मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदार जागृती अभियान - नीला सत्यनारायण

मुंबई, ता. 21 - महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लक्षात घेऊन 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त सप्ताहभर मतदार जागृती अभियान राबवावे, असा सूचना राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी महानगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या निवडणुकीत पैसे किंवा दारूचा वापर होऊ नये यासाठी महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या दक्षता समित्यांच्या मदतीने या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करायची आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसाठी तयार केलेल्या सीडींमध्ये आवश्यक ते बदल करून या सीडी स्थानिक केबल टीव्हीवरून प्रसारित कराव्यात आणि इतर माध्यमांद्वारेही या अभियानाची व्यापक प्रसिद्धी करावी. त्याचबरोबर मतदारांना आवाहन करणारे फलकही लावण्यात यावेत, अशा सूचना देखील श्रीमती सत्यनारायण यांनी दिल्या आहेत. विविध प्रलोभनांचा वापर करून सर्रासपणे मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न काही उमेदवार किंवा राजकीय पक्षांकडून करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे येत आहेत. ते टाळण्यासाठी आ

दिल्ली येथे विमानसेवा पूर्वपदावर

नवी दिल्ली ता. 21 - येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज विमानसेवा पुन्हा पूर्व पदावर आली. गेले दोन दिवस दाट धुक्यामुळे येथील विमानसेवा विस्कळीत झाली होती. आज धुके होते परंतु दृश्यमानता चांगली असल्यामुळे धुक्याचा विशेष प्रभाव न पडता कोणतीही विमानसेवा विस्कळीत झाली नाही. आज दृश्यमानता सुमारे 200 मीटर होती असे सूत्रांनी सांगितले. विमानोड्डाण सेवा गेले दोन दिवस विस्कळीत होऊन जवळपास 200 विमानांच्या सेवेवर याचा विपरीत परिणाम होऊन विमानांना 2 ते 8 तास विलंब झाला होता, 28 विमाने रद्द करावी लागली होती तसेच 19 विमानांचा मार्ग बदलविण्यात आला होता. दरम्यान इंदूर येथे देखील धुक्यामुळे विमानसेवेवर परिणाम झाला होता.

कॉर्पोरेट खोडी...

प्रत्येक क्षेत्रातच कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत असल्याची ही बोलकी खोडी...

काश्मिरने पांघरली बर्फाची शाल...

LOHRI & MAKAR SANKRANTI CELBERATED AT NAVI MUMBAI

16th Jan 2012 : Both “LOHRI & MAKAR SANKRANTI” were celebrated on 15th Jan 2012 at NMMC Ground, Sector – 04, Vashi, Navi Mumbai with great enthusiasm. It was a rare example of a joint celebration displaying the cultural of Punjab and Maharashtra promising a further boost to the secular sprit. The “LOHRI” fire was lit by the Honorable Shri Ganesh Naik, Guardian Minister Thane in the presence a huge gathering. He distributed “TIL & GUR” as per the traditional greetings on Makar Sakranti. Shri Sanjiv Naik, Honorable Member of Parliament, Shri Sandeep Naik, MLA and Shri Sagar Naik, Honorable Mayor of Navi Mumbai joined him along with presidents of all Gurudwaras of Navi Mumbai, Chairman of Punjabi Cultural & Welfare Association (PCWA) and prominent personalities of Navi Mumbai. . A colorful Punjabi cultural program organized under the banner of “NAVI MUMBAI SAHITYA & SANSKRUTI PARISHAD” and patronage of Shri Sagar Naik, Mayor of Navi Mumbai being the first such cultural

खारघर, द्रोणागिरी आणि उलवे परिसरात 19 व 20 जानेवारी दरम्यान पाणीपुरवठा बंद

मुंबई, ता. 17- नवी मुंबईच्या खारघर, द्रोणागिरी आणि उलवे नोड्समध्ये सिडकोद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. हेटवणे येथील मुख्य जलवाहिनीच्या तांत्रिक कामाकरिता गुरूवार (ता. 19) व शुक्रवार (ता. 20) या दोन दिवशी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. नागरीकांनी पाण्याचा पुरेसा साठी करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तीळा-तीळाने बोलणे...

होत आहे कमी तीळा-तीळाने बोलणे.. आहेत याला बरीच कारणे.. फेसबुक सुद्धा यातले एक आहे... नको आता श्लोक अन् नको दोहे... नको आम्हां सुश्रुत, चरक वाग्भट... येतात विचार असे मनात पटपट.. पटपट विचाराचाच वाटतो आहे खेद... मित्रांनो, पण विसरू नका कोणी आपला घरचा "आयुर्वेद"...

निवडणुकीत विजय प्राप्त करणे हीच आपल्यासाठी वाढदिवसाची भेट ठरणार-मायावती

नवी दिल्ली - ता. 15: आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा विजय होणे हीच आपल्या वाढदिवसाची भेट ठरेल, असे मत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी व्यक्त केले. आपल्या 56 व्या वाढदिवसानिमित्त त्या बोलत होत्या. आचारसंहितेमुळे वाढदिवसाचा कोणताही कार्यक्रम आयोजित केला नसल्याचे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री मायावती यांनी सांगितले, की आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून पक्ष यंदा आपल्या वाढदिवसाचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. पक्ष कार्यकर्ते संक्रांत त्यांच्या कुटुंबियांसमवेत साजरी करतील. आगामी विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त करणे हेच आपले लक्ष्य असून निवडणुकीत विजय प्राप्त करणे हीच आपल्यासाठी वाढदिवसाची सर्वात मोठी भेट ठरणार आहे. यावेळी त्यांनी सर्व 403 जागांकरिता उमेदवारांची यादी जाहीर केली. निवडणुकीसाठी 88 जागा अल्पसंख्यांक, 103 अन्य मागासवर्गीय, 85 मुस्लीम आणि 117 जागांपैकी 74 जागा ब्राह्मण आणि 33 जागांसाठी क्षत्रिय उमेदवारांना पक्षातर्फे निवडणुकीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. यावेळी त्या म्हणाल्या, की गेल्या निवडणुकीत चुकीच्या उमेदवारांना निवडणुकीत उभे रहाण्याची संधी

गुळाची पोळी

नारायण..नारायण...