मुख्य सामग्रीवर वगळा

महिलांचे हक्क व कल्याण समितीचा सिडको महामंडळामध्ये दौरा

नवी मुंबई, ता. ११ - महिलांचे हक्क व कल्याण समितीचा दौरा दिनांक 11 जुलै 2017 रोजी सिडको भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याच्या निमित्ताने महिलांचे हक्क व कल्याण समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत श्रीमती मनिषा चौधरी, विधानसभा सदस्य तथा समिती प्रमुख, श्रीमती सीमा हिरे, विधानसभा सदस्य श्रीमती दीपिका चव्हाण, विधानसभा सदस्य, श्रीमती विद्या चव्हाण, विधान परिषद सदस्य, ॲड. हुस्नबानू खलिफे, विधान परिषद सदस्य व श्रीमती सायली कांबळे, अवर सचिव आदी उपस्थित होत्या. यावेळी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी श्री. विनय कारगांवकर, सहव्यवस्थापकीय संचालक श्री. राजेंद्र चव्हाण, सहव्यवस्थापकीय संचालिका श्रीमती. प्राजक्ता लवंगारे वर्मा व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महिलांचे न्याय्य हक्क व त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी राबवण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांची पूर्तता होत असल्याची पडताळणी करून समितीद्वारे त्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे सिडकोतर्फे खास महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या सिडको मनस्वी स्त्री संसाधन केंद्र व प्रकल्पबाधित महिलांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने राबवण्यात येत असलेल्या सिडको तारा प्रकल्पाबद्दल या बैठकीत माहिती देण्यात आली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012