मुख्य सामग्रीवर वगळा

कुसुमाग्रज प्रतिष्ठानला शासनाकडून ४० लाख रूपयांचा धनादेश प्रदान


कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने प्रतिष्ठानाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शासनाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते कुसुमाग्रज प्रतिष्ठानला ४० लाख रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

गंगापूररोड वरील कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये झालेल्या या कार्यक्रमात प्रतिष्ठानच्या वतीने कार्यवाह लोकेश शेवडे, उपाध्यक्ष रंजना पाटील व कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते हा धनादेश स्विकारला. यावेळी जिल्हाधिकारी पी.वेलरासू, उपविभागीय अधिकारी निलेश सागर, कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास लोणारी, प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे, विश्वस्त विनायक रानडे, उपकार्यवाह विनायक जोशी, आर्किटेक्ट संजय पाटील आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष श्रीमती पाटील यांनी यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांना कुसुमाग्रजांच्या पुस्तकांचा संच भेट दिला तर श्री. लोणारी यांनी जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाचे स्मृतीचिन्ह पालकमंत्र्यांना देवून त्यांचे स्वागत केले.
महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमी संधारण अभियानाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ


महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला येथे महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियानाचा प्रारंभ झाला. या अभियानाच्या निमित्ताने श्री. भुजबळ यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच शेतकर्‍यांना शेत तळ्यासाठीच्या चेकचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी अभियानास शुभेच्छा दिल्या. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, व जनतेने सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष मायावती पगारे, जिल्हाधिकारी पी.वेलरासू, येवला पंचायत समिती सभापती आर. डी. खैरनार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बापू काळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कैलास मोते, निफाड व चांदवड येथील उपविभागीय कृषी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012