मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

किती उरली आहे अस्खलित मराठी...?

  दिवसेंदिवस जग जवळ येतंय, तसा माणूस माणसापासून दूर जातोय. टीव्ही, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे, इंटरनेट, कॉम्प्यूटर अशा विविध माध्यमांमुळे होणारी प्रगती आणि विकास नाकारता येणार नाही. परंतू माणूस माणसापासून दूर जातोय हे कटूसत्य आहे. काही वर्षांपूर्वी मातृभाषेसह एखादी भाषा बोलता येणारी व्यक्ती आता किमान चार भाषा बोलू लागली आहे. मात्र भोवतालच्या वातावरणामुळे बऱ्याच अंशी कित्येकांच्या, विशेषतः मराठी बांधवांच्या भाषेवर विपरित परिणाम झाला आहे. अन्य मातृभाषा असलेले परंतू महाराष्ट्रात राहणारे बांधव एकमेकांशी संवाद साधताना मातृभाषेतच साधतात. आमचा मराठी बांधव मात्र एकमेकांशी संवाद साधताना मातृभाषेत बोलण्याऐवजी अन्य भाषेत बोलतो. मध्य प्रदेशाकाही राज्यांमध्ये तर सर्रासपणे हे पहावयास मिळते. आजी-आजोबा मराठी बोलतात, आई-वडिल मराठी-हिंदी भाषेत बोलतात आणि तिसरी पिढी म्हणजेच मुलं..या मुलांना तर मराठी अगदी कमी बोलता येतं..! त्यांचे पालक देखील त्यांच्याशी जास्तीत जास्त हिंदीमध्येच बोलतात. हिंदी भाषेचा येथे विरोध नाही, मात्र आपली मातृभाषा विसरता कामा नये, मातृभाषा यायलाच पाहिजे हे संस्कार आपल्या मुलांवर कर

CIDCO organizes Vasant Mela at Urban Haat

  The Urban Haat at Navi Mumbai has surfaced as the new happening destination for the exhibition and sale of artifacts of artisans from various states. Last year, the citizens of Navi Mumbai bought the artifacts from various states displayed at different exhibitions at Urban Haat and also experienced a great time. The exhibitions included CIDCO Navi Mumbai Festival, Kokan Saras, Maharashtra Mahotsav, Handloom Festival, Marathi Vyapari Mitramandal Mahotsav, Vasant Mela, Shravan Mela and Surabhi Dhamaka. Now, Vasant Mela is being organized at Urban Haat from 9th to 20th March, 2011. With an objective to benefit the artists displaying their traditional folk art at the Urban Haat as well as the citizens, CIDCO aims to organize such exhibitions for the whole year at Urban Haat. Through this appeal, Bachat Gats from all Zilla Parishads under Rural Development Department, Maharashtra, artisans related to Khadi Gramodyog Mandal as well as handloom, handicraft and food artists, sculptors

सर्वसामान्यांना दिलासा देणारा रेल्वे अर्थसंकल्प- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, ता. २५ - रेल्वे अर्थसंकल्पात कोणतीही भाडेवाढ नाही, तसेच मुंबईसह राज्यातील विविध शहरे एकमेकांशी जोडणार्‍या नव्या रेल्वेगाड्यांच्या घोषणेमुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्ते केली आहे. श्री. पवार यांनी म्हटले आहे की, नागपूर-कोल्हापूर, पुणे-नांदेड, नागपूर-भुसावळ, मुंबई-सावंतवाडी रोड आणि मुंबई-मनमाड या नव्या गाड्यांच्या घोषणेमुळे राज्यातील महत्वाच्या शहरांमधील दळणवळण वाढणार आहे. राज्याच्या सर्वंकष विकासासाठी ही बाब महत्वाची ठरेल. देशातील प्रमुख महानगरांसाठी केलेली एकात्मिक उपनगरीय रेल्वे नटेवर्क प्रकल्पाची घोषणा मुंबईच्या दृष्टीनेही महत्वाची ठरणार आहे. त्यातून मुंबईतील उपनगरीय सेवा तसेच मेट्रो आणि रेल्वेशी संबंधित इतर बाबींचा कार्यक्षमपणे आणि गतीने विकास होईल. त्याचबरोबर उपनगरीय रेल्वेच्या ४७ नव्या फेऱ्या वाढणार असल्याने मुंबईकरांचा प्रवास सुसह्य होण्यास मदत होईल. विशेषतः ठाणे बेलापूर पट्ट्यातील विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठाणे-वाशी मार्गावरील वाढीव फेर्‍यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठ

यंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचे हित जपणारा - भुजबळ

 मुंबई ता. २५ - केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वसामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प सादर केला आहे. असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. कोणतीही भाडेवाढ नसलेला, ज्येष्ठ नागरिक, अपंगांना भाड्यात सवलत देणारा, युवकांचा विशेष विचार करणारा त्याचप्रमाणे गरीबांना 'इज्जत तिकीटाच्या' माध्यमातून सन्मान प्राप्त करून देणारा हा अर्थसंकल्प आहे. रेल्वेने दुर्गम भाग जोडण्याची घोषणा, दहा हजार लोकांसाठी घरे बांधण्याचा संकल्प आणि हमालांना ट्रॉली उपलब्ध करून देण्याच्या निर्णयामुळेही या अर्थसंकल्पाचा सामाजिक पाया विस्तारला आहे. महाराष्ट्राचीही या अर्थसंकल्पाने उत्तम दखल घेतली असल्याचे सांगून भुजबळ म्हणाले की, मनमान-मुंबई, पुणे-नांदेड मार्गे लातुर, लातूर-पुणे, वसई रोड-पनवेल, चेन्नई-शिर्डी मार्गे बंगळूर, मुंबई-अलाहाबाद, नागपूर-मुंबई दुरांतो दररोज, मुंबई-नवी दिल्ली, हावडा-नांदेड, भुज-दादर अशा अनेक नवीन रेल्वेसेवांसह नव्या पॅसेंजर गाड्यांमुळेही महाराष्ट्रातील जनतेचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. कोल्हापुर, कोकण रेल्वेशी जोडण्याच्या घोषणेमुळे संपूर्ण महाराष्

रेल्वे बजेट २०११...ठळक मुद्दे...! ५७.६३० कोटिंचे बजेट..

ममता बॅनर्जी सादर करीत असलेले रेल्वे बजेट २०११ ऐकताना माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव. रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी सादर करीत असलेल्या ५७.६३० कोटिंच्या रेल्वे बजेट २०११ चे ठळक मुद्दे...:- * आम-आदमी अर्थात सामान्य माणसाला लक्षात घेऊन बजेट... * सिंगूर येथे मेट्रो कोच फॅक्टरी * रायबरेली कारखान्यातून पहिला कोच तीन महिन्यात * अनेक गाड्यांची कोच साठी मागणी, नवीन कोच फॅक्टरींचा प्रस्ताव * जम्मू काश्मिरमध्ये ब्रिज फॅक्टरी * रेल्वे नेटवर्कला इम्फाळ जोडणार * १८० किलोमीटरचा नवीन लोहमार्ग * ८५ नवीन सार्वजनिक-खाजगी प्रकल्प * नंदीग्राममध्ये इंडस्ट्रियल पार्क * रेल-रोको आंदोलने थांबविण्याचे प्रत्येकास आवाहन * रेल्वे मार्गाजवळ राहणार्‍या बेघरांसाठी १०,००० निवारे * रेल्वे अपघातांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या २९ टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर आले. *  ऑनलाइन बुकिंग स्वस्त होणार * पायलट प्रोजेक्ट्समध्ये स्मार्ट कार्ड वापरले जाणार * रेल्वेचे कर्मचारी हीच रेल्वेची मोठी संपत्ती

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

आंबोली घाटातील वनविभागाच्या हद्दीतील संरक्षक भिंतीचे काम तातडीने मार्गी लावावे-भुजबळ

  मुंबई, ता. २४ - आंबोली घाटात वनविभागाच्या हद्दीतील संरक्षक भिंत बांधण्याचे काम तातडीने मार्गी लावण्यात यावे. वनविभागास आवश्यक ते तांत्रिक सहकार्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी करावे अशी सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. आंबोली वनविभागाच्या हद्दीतील कामांबाबत आयोजित बैठकीत श्री. भुजबळ बोलत होते. बैठकीस आमदार दीपक केसरकर, सा.बां.विभागाचे सचिव धनंजय धवड, वनविभाग सहसचिव प्रदीप कुमार आदी उपस्थित होते. गतवर्षी जुलैमध्ये झालेल्या पावसाने आंबोली घाटातील १०० मीटर लांबीची आणि  ४० मीटरपेक्षाही उंचीची दरड कोसळली होती. युद्धपातळीवर काम करून येथील वाहतूक सुरळीत करावी लागली होती. संरक्षक भिंत बांधण्याचे काम वेळेतच पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात पुन्हा एखादी मोठी दरड कोसळून जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आवश्यक ते सर्व सहाय्य घेण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिले आहेत.

'एमटीडीसी' तर्फे शनिवारी घारापुरी बेटावर स्वच्छता मोहिम

  मुंबई, ता. २४ - येथून जवळच असलेल्या जागतिक वारसा असलेल्या एलिफंटा केव्हज् असलेल्या घारापुरी बेटावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातपर्फे मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने शनिवारी (ता. २६ फेब्रुवारी) स्वच्छता व जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले आहे. एलिफंटा केव्हज् (गुहा)नां देशासह विदेशातील पर्यटक देखील मोठ्या संख्येने भेट देतात. परिणामी परिसरात प्लॅस्टिकचा कचरा विखुरलेला असून हा कचरा लाटांमुळे बेटावर जाऊन अडकतो. या कचर्‍यामुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सुमारे १०० स्वयंसेवकांसह महामंडळ, वनविभाग, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत घारापुरी यांचाही मोहिमेत मोठा सहभाग असेल. स्वच्छतेनंतर प्रबोधन करण्यात येईल. गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटाकडे येणार्‍या बोटींमध्येही स्वच्छताविषयी फलक लावण्यात येणार आहेत.

'डेक्कन-ओडिसी' तून ७५ परदेशी पर्यटकांनी घेतले महाराष्ट्र दर्शन

मुंबई, ता. २४ - महाराष्ट्राची लक्झरी ट्रेन 'डेक्कन-ओडिसी' ने बर्‍याच कालावधीनंतर नियमित सहलमार्गावर धाव घेतली. दिनांक १६ ते २३ फेब्रुवारी २०११ या कालावधीत या गाडीतून सुमारे ७५ परदेशी पर्यटकांना महाराष्ट्राची सफर घडविली असल्याची माहिती आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) देण्यात आली. 'डेक्कन-ओडिसी' मुंबई, सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच, गोवा येथील प्रसिद्ध गिरजाघरे, समुद्रकिनारे, कोल्हापूर येथील शालिनी पॅलेस, न्यू पॅलेस, जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला, ताडोबा अभयारण्य, नाशिक येथील गोदावरी घाट आणि प्रसिद्ध मंदिरे इ. ठिकाणांना पर्यटकांनी भेट दिली. सहलीदरम्यान पर्यटकांचे ठिकठिकाणी पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी महाराष्ट्राच्या पारंपारिक लोककलांचे दर्शन घेडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या हंगामात डेक्कन ओडिसीच्या ८ सहली करण्याचा प्रयत्न होता, तथापि पर्यटकांच्या अल्प प्रतिसादामुळे नोव्हेंबर व फेब्रुवारीमध्ये प्रत्येकी एका सहलीचे आयोजन करण्यात आले होते. रेल्वेची अवास्तव हॉलेजची मागणी, सहलीच्या महसूलातील वा

कोल्हापूरच्या पाणीपुरवठा योजनेस तत्वतः मान्यता

  मुंबई, ता. २३ - कोल्हापूर शहरासाठीची थेट पाणीपुरवठा योजना आणि महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या प्रस्तावास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तत्वतः मान्यता दिली. शहरातील विविध कामांबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. कोल्हापूर शहरासाठीच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री म्हणाले, की योजनेचा आर्थिक बोजा, भविष्यातील देखभाल दुरुस्ती व काम करण्याची सुलभता यांचा तौलनिक अभ्यास करून योग्य योजना राबवावी. कोल्हापूर महानगरपालिकेकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे याचाही विचार व्हावा. ही थकबाकी असतानाही आम्ही नव्या योजनेसाठी विशेष बाब म्हणून निधी देत आहोत. ही योजना योग्यरित्या राबविली आणि चालविली गेली पाहिजे. यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेतील सर्वांनीच एकत्र आले पाहिजे. ही योजना प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी पालकमंत्री, महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविक