मुख्य सामग्रीवर वगळा

डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतीस छगन भुजबळ यांचे अभिवादन

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, दि. 14 एप्रिल : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 120व्या जयंतीनिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज सकाळी दादरच्या चैत्यभूमीस भेट देऊन त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.
चैत्यभूमी येथे आज सकाळपासूनच आंबेडकरी जनतेच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. यावेळी चैत्यभूमीचे दर्शन घेणाऱ्या मान्यवरांमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मंत्री जयंत पाटील, मंत्री वर्षा गायकवाड, मुंबईच्या महापौर श्रध्दा जाधव, खासदार एकनाथ गायकवाड, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र वर्मा, डॉ. राजेंद्र गवई, माजी आमदार संजय दत्त, महेंद्र साळवे, चंद्रकांत कसबे, नागसेन कांबळे आदींचा समावेश होता.
याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग नाक्यावरील चौकाचे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक चौक' असे नामकरण करण्यात आले. या कार्यक्रमासही मुख्यमंत्र्यांसह सर्व मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी आंबेडकर यांच्याविषयी नरेंद्र वाबळे यांनी तयार केलेल्या विशेषांकाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012