मुख्य सामग्रीवर वगळा

आता तरी भारतीयांना परत बोलवा...

ऑस्ट्रेलियात दिवसेंदिवस भारतीयांवर वांशिक हल्ले होण्याच्या प्रमाणात वाढ होतेच आहे. आणखी किती वाट पाहणार? केवळ चर्चा, सहानुभूती व्यक्त करणे आता बंद करावे. तेथील भारतीयांच्या सहनशक्तीचा आणखी अंत भारत सरकारने न पाहता, त्वरीत त्यांना भारतात परत बोलवावे. सर्व भारतीयांच्या सुरक्षिततेची हमी ऑस्ट्रेलियाने दिल्याशिवाय परत ऑस्ट्रेलियात पाठवू नये. 23 मे 2009 पर्यंत ऑस्ट्रेलियात 81 जणांवर हल्ला झाल्याची माहिती युपीए शासनाने राज्यसभेत दिली होती. 81 काय परंतु खरं तर एकही हल्ला होऊ नये, अशी खबरदारी घेणे महत्वाचे आहे. अनेक बाबतीत भारत आज अमेरिकेचा आदर्श घेऊन, अमेरिकेच्या पावलावर पाऊल ठेवतो, असे असताना या बाबतीत अद्याप हलगर्जीपणा का? विनाविलंब ऑस्ट्रेलियातील भारतीय दूतावास बंद करून पुढील कार्यवाही होणे गरजेचे आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.