारत-पाकिस्तान भूमीवादावरून अतिरेकी, नक्शलवादी यांचे भारतात अनेक ठिकाणी हल्ले झाले आहेत, होत आहेत. सीमेवर बिचारे जवान अहोरात्र लढताहेत. परंतु अद्याप शासन गप्प का? केवळ फाइलमध्ये किंवा कागदी घोडे नाचवून काहीच उपयोग नाही, हे नुकत्याच झालेल्या या हल्ल्याने सिद्ध केले आहे. कसाबची साक्ष देखील जवळपास पूर्ण झाली आहे. मग आता हे रेंगाळणे का? आदेश न मानणार्‍या लोकांना माओवादी बेदम झोडपतात ही दंडूकेशाही आणि बंदूकशाही नव्याने सावकारीसारखी सुरू होत आहे, भविष्यातल्या अराजकतेची ही नांदी आहे. पुण्यातही जर्मन बेकरी घटना ताजी आहेच.. केवळ सुरक्षा यंत्रणांना दोष देण्यात काहीच तथ्य नाही, त्या यंत्रणा आपल्या परिने कार्य करून वेळोवेळी सतर्क देखील करतात. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने आणि सर्वच

देशातल्या प्रजेचे काय होणार...?

आज आपल्या देशाचा 60 वा प्रजासत्ताक दिन आहे. येथे विविध सरकारे आली आणि गेली, प्रत्येक वेळी प्रत्येक सरकारकडून वचनं, आश्वासनं...आणि देशातल्या प्रजेस फक्त आशा, अपेक्षा...यापेक्षा दुसरं काहीही नाही. दरडोई उत्पन्न वाढल्याचा दावा होत असला तरीही दिवसेंदिवस महागाई, लोकसंख्या वाढते आहे, अंतर्गत आणि सीमेपलीकडचे शत्रूही वाढताहेत, सामान्य नागरिकाला घराबाहेर गेल्यानंतर आपण घरी परत सुखरूप येऊ अथवा नाही, जीवंत परत येऊच याची शाश्वती वाटत नाही- अशी परिस्थिती निर्माण झाली असून...जगात एक महासत्ता बनण्याची स्वप्न रंगविणार्‍या आणि शक्यता असणार्‍या या देशाच्या प्रजेचे नेमके होणार तरी काय...? देणाराचे हात हजार..., देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे, एक दिवस...या ओळींप्रमाणेच सध्याची स्थिती आहे, या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे हजार हातांनी दिले जाते, ते सुद्धा भरघोस...। भारतावर कितीतरी आक्रमणे झाल्याचा इतिहास आहेच. इंग्रजांच्या तावडीतून देशाला मुक्त करण्यासाठीही दीडशे वर्ष लागली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर लगेच देशाची पाकिस्तानरुपी फाळणी झाली, कालांतराने पाकिस्तानने काश्मिरचा बराच भाग ताब्यात घेतला, चीनन

आता तरी भारतीयांना परत बोलवा...

ऑस्ट्रेलियात दिवसेंदिवस भारतीयांवर वांशिक हल्ले होण्याच्या प्रमाणात वाढ होतेच आहे. आणखी किती वाट पाहणार? केवळ चर्चा, सहानुभूती व्यक्त करणे आता बंद करावे. तेथील भारतीयांच्या सहनशक्तीचा आणखी अंत भारत सरकारने न पाहता, त्वरीत त्यांना भारतात परत बोलवावे. सर्व भारतीयांच्या सुरक्षिततेची हमी ऑस्ट्रेलियाने दिल्याशिवाय परत ऑस्ट्रेलियात पाठवू नये. 23 मे 2009 पर्यंत ऑस्ट्रेलियात 81 जणांवर हल्ला झाल्याची माहिती युपीए शासनाने राज्यसभेत दिली होती. 81 काय परंतु खरं तर एकही हल्ला होऊ नये, अशी खबरदारी घेणे महत्वाचे आहे. अनेक बाबतीत भारत आज अमेरिकेचा आदर्श घेऊन, अमेरिकेच्या पावलावर पाऊल ठेवतो, असे असताना या बाबतीत अद्याप हलगर्जीपणा का? विनाविलंब ऑस्ट्रेलियातील भारतीय दूतावास बंद करून पुढील कार्यवाही होणे गरजेचे आहे.

“फिट” ठेवा...“हिट” व्हा!

“We have moved from a state of nothing to everything! अर्थात- आम्ही काही नसल्याच्या अवस्थेतून सर्वकाही असल्याच्या अवस्थेत पोहोचलो आहोत.” हे वाक्य बरंच काही सांगून जातं! एक काळ होता, माणुस निरोगी, आरोग्यसंपन्न, बव्हंशी निर्व्यसनी, होता. आज याउलट चित्र दिसत असून, आरोग्यसंपन्न, खर्या अर्थाने निरोगी, निर्व्यसनी अशी, शंभरातली अगदी बोटावर मोजण्याइतकी माणसं असतील. तरूण वयातच अनेकांना विविध व्याधींनी ग्रासले असून एक प्रकारे वृद्धत्व आल्यासारखे वाटते. मात्र, दुसरी बाजू सुद्धा पाहणे आवश्यक आहे, ती म्हणजे, विविध व्याधींवर मात करण्यासाठी स्वतःला “ फिट” ठेवणार्यां ची संख्याही कमी नाही. मला जेव्हा थोडफार समजू लागलं तेव्हाचे दिवस आठवतात, रस्त्यावर तुरळक गर्दी, पावसाळा आणि उन्हाळ्याचे काही दिवस सोडून दवाखान्यांमध्ये गर्दी जेमतेम असायची. आजकाल तर, अबब! लहान मुलांचा असो, की मोठ्यांचा, दातांचा असो की हाडांचा... कोणताही दवाखाना पाहा, पेशंट्सनी भरलेलाच. एवढं चागलं आहे, की डॉक्टरांच्या उपचारांनी लगेच बरं वाटत असल्याने डॉक्टर आणि पेशंट दोघेही खुष..। शेवटी ही सुद्धा एक सेवाच आहे नां, आणि सेवा ही एखाद्या व्रत

REal Rose

पत्रकार दिनानिमित्त ...

समस्त पत्रकार बांधवांना "पत्रकार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा... बुद्धिःयस्य बलं तस्य । ज्याच्याजवळ श्रेष्ठतेची बुद्धी आहे तोच खरा बलवान होय...। हे सुभाषित आपल्या पत्रकार बांधवांसाठी चपखल ठरते. या बुद्धिचा सदुपयोग करून स्व. बाळशास्त्री जांभेकरांचे स्वप्न साकार करू या...। इंटरनेटच्या युगात अजूनही विशेषतः तालुका-जिल्हा स्तरावरील पत्रकार बंधू-भगिनिंनी स्वतःला अपडेट करण्याची गरज मात्र वाटते. चला तर मग, घेऊनी हाती लेखणी, करू या उज्ज्वल क्रांती.. धरूनी हाती माऊस, साधू या ही उत्क्रांती... सुश्रुत

Its a Class of Its Own...

mist...

mist....only mist, looking itself in mirror...what a beauty I got, from nature...! (Mist in Indore [M.P.] 1st day of winter season 2009.

निवडणुका...महाराष्ट्राच्या...

लवकरच महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभेसाठी मतदान होईल. नेहमीप्रमाणे यावेळीही 'नोट' आणि'व्होट' बँक जोरात आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील भुसावळ साठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-सेना यांच्यातच चुरस असेल हे चित्र तर स्पष्टच आहे. दोन्ही पक्षांनी दिलेले उमेदवार नवीनच आहेत. निवडणुकीत जो उमेदवार विजयी होईल तो होईल. परंतु निवडून आल्यावर आणि विधानसभेत गेल्यावर मतदार संघातील अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे आणि कार्य न विसरता करायवयाची आहेत, हे विसरू नये. पुर्वीच्या ज्येष्ठांचे अनुभव, त्यांचे कार्य यातून शिकून बोध घेऊनच पुढचे पाऊल उचलावे. प्रामुख्याने भुसावळ ते मुंबई पर्यंत एक्सप्रेस, जलद रेल्वे असावी...भुसावळ ते मनमाड अशी आणखी एक रेल्वे मध्य रेल्वे प्रशासनाने सुरू करावी ही मागणी प्रलंबित आहे. पाण्याची समस्या दिवसेंदिवस भेडसावते आहेच. हतनूर धरणाची क्षमता वाढविण्याचा विचार व्हावा...सर्व समाजातील घटकांना सहकार्य व्हावे. विरोधकांना देखील सहकार्य करुन विरोध संपवावा. केवळ विरोधासाठी विरोध न करता विधायक कार्ये व्हावीत, हीच अपेक्षा!