मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

रेल्वे अर्थसंकल्प 2011 प्रतिक्रिया लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सर्वसामान्यांना दिलासा देणारा रेल्वे अर्थसंकल्प- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, ता. २५ - रेल्वे अर्थसंकल्पात कोणतीही भाडेवाढ नाही, तसेच मुंबईसह राज्यातील विविध शहरे एकमेकांशी जोडणार्‍या नव्या रेल्वेगाड्यांच्या घोषणेमुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्ते केली आहे. श्री. पवार यांनी म्हटले आहे की, नागपूर-कोल्हापूर, पुणे-नांदेड, नागपूर-भुसावळ, मुंबई-सावंतवाडी रोड आणि मुंबई-मनमाड या नव्या गाड्यांच्या घोषणेमुळे राज्यातील महत्वाच्या शहरांमधील दळणवळण वाढणार आहे. राज्याच्या सर्वंकष विकासासाठी ही बाब महत्वाची ठरेल. देशातील प्रमुख महानगरांसाठी केलेली एकात्मिक उपनगरीय रेल्वे नटेवर्क प्रकल्पाची घोषणा मुंबईच्या दृष्टीनेही महत्वाची ठरणार आहे. त्यातून मुंबईतील उपनगरीय सेवा तसेच मेट्रो आणि रेल्वेशी संबंधित इतर बाबींचा कार्यक्षमपणे आणि गतीने विकास होईल. त्याचबरोबर उपनगरीय रेल्वेच्या ४७ नव्या फेऱ्या वाढणार असल्याने मुंबईकरांचा प्रवास सुसह्य होण्यास मदत होईल. विशेषतः ठाणे बेलापूर पट्ट्यातील विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठाणे-वाशी मार्गावरील वाढीव फेर्‍यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठ