मुख्य सामग्रीवर वगळा

'फ्रेंडशिप'चं 'शिप' स्थिरावतय मैत्रीच्या समुद्रात....!

Water is dramatic and hard to ingore, it is hard to be in different to it, also! पाणी हा घटक संवदेनशील आणि दुर्लक्ष न करण्यासारखा आहे आणि पाण्यापासून स्वत:ला दूर ठेवणे कठीणच ! दादा कोंडके यांच्या एका चित्रपटातलं वाक्य आठवलं, ''ज्यला आय नाय त्याल काय नाय.'' मैत्रीचं अर्धातच 'फ्रेंडशिप'च सुद्धा तसच आहे. ज्याला मित्र नाही त्याला काहीच नाही. दिवसोंदिवस वाढणारी टेन्शन्स घालवण्यासाठी फ्रेंडशिप सारखा दुसरा कोणताच चांगला आधार नाही. दशकापूर्वीपासून भारतातसुद्धा आलेलं मित्रांच्या मैत्रीचे हे जहाज अर्थात 'फ्रेंड्‍स'चं शिप आता मैत्रीच्या अथांग समुद्रात स्थिरवलं आहे.
आई असो की बाबा, ताई असो की दादा... प्रत्येकाचे मित्र-मैत्रिणी असतातच. पूर्वीच्या काळात असलेलं आई-‍वडिल आणि मुलं यांच्यातलं अंतरही आता कमी झालय. दोघेही मुलांशी मित्राप्रमाणे वागू लागले आहेत, वागण्याचा प्रयत्न करताहेत. याला काही अपवाद असतील. याचा परिणाम चांगलाच (पॉझिटीव्ह) दिसत असून दोन पिढ्यांमधला दुरावा कमी होत असल्याचं जाणवतं आहे.
A friendship is someone who knows the song is your heart and can not sing it back to you when you have forgotten the words.....! हे आपल्या आई-वडिलांना....लागू पडते. आपल्या हातून काही चुक झाल्यास पाठीवरून प्रेमाच्या मोरपीसाने हात फिरवणारी आई, आणि 'पुन्हा असं करू नकोस' असं म्हणणारे बाबा आपल्याला संभाळून घेतात.
मुलंसुद्धा लवकर मॅच्युअर (परिपक्व) होत आहेत. योग्य अयोग्य यातला फरकही त्यांना समजू लागलाय. मात्र, काहीही असलं तरी कोणामागचं 'टेन्शन' हे अजून सुटलेलं नाही. गरिबांना गरीबीचं, श्रीमंतांना श्रीमंतीचं, विद्यार्थ्यांना अभ्यासाचं, नोकरीत कामाचं.... ज्याला त्याला ज्याचं त्याचं टेन्शन आहेच. अभ्यास, नोकरी यात दिवसातले दहा तास घराबाहेर जातात. यामुळे ही टेन्शन्स कमी करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी मित्रासारखा दुसरा कोणताही घटक नसतो. आई वडिल रागावले, बॉसशी भांडण झालं तरी या विषयी चर्चा करायला सगळ्यात जवळचा वागणारा ‍'मित्र' हाच असतो, हा अनुभव आहे.
आजकलच्या मुलांना इंटरनेटमुळे ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर, मेसेंजर, जी टॉक यांनी जवळ आणलयं, मुलं दूर असली तरी यामुळे एकमेकांमध्ये अंतर कमी झालयं. 'फ्रेंडशिप डे' च्या निमित्ताने कित्येक मैत्रीची नाती फ्रेंडशिक बेल्ट्‍समध्ये घट्ट बांधली जातील. मात्र मैत्रीबद्दल अल्बर्ट कॅमस यांनी म्हटलंय -
Don't walk in the front of me, I may not follow,
Don't walk behind me, I may not lead
Walk beside me and be my friend.....!
फक्त एकच आपण मैत्री करत असलेला हा मित्र किंवा मैत्रिण आपली फसवणुक तर करत नाही नां, हे नक्की समजून घ्या, त्यासाठी आपले पालक, चांगले शिक्षक यांची मदत-सहकार्य जरून घ्या.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.