मुख्य सामग्रीवर वगळा

सुट्टीची भटकंती...(३)

पहाटे पाच वाजताच मामाने उठवलं. मी फ्रेश होईपर्यंत मामीने चहा टाकला होता. त्या चहाला काय चव होती सांगू? व्वा. कधी नव्हे ते शुद्ध आणि धारोष्ण दूध होते त्या चहात. त्यामुळे तो चहा इतका छान लागत होता, की अगदी ३-४ कप प्यावासा वाटत होता...। शेत गावापासून थोडं दूर असल्यामुळे बाईकने जाऊ या, असं मामाने सांगितल्यानंतर मी बाईकऐवजी बैलगाडीने जाऊ असं म्हटल्यानंतर मामालाही आनंद झाला. जोडी गाडीला जुंपून पांथस्थ झालो. सकाळच्या त्या आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागातल्या त्या रस्त्यावर बैलांच्या गळ्यातली घंटा मंजूळ स्वरांनी भारल्याप्रमाणे वाजत होती, ते छान वाटत होतं. वाटेत भेटणारा जवळपास प्रत्येकजणच मामाला रामराम...। करत होता. शेत जवळ येऊ लागलं तशी कच्ची वाट लागली...आणि पाहता-पाहता आमच्यापुढे नकळत सात-आठ बैलगाड्या दिसल्या आणि मी आवाक झालो. गावाकडचे लोक किती लवकर उठतात आणि शेतावर जातात हे लक्षात येऊन काही अंशी माझी स्वतःची आणि शहराची तुलना करू लागलो...असो। ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी सकाळी सातला शेतात पोहोचलो.
शेतात पोहोचल्यानंतर बैलांची जोडी मामाने एका मोठ्या झाडाखाली बांधली. आम्ही पुढे गेलो, परंतू शेतात तर कोणतच पीक दिसत नव्हतं. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नसेल असा अंदाज मी मनात बांधला. मामाला शेतात काहीच नाही, मग कशाला आलोय आपण? असा प्रश्न केला. त्यावर तो मिश्किलपणे हसला आणि, काहीही नसलं तरी तण-काडी असतेच नां...। असं सांगून समोर शेतात पडलेला कचरा वेचणी सुरू केली. मी सुद्धा जमेल तशी मदत करू लागलो आणि काही तासांमध्ये भरपूर तण-काडी गोळा झाली. तोपर्यंत सूर्य डोक्यावर आला होता. झाडावरच्या कावळ्यांना पोटातले कावळे सुद्धा ओरडून दाद आणि साद देत होते. त्यामुळे आम्ही विहीरीवर जाऊन आधी हातपाय स्वच्छ धुतले. नंतर जेवणासाठी झाडाखाली गेलो. एव्हाना बैलांनी सुद्धा कडबा आणि घासगंजी खाऊन फस्त केली होती. अजून नांगरटीची कामं नसल्यामुळे त्यांना तसा आरामच होता. बैल सुद्धा बसून संथपणे रवंथ करत होते. आम्ही मामीने दिलेला टिफिन उघडला..टिफिन उघडल्यानंतर टिफिनमधून मस्त ठेच्याचा वास आला..मस्तपैकी मिरचीचा ठेचा आणि कळण्याच्या भाकरी, पुरी, काकडी, टोमॅटो यांचं सलाद, सोबत लिंबू दिलं होतं. जेवणावर ताव मारून आम्ही पुन्हा कामाला सुरवात केली. पण कधी नव्हे ते इतके सुग्रास अन्न मिळाल्यासारखेच मी जेवल्यामुळे झोप आली होती. काही वेळ झोपू असा विचार करून मी मामाला सांगितलं आणि पुन्हा झाडाखाली येऊन तिथल्या ताडपत्रीवर जाऊन पहूडलो आणि क्षणात झोप लागली.
संध्याकाळी पाचला जाग आल्यानंतर पुन्हा थोडं काम केलं. सूर्य मावळतीला आल्यानंतर आम्ही परत घराकडे कूच केलं. घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा चहा प्यायलो...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012