मुख्य सामग्रीवर वगळा

कर्नाळा अभयारण्याच्या हद्दीत भुयारी मार्ग प्रस्तावित: भुजबळ

मुंबई, ता. ८ (विशेष प्रतिनिधी) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ च्या चोपदरीकरणाच्या कामामध्ये पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातील कर्नाळा अभयारण्याच्या हद्दीतून जाणार्‍या रस्त्याबाबत गेले वर्षभर केंद्र शासनाकडे पाठपुरावा करूनही काही निष्पन्न न झाल्याने या वनविभागातील हद्दीपुरता भुयारी मार्ग तयार करण्याचे प्रस्तावित असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत सांगितले.
सर्वश्री सुभाष देसाई, भरतशेठ गोगावले, राजन साळवी, सदानंद चव्हाण, रवींद्र वायकर, विनोद घोसाळकर, प्रकाश सावंत, सूर्यकांत दळवी, विजय शिवतारे, महादेव बाबर या सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेसंदर्भात निवेदन करताना श्री. भुजबळ बोलत होते. महाड-संगमेश्वर येथे ट्रॉमा केअर हॉस्पिटलची कामे गतीने सुरू असून लवकरच ती कार्यान्वित होतील अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली.
यावेळी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी ट्रॉमा केअर सेंटरला परवानगी देत असतानाच त्याठिकाणी आवश्यक पदनिर्मिती तसेच आधुनिक यंत्रणा उपलब्ध करण्याची तरतूद करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांना केली. यावर, ट्रॉमा केअर सेंटर उभारतानाच त्यासाठीच्या फर्निचरसह अन्य वैद्यकीय सामग्रीसाठी तरतूद करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती श्री. पवार यांनी दिली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012