मुख्य सामग्रीवर वगळा

'फ्रेंडशिप'चं 'शिप' स्थिरावतय मैत्रीच्या समुद्रात....!

Water is dramatic and hard to ingore, it is hard to be in different to it, also! पाणी हा घटक संवदेनशील आणि दुर्लक्ष न करण्यासारखा आहे आणि पाण्यापासून स्वत:ला दूर ठेवणे कठीणच ! दादा कोंडके यांच्या एका चित्रपटातलं वाक्य आठवलं, ''ज्यला आय नाय त्याल काय नाय.'' मैत्रीचं अर्धातच 'फ्रेंडशिप'च सुद्धा तसच आहे. ज्याला मित्र नाही त्याला काहीच नाही. दिवसोंदिवस वाढणारी टेन्शन्स घालवण्यासाठी फ्रेंडशिप सारखा दुसरा कोणताच चांगला आधार नाही. दशकापूर्वीपासून भारतातसुद्धा आलेलं मित्रांच्या मैत्रीचे हे जहाज अर्थात 'फ्रेंड्‍स'चं शिप आता मैत्रीच्या अथांग समुद्रात स्थिरवलं आहे.
आई असो की बाबा, ताई असो की दादा... प्रत्येकाचे मित्र-मैत्रिणी असतातच. पूर्वीच्या काळात असलेलं आई-‍वडिल आणि मुलं यांच्यातलं अंतरही आता कमी झालय. दोघेही मुलांशी मित्राप्रमाणे वागू लागले आहेत, वागण्याचा प्रयत्न करताहेत. याला काही अपवाद असतील. याचा परिणाम चांगलाच (पॉझिटीव्ह) दिसत असून दोन पिढ्यांमधला दुरावा कमी होत असल्याचं जाणवतं आहे.
A friendship is someone who knows the song is your heart and can not sing it back to you when you have forgotten the words.....! हे आपल्या आई-वडिलांना....लागू पडते. आपल्या हातून काही चुक झाल्यास पाठीवरून प्रेमाच्या मोरपीसाने हात फिरवणारी आई, आणि 'पुन्हा असं करू नकोस' असं म्हणणारे बाबा आपल्याला संभाळून घेतात.
मुलंसुद्धा लवकर मॅच्युअर (परिपक्व) होत आहेत. योग्य अयोग्य यातला फरकही त्यांना समजू लागलाय. मात्र, काहीही असलं तरी कोणामागचं 'टेन्शन' हे अजून सुटलेलं नाही. गरिबांना गरीबीचं, श्रीमंतांना श्रीमंतीचं, विद्यार्थ्यांना अभ्यासाचं, नोकरीत कामाचं.... ज्याला त्याला ज्याचं त्याचं टेन्शन आहेच. अभ्यास, नोकरी यात दिवसातले दहा तास घराबाहेर जातात. यामुळे ही टेन्शन्स कमी करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी मित्रासारखा दुसरा कोणताही घटक नसतो. आई वडिल रागावले, बॉसशी भांडण झालं तरी या विषयी चर्चा करायला सगळ्यात जवळचा वागणारा ‍'मित्र' हाच असतो, हा अनुभव आहे.
आजकलच्या मुलांना इंटरनेटमुळे ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर, मेसेंजर, जी टॉक यांनी जवळ आणलयं, मुलं दूर असली तरी यामुळे एकमेकांमध्ये अंतर कमी झालयं. 'फ्रेंडशिप डे' च्या निमित्ताने कित्येक मैत्रीची नाती फ्रेंडशिक बेल्ट्‍समध्ये घट्ट बांधली जातील. मात्र मैत्रीबद्दल अल्बर्ट कॅमस यांनी म्हटलंय -
Don't walk in the front of me, I may not follow,
Don't walk behind me, I may not lead
Walk beside me and be my friend.....!
फक्त एकच आपण मैत्री करत असलेला हा मित्र किंवा मैत्रिण आपली फसवणुक तर करत नाही नां, हे नक्की समजून घ्या, त्यासाठी आपले पालक, चांगले शिक्षक यांची मदत-सहकार्य जरून घ्या.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्जता- विमानतळ परिचालनाचा महत्त्वाचा टप्पा

 नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन विमानतळाच्या सज्जतेचा (Readiness) आढावा घेतला.  यापूर्वी नवी मुंबई विमानतळ येथे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय हवाई दलातर्फे घेण्यात आलेली इन्स्ट्रूमेन्ट लँडिंग चाचणी आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोतर्फे घेण्यात आलेली प्रवासी विमान लॅंडिंग चाचणी यशस्वीरीत्या पार पडली होती. या प्रसंगी विपिन कुमार, (भा. प्र. से.) अध्यक्ष, भारतीय विमानतळ प्राधिकरण, श्री. प्रकाश निकम, प्रादेशिक संचालक, नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळ (BCAS), श्री. विजय सिंघल, (भा. प्र. से.), उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शान्तनु गोयल, (भा. प्र. से.), सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्रीमती गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको आणि नवी मुंबई इंटरनॅशनल (एनएमआयएएल) यांचे अधिकारी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी नागरी विमान वाहतूक महासंचलनालय आणि भार...

जामनेर- नमो कुस्ती महाकुंभ: अमृता पुजारी, विजय चौधरी यांचे वर्चस्व

 जळगाव, (क्रीडा प्रतिनिधी)- कुस्तीप्रेमींच्या जनसागरासमोर लाल मातीत झालेल्या संघर्षात भारतीय पहिलवानच भारी ठरले. नमो कुस्ती महाकुंभ २ अंतर्गत देवाभाऊ केसरी  आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगलमध्ये महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीसह सर्वच भारतीय पहिलवानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशी पहिलवानांना धूळ चारत आपले वर्चस्व दाखवून दिले. देवाभाऊ केसरीच्या निमित्ताने आयोजित आंतरराष्ट्रीय दंगलमध्ये महाराष्ट्र केसरी विजेत्यांनी जगभरातील 9 देशांमधून आलेल्या नामवंत पहिलवानांना पराभूत करून कुस्तीच्या मैदानी परंपरेचा अभिमान वाढवला. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेप्रमाणे कुस्तीत महिलाना समान सन्मान देताना या मैदानातील पहिली आणि अंतिम कुस्ती महिलांची लावण्यात आली. कुस्तीच्या इतिहासात प्रथमच महिला कुस्तीला हा सन्मान मिळाल्यामुळे महिला कुस्तीपटूंमध्ये आणि कुस्तीप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. आपल्या तालुक्यात कुस्तीच्या मैदानात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय पहिलवान येणार असल्यामुळे सुमारे पन्नास हजारांपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींचा अथांग जनसागर पसरला होता....

मार्चमध्ये पनवेल येथे चौथे राज्यव्यापी साहित्य संमेलन: कवी, गजलकारांना सहभागी होण्याचे संस्थांचे आवाहन

 पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. याकरिता सहभागी होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील नामवंत कवी, गजलकारांनी आपल्या स्वरचित कविता, गजल २० फेब्रुवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि विश्वव्यापी मराठी साहित्य, सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे. अभिजात मराठी भाषेच्या जतनाकरिता गेली अनेक वर्षे दोन्ही संस्था कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली कवी संमेलने, गजल मुशायरा, चर्चासत्रांपासून मराठी भाषेचा गोडवा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सकाळी वारकरी दिंडीतून ‘ज्ञानोबा-तुकोबा’ यांच्या गजरासह ग्रंथ दिंडीत टाळ, चिपळ्या, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पारंपरिक पद्धतीने नयनरम्य पालखी काढण्यात येईल. या परंपरेच्या माध्यमातून पनवेल शहराचे साहित्य, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जतन केला जात आहे. सकाळी दिंडी, उद्घाटन सोहळा, एक-एक तासाच्या अवधीची दोन चर्चासत्रे, कवी आख्यान, गजल मुशायरा याशिवाय अन्य ...