मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेत्या कलाकारांचा अभिमान: उपमुख्यमंत्री

'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटाचे निर्माते सचिन आणि बिंदीया खानोलकर तसेच दिग्दर्शक अनंत महादेवन यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार. शेजारी आमदार विनायक मेटे, आमदार विक्रम काळ           मुंबई, ता. 23 - यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटसृष्टीचे नाव कोरणार्‍या कलाकार आणि तंत्रज्ञानांचा आपल्याला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या 'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन तसेच निर्माते सचिन आणि बिंदीया खानोलकर यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आमदार विनायक मेटे, आमदार विक्रम काळे यावेळी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, दादा कोंडके यांनी मराठी चित्रपट रसिकांना खिळवून ठेवले होते. त्यांच्यानंतर अलिकडे निर्माण झालेल्या काही चांगल्या चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी दिली आहे. 'मी सिंधुताई सपकाळ' हा प्रेरणादायी चित्रपट आहे. येत्या

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेत्या कलाकारांचा अभिमान: उपमुख्यमंत्री

मुंबई, ता. 23 - यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटसृष्टीचे नाव कोरणार्‍या कलाकार आणि तंत्रज्ञानांचा आपल्याला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या 'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन तसेच निर्माते सचिन आणि बिंदीया खानोलकर यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आमदार विनायक मेटे, आमदार विक्रम काळे यावेळी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, दादा कोंडके यांनी मराठी चित्रपट रसिकांना खिळवून ठेवले होते. त्यांच्यानंतर अलिकडे निर्माण झालेल्या काही चांगल्या चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी दिली आहे. 'मी सिंधुताई सपकाळ' हा प्रेरणादायी चित्रपट आहे. येत्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान आमदारांसाठी या चित्रपटाचा खास खेळ आयोजित करण्यात येण्याची विनंती पवार यांनी निर्मात्यांना केली. यावेळी अनंत महादेवन म्हणाले की, बाबूराव पेंटर, व्ही. शांताराम यांच्यानंतर आज मर

'जातिनिहाय जनगणनेला नागरिकांनी उत्स्फूर्त सहकार्य करावे' : भुजबळ

मुंबई 23 : गेली 80 वर्षे प्रलंबित असलेली जातवार जनगणनेची मागणी केंद्र सरकारने मंजूर केली असून त्याचे प्रत्यक्ष काम येत्या एक जूनपासून सुरू होणार असून या कामी समता परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आज येथे केले. समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बांद्रा येथील एम.ई.टी.मध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते. श्री. भुजबळ म्हणाले की, यापूर्वीची जातिनिहाय जनगणना सन 1931मध्ये झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळात यंदा प्रथमच होणाऱ्या जातिनिहाय जनगणनेमुळे जातवार शिक्षण, नोकऱ्या, निवारा, आरोग्य, मूलभूत सोयीसुविधा, आर्थिक, सामाजिक स्थिती यांची माहिती उपलब्ध होणार आहे. त्याच्या आधारे पुढील विकास योजना आणि मागासवर्गीयांच्या कल्याणाची धोरणे आखली जातील. त्यानुसार राज्यवार व देशाच्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसी, भटके विमुक्त आणि आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या समाजघटकांना न्याय मिळण्याचे दरवाजे उघडले जातील. समता परिषदेच्या

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांमुळे महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचा गौरव: अजित पवार

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांमुळे राज्याच्या कलाक्षेत्राचा गौरव झाला आहे. या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरस्कारविजेत्यांचे अभिनंदन केले आहे. श्री. पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे की, अठ्ठावन्नाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटसृष्टीचा वरचष्मा आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या या दिमाखदार कामगिरीमुळे मला आनंद झाला आहे. अभिनय, दिग्दर्शन, पार्श्वगायन, निर्मिती या क्षेत्रातील मराठी कलाकार आणि तंत्रज्ञांच्या दमदार कामगिरीमुळे मराठी चित्रपटसृष्टीच्या गुणात्मकतेवर राष्ट्रीय मोहोर उमटली आहे.

संतांनी समाज घडविण्याचे कार्य केले- छगन भुजबळ

कोरेगाव भीमा - संतांनी समाज घडवण्याचे मोठे काम केल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी पहिल्या अखिल भारतीय बहुजन संत साहित्य महासंमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी केले. वाघोली (ता. हवेली) येथे भारतीय जैन संघटना महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या महासंमेलनाचे उद्‌घाटन आज श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाले. संमेलनाचे अध्यक्ष सत्यपाल महाराज, प्रीतिसुधाजी महाराज, आमदार अशोक पवार, सौ. कमलताई ढोले पाटील, प्रा. हरी नरके, प्रा. लक्ष्मण मुंजाळे, डॉ. अजित नदाफ, पी. रघुनाथ, अशोक शहा, अरुण बुर्गाडे, प्रा. दगडे, प्रा. रमणलाल सोनग्रा, महादेव तरवडेकर, श्रवणकुमार महेंद्रकुमार, तसेच स्वागताध्यक्ष हनुमंत उपरे, शिवदास उबाळे, मुख्य प्रवर्तक महेंद्र धावडे, अमित वाघोलीकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश घुले, प्रदीप कंद, अशोक सावंत, रामदास दाभाडे, शंकर भुमकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भुजबळ आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री.भुजबळ म्हणाले, 'पर्यावरणाचा सामाजिक संदेश संत तुकाराम महाराजांनीच आपल्या अभंगातूनही दिला, तर श्रमाला प्रतिष्ठा मिळवून

मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करावे - छगन भुजबळ

मुंबई, दि. 20 मे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 17 च्या चौपदरीकरणाचे काम येत्या अडीच वर्षांत टप्प्याटप्प्याने पूर्ण होईलच, पण तोपर्यंत या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक संबंधित विभागाने आपापले काम जबाबदारीने करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे व्यक्त केली. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भात सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात, नागरिकांची सुरक्षा आणि चौपदरीकरणाच्या अनुषंगाने गेल्या 11 मे रोजी श्री. भुजबळ यांनी आपल्या मंत्रालयातील दालनात बैठक बोलाविली होती. त्या बैठकीत सामोऱ्या आलेल्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच तोडगा काढण्याच्या दृष्टीने त्यांनी आज ही बैठक बोलाविली होती. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) धनंजय धवड, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव भूषण गगराणी, पोलिस महानिदेशक (वाहतूक) श्री. शर्मा, मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) श्री. मंडपे यांच्यासह कोकण विभागातील वन, महसूल, सार्वजनिक बां

हवेत उडणारे आले जमिनीवर...

तीव्र उन्हाचेचटके झाडावरही बसू लागल्यामुळे अखेर हवेत उडणार्‍यांनाही जमिनीवर यावेच लागले...

सिडकोची साडेबारा टक्के भूखंड वाटप संगणकीय सोडत संपन्न

नवी मुंबई, ता. १९: येथील मौजे-उलवे नोडमधील भूमीपुत्रांसाठी साडेबारा टक्के योजने अंतर्गत भूखंड वाटपाची संगणकीय सोडत यापूर्वी अंतिम केलेल्या ज्येष्ठता यादीनुसार नुकतीच सिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील यांच्या उपस्थितीत निर्मल-नरिमन पॉईंट येथे संपन्न झाली. उलवे विभागातील संगणकीय सोडतीला सिडको अध्यक्ष नकुल पाटील,  नगर विकास विभागाचे मुख्यसचिव टी. सी. बेंजामिन, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे आणि नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त भास्कर वानखेडे उपस्थित होते. उलवे सोडतीच्या निकालाशी संबंधित प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या भूखंडांची इरादापत्रे ८ दिवसात रजिस्टर पोस्टाने पाठविण्यात येतील. नागरिकांच्या माहितीसाठी सोडतीच्या निकालाची यादी सिडको भवन, तळमजला, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई व सिडकोच्या www.cidcoindia.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक भूमी व भूमापन अधिकारी सूर्यकांत राठोड यांच्याशी ०२२-६७९९ ८६६४ येथे तसेच सिडको भवन, सातवा मजला, सी. बी. डी. बेलापूर, नवी मुंबई ४००६१४ येथे संपर्क साधावा.

अद्ययावत मासळी बाजार उभारण्यासाठी नगरपालिकांना पाच टक्के अनुदान: उपमुख्यमंत्री

  मुंबई ता. १९ - मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी नगरपालिका क्षेत्रात अद्ययावत मासळी बाजार उभारण्यासाठी राज्य शासनातर्फे पाच टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. नुकतीच मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात आधुनिक मासळी बाजारपेठ उभारण्यासंदर्भात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मत्स्यविकासमंत्री मधुकरराव चव्हाण, राज्यमंत्री भास्कर जाधव तसेच मत्स्यविकास आयुक्त हणमंतराव पवार आदी वरिष्ठ उपस्थित होते. यावेळी श्री. पवार म्हणाले, की राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये अद्ययावत मासळीबाजार उभारण्यासाठी राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळातर्फे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. हा बाजार उभारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची कमाल मर्यादा असून यापैकी ९० टक्के रक्कम राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळ देते तर उर्वरीत १० टक्के रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांना भरावी लागेल. या १० टक्क्यांपैकी केवळ नगरपालिका आणि नगरपंचायतींना राज्य शासन ५ टक्के रक्कम अनुदान स्वरुपात देणार आहे. महानगरपालिकांना मात्र १० टक्के रक्कम स्वतः उभाराव

कोकणच्या समुद्रकिनार्‍यांची भुजबळांनी केली हवाई पाहणी

मुंबई, ता. १३ - राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आज राज्याच्या निसर्गसंपन्न कोकण किनारपट्टीची हवाई पाहणी केली. महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा वैभवशाली समुद्रकिनारा लाभला आहे. ही किनारपट्टी म्हणजे कोकणच्या सर्वांगीण पर्यटन विकासाची गुरूकिल्ली आहे. हीच बाब हेरून श्री. भुजबळ यांनी कोकणच्या विकासाला चालना देण्याचे धोरण स्वीकारले आहे. यावेळी त्यांचे समवेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी होते. श्री. भुजबळ यांनी मांडवा, किहीम, रेवस, जयगड किल्ला जयगड जेटी, कुणकेश्वर येथील केशवसुत स्मारकाची पाहणी केली. याचबरोबर गणपतीपुळे येथील मंदीर व परिसर तसेच तेथील एमटीडीसीच्या रिसॉर्टमधील व्यवस्थेचीही पाहणी केली.