मुख्य सामग्रीवर वगळा

कौतुकाचा आनंद म्हणजे सायीवर घातलेली पिठीसाखर... -बाबासाहेब पुरंदरे

  इंदूर (ता. ३ फेब्रु.): मुलांना मिळालेलं पारितोषिक कोणतंही असो, त्यांचं कौतुक केलच पाहिजे. मुलांना त्यांना मिळालेल्या पारितोषिकाचं आईवडिलांनी केलेलं कौतुक म्हणजे दुधावरच्या सायीवर घातलेल्या पिठीसाखरेसारख्या आनंदासारखाच असतो. या शब्दात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी, येथील महाराष्ट्र साहित्य सभेच्या आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्याचे कौतुक केले.

येथील महाराष्ट्र साहित्य सभेच्या ५५ व्या शारदोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील यशस्वी प्रतिभावंतांना प्रीतमलाल दुवा सभागृहात शिवशाहीर तथा श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, सध्याचा काळ हा स्पर्धेचा असून कोणत्याही स्पर्धेत आता यश संपादन करणे वाटते तेवढे सोपे राहिले नाही. मात्र प्रयत्न केल्यास यश हे पदरात पडतेच, पालकांनी मुलांचं यश कितीही लहान स्वरुपात असलं तरीसुद्धा त्याचं कौतुक अर्थात appreciation हे केलंच पाहिजे, कष्टाने मिळविलेल्या अशा गुणांचा अंगीकार केला पाहिजे. प्रतिभावंतांच्या या कर्तृत्वावर महाराष्ट्र साहित्य सभेने फुंकर घालण्याचं कार्य या माध्यमातून केलं आहे.

यावेळी श्री. पुरंदरे यांनी समर्थ रामदास स्वामी यांचे साहित्य म्हणजे एक महान देणगी लाभली असल्याचे सांगून अहिल्यादेवी होळकर यांचं महत्त्व देखील जिजाबाई यांच्याइतकच असल्याचे गौरवोद्गार काढले. याचबरोबर वेरूळ येथील १६ व्या (कैलास) लेणीचा उल्लेख करून कर्तृत्व म्हणजे काय असतं हे ही लेणी पाहून लक्षात येतं. या लेणीतील चित्राच्या स्वरुपात साहित्यातील रौद्र, श्रृंगार, हास्य, भय, भक्ती आदी रस कोरलेले असल्याचे सांगून ही लेणी आवर्जून पाहण्याचं आवाहन केलं.

क्षणचित्रे-
  • राष्ट्रीय महापुरुषाची वेशभुषा केलेला पारितोषिक विजेता शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतच पारितोषिक घेण्यास आल्याचा आनंद बाबासाहेबांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होता. त्यांनी यावेळी उठून मुजरा केला.
  • श्रीदुर्गासप्तशतीचा अनुवाद मराठीत करणार्‍या भगिनीस पारितोषिक वितरणापूर्वी बाबासाहेबांनी पवित्र मनाने पादत्राणे काढून नंतर हा पुरस्कार दिला


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड, ४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ ...

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.