मुख्य सामग्रीवर वगळा

भारतीय क्रिकेट संघाच्या विश्वविजयाने झालेला आनंद शब्दातीत- छगन भुजबळ

मुंबई, दि. 2 एप्रिल : महेंद्रसिंग धोणी याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकून सन 1983च्या विजयाची पुनरावृत्ती केल्यामुळे आपण अत्यंत हर्षभरित झालो असून आपल्याला झालेला आनंद शब्दातीत आहे. या ऐतिहासिक सोनेरी क्षणांचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले, हा माझ्यासाठी लाखमोलाचा ठेवा आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले आहे.
आजच्या सामन्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने शतकांच्या शतकाचा टप्पा ओलांडला असता तर हा आनंद शतगुणित झाला असता. मात्र गौतम गंभीर याच्या 97 धावांच्या खेळीमुळे ही उणीव भरून निघाली, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
कर्णधार धोणीला या मोक्याच्या सामन्यामध्ये सापडलेला सूर आणि त्याने झळकावलेल्या मोलाच्या 91 धावा या सुध्दा संघाच्या विजयासाठी महत्त्वाच्या ठरल्या. युवराज सिंगने षटकार ठोकून विवविजेतेपदावर दिमाखात भारताचे नाव कोरले. एकूणच फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या आघाडयांवर भारतीय संघाने बजावलेली कामगिरी महत्त्वाची ठरली. भारतीय संघाचा आजचा विजय हा सांघिक कामगिरीचा एक उत्कृष्ट नमुना असल्याचे मतही श्री. भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012