मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सुनामी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

धन्य ते जपान...

गेल्या आठवड्यात जपानमध्ये रिश्टर स्केल 8.1 तीव्रतेच्या झालेल्या भूकंपात झालेली प्रचंड हानी आणि यानंतर आलेली त्सुनामी यांचा सामना अजूनही जपान करतोय. सुमारे 15 हजार नागरिक बेपत्ता असल्याचा शासकीय आकडा आहे. प्रत्यक्षात ही संख्या निश्चितच फार मोठी असेल. फुकुशिमा शहर जवळपास फुंकलेच गेले असून शिमग्यापर्यंत शिमा शिल्लक राहणार की नाही अशी भीती जगभरातील शास्त्रज्ञांना वाटत असून अभ्यास करून त्यांनी 48 तासांची मुदत दिली. जपानच्या अणूभट्ट्यांमध्ये लागलेली आग यानंतर झालेले रेडिएशन यामुळे तर आता रेडिएशनचे हे ढग अमेरिकेपर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जपानच्या अणूभट्ट्या वाचविण्यासाठी अमेरिकेने मदतीचा हात पुढे केला आहे. परंतू सदैव सैनिका पुढेच जायचे..या उक्तीप्रमाणे या देशाने आजपर्यंत केलेली प्रगती आणि विकास निश्चितच प्रशंसनीय आहे. वारंवार किरकोळ प्रमाणावर भूकंप होत असल्यामुळे येथील प्रत्येक नागरिकास, लहान मुलांना देखील भूकंपजन्य परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी आणि काळजीचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षणच फार मोठी भूमिका पार पाडत आहे. त्सुनामी येऊन पुढे झालेले नुकसान हा भाग वेगळा...मात

निघाले देश बुडवायला..

  जपानमध्ये काही दिवसांपूर्वीच झालेल्या भूकंप आणि त्सुनामी मुळे सगळीकडे पाणीच पाणी होऊन आणि हजारो घरे, मालमत्ता पुरात वाहून गेल्यामुळे प्रचंड जीवितहानी झाली. जीवंत राहिलेल्यांनी पुन्हा शुद्धीवर आल्यानंतर हे विदारक दृश्य पाहून पाणी-पाणी झाले. संपूर्ण देशच जणू निसर्गाने पाण्यात बुडविल्यासारखी स्थिती जपानमध्ये निर्माण झाली आहे. जपानमध्ये निसर्गानेच देश बुडवला आहे. तर भारतात मात्र विविध घोटाळे, भ्रष्टाचार, काळा पैसा साठविणे, कर चुकवेगिरी आदी विविध प्रकाराने माणसांकडूनच मानव-निर्मित सुनामी येऊन यातच बहुदा देश बुडवला जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.