ऑस्ट्रेलियात दिवसेंदिवस भारतीयांवर वांशिक हल्ले होण्याच्या प्रमाणात वाढ होतेच आहे. आणखी किती वाट पाहणार? केवळ चर्चा, सहानुभूती व्यक्त करणे आता बंद करावे. तेथील भारतीयांच्या सहनशक्तीचा आणखी अंत भारत सरकारने न पाहता, त्वरीत त्यांना भारतात परत बोलवावे. सर्व भारतीयांच्या सुरक्षिततेची हमी ऑस्ट्रेलियाने दिल्याशिवाय परत ऑस्ट्रेलियात पाठवू नये. 23 मे 2009 पर्यंत ऑस्ट्रेलियात 81 जणांवर हल्ला झाल्याची माहिती युपीए शासनाने राज्यसभेत दिली होती. 81 काय परंतु खरं तर एकही हल्ला होऊ नये, अशी खबरदारी घेणे महत्वाचे आहे. अनेक बाबतीत भारत आज अमेरिकेचा आदर्श घेऊन, अमेरिकेच्या पावलावर पाऊल ठेवतो, असे असताना या बाबतीत अद्याप हलगर्जीपणा का? विनाविलंब ऑस्ट्रेलियातील भारतीय दूतावास बंद करून पुढील कार्यवाही होणे गरजेचे आहे.
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन विमानतळाच्या सज्जतेचा (Readiness) आढावा घेतला. यापूर्वी नवी मुंबई विमानतळ येथे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय हवाई दलातर्फे घेण्यात आलेली इन्स्ट्रूमेन्ट लँडिंग चाचणी आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोतर्फे घेण्यात आलेली प्रवासी विमान लॅंडिंग चाचणी यशस्वीरीत्या पार पडली होती. या प्रसंगी विपिन कुमार, (भा. प्र. से.) अध्यक्ष, भारतीय विमानतळ प्राधिकरण, श्री. प्रकाश निकम, प्रादेशिक संचालक, नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळ (BCAS), श्री. विजय सिंघल, (भा. प्र. से.), उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शान्तनु गोयल, (भा. प्र. से.), सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्रीमती गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको आणि नवी मुंबई इंटरनॅशनल (एनएमआयएएल) यांचे अधिकारी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी नागरी विमान वाहतूक महासंचलनालय आणि भार...