मुख्य सामग्रीवर वगळा

आता लक्ष लंकेला विरुद्ध विजयी गुढी उभारण्याचे...

टीम इंडिया ने विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणार्‍या पाकिस्तान संघाला हरवून अंतिम सामन्यात प्रवेश करून संपूर्ण क्रिकेट विश्वातून वाहवा मिळवली आहे. आता येत्या २ एप्रिलला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार्‍या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाला हरवून हिंदू नववर्षाच्या सुरवातीपू्र्वीच विजयाची गुढी उभारण्याची अपेक्षा आणि सप्तरंगी स्वप्न चाहत्यांनी रंगविले आहे.
पाकिस्तानच्या संघाविरुद्ध खेळताना आपले शंभरावे शतक पूर्ण करण्याचे स्वप्न भंगल्यामुळे थोडी निराशा पदरी पडलेला सचिन अंतिम सामन्यात हे स्वप्न साकार करण्यासाठी निश्चित प्रयत्न करून नववर्षाची भेट देईल असा विश्वास देखील क्रिकेटच्या विश्वासह जनसामान्यांना वाटत आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012