मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

अभिरूची...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील साहित्य-नाट्य संमेलनांना अनुदान: अजित पवार

 मुंबई, ता. २२ - महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी साहित्य संमेलन तसेच नाट्य संमेलनांना अनुदान देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आज अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील गावांना विविध योजनांसाठी आर्थिक मदत देण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सीमा भागातील मराठी भाषिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आघाडी शासन प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या मराठी साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलनांना महाराष्ट्र शासनातर्फे अनुदान दिले जाईल. बेळगाव येथे भरणार्‍या साहित्य संमेलनास दरवर्षी तर इतर ठिकाणी होणार्‍या संमेलनांना आलटून-पालटून अनुदान दिले जाईल. याशिवाय नाट्य संमेलन तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सांस्कृतिक संचालनालयाला एक कोटी रुपये देण्यात येतील. त्याचबरोबर या भागातील मराठी ग्रंथालये सुसज्ज व्हावीत यासाठी ग्रंथ-पुस्तक खरेदी, संगणकीकरण तसेच इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ग्रंथालय संचालनालयाला एक क

उत्तर प्रदेश आगामी विधानसभा निवडणुकीत 'हिंदुत्व' प्रमुख मुद्दा नसेल: उमा भारती

लखनौ, ता. २२ (वृत्तसंस्था) - सन २०१२ मध्ये उत्तर प्रदेशच्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये हिंदुत्व आणि राम मंदीर हा भाजप चा प्रमुख मुद्द नसेल. असे भाजप च्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी स्पष्ट केले आहे. उमा भारती म्हणाल्या, की हिंदुत्व आणि राम यांच्यावर आपला विश्वास आहे. आम्हांला इथे रामराज्यच अपेक्षित आहे. राम मंदीराचा प्रश्न हा श्रद्धेचा भाग आहे मात्र राज्याच्या निवडणुकीसाठी तो राजकीय अजेंडा नसेल. आम्ही गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा बनविणार आहोत. मी हिंदुत्व आणि राम मंदीर प्रश्नाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. मध्यंतरी साडेपाच वर्षे भाजप मध्ये नसताना देखील आपण याबाबत तडजोड केलेली नाही. काँग्रेस सुद्धा उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार हेच मुद्दे घेणार असल्याच्या विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, की केंद्रात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसने उत्तर देणे अपेक्षित आहे. "चोराकडे चोरच बोट कसे दाखवू शकेल?" असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि उत्तर प्रदेशचे प्रमुख दिग्विजय सिंग

प्रा. सुरेश तेंडुलकर यांच्या निधनाने अर्थव्यवस्थेचा एक अध्याय अस्तंगत

मुंबई, ता. २१ - प्रा. सुरेश तेंडूलकर यांच्या निधनाने भारतीय अर्थव्यवस्थेचा एक अध्याय अस्तंगत झाला आहे. या शब्दात राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. श्री. पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे, की प्रा. तेंडूलकर यांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान अत्यंत मोलाचे आहे. देशातील दारिद्र्य निर्मूलनासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेच्या पार्श्वूभूमीवर देशाची विकासविषयक धोरणे ठरविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेस चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जागतिक किर्तीचा अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांचा लौकिक होता.

सांडपाणी व्यवस्थापनासाठी संयुक्त प्रकल्प राबवावा: अजित पवार

मुंबई, ता. २१ - शहरानजीकच्या गावांमधील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामविकास आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने संयुक्त प्रकल्प राबवावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आज बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी श्री. पवार म्हणाले, की ग्रामीण भागात तसेच शहरांनजीकच्या गावांमध्ये सांडपाण्याच्या व्यवस्थापनाची फारशी सोय नाही. त्यामुळे नगरपालिका तसेच महानगरपालिकांनी सांडपाणी व्यवस्थापन केले तरी शेजारच्या गावांमधून येणार्‍या सांडपाण्यामुळे पाणी प्रदूषित होते. हे टाळण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांनी जुलैअखेरपर्यंत संयुक्त प्रकल्प तयार करून तो केंद्र शासनाकडे पाठवावा. असा प्रकल्प राबविण्यासाठी खासगी क्षेत्राचा सहभाग कसा घेता येईल, याचा देखील विचार केला जावा, असेही ते म्हणाले. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री लक्ष्मणराव ढोबळे, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या मुख्यसचिव मालिनी

राक्षस

दहावीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई, ता. १७: माध्यमिक शालांत परीक्षेत (इ. दहावी) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. आपल्या आवडीनुसार करिअर निवडण्याचे आवाहन करत त्यांनी भावी वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता जिद्दीने पुन्हा प्रयत्न करावा. तसेच उपलब्ध संधीचा शोध घेऊन त्यात यश मिळवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

तळ्यात नव्हती बदके दोन...

तळ्यात नाही..मळ्यात तर नाहीच नाही...तर...अन्नासाठी चक्क रस्त्यावर आलेली बदकं

बाळ-गोपाळ मंडळी