मुख्य सामग्रीवर वगळा

तर विश्वचषकाविषयी वास्तव सहज सामोरे येईल...

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
नुकत्याच पार पडलेल्या क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेच्या चषकाबद्दल सध्या दावे-प्रतिदावे सुरू आहेत. पूर्वविजेत्या श्रीलंकेतून आलेला विश्वचषक अद्याप आपल्याच ताब्यात असल्याचे कस्टम विभागाने म्हटले आहे. तर आयसीसी आणि बीसीसीआय ने विजेत्या भारतीय संघास देण्यात आलेला चषकच खरा विश्वचषक असल्याचे म्हटले आहे.
विविध वृत्तवाहिन्यांसह तज्ज्ञ मंडळी याबाबत विविध निष्कर्श काढत असून आयसीसी अध्यक्षांपासून कस्टम विभागाच्या वरिष्ठांपर्यंत सगळेच विविध विधाने करीत आहेत. हा चषक श्रीलंकेतून भारतात आणला गेल्यानंतर याची कस्टम ड्युटी २२ लाख रूपये देऊन चषक नेण्याबाबत सूत्रांना कळविण्यात आले होते. यानंतर विचाराअंती १५ लाख रूपये भरून चषक नेण्याबाबत कळविण्यात आल्याचे कस्टम विभागातर्फे सांगण्यात आल्याचे वृत्त आहे.
वास्तविक इतका घोळ घालण्याऐवजी गत विश्वचषक विजेत्या श्रीलंका संघाच्या पदाधिकार्‍यांना पाचारण करून विश्वचषकाचे खरे-खोटे सहज करता येणे शक्य आहे. याशिवाय कस्टम विभागाने आपल्या विधानाची सत्यता पडताळून दाखविण्यासाठी चषक श्रीलंकेतून आल्यानंतरची तयार झालेली कागदपत्रं अथवा पावती लोकांसमोर ठेवून वास्तव सामोरे आणावे. विश्वचषक स्पर्धा होऊन तीन दिवस झाल्यानंतर देखील अद्याप विविध विधाने करणे कोणासही साजेशे नाही...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012