मुख्य सामग्रीवर वगळा

राज्यातील सर्व घटकांना सामावून घेणारा, समन्यायी अर्थसंकल्प- छगन भुजबळ

मुंबई, दि. 23 मार्च : राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागाला समान न्याय तसेच समाजातील सर्व घटकांना विकासाची समान संधी देणारा असा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम तथा पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सन 2011-12 चा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला. त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे की, अर्थसंकल्पात राज्यातील सर्व घटकांच्या विकासाचे सूतोवाच करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी तीन लाखांपर्यंत शून्य ते 2 टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेतानाच कृषी संजीवनी योजनेची घोषणाही स्तुत्य आहे. दोन लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा निर्धार करून त्या दृष्टीने पाटबंधारे विभागासाठी सुमारे 6300 कोटी तर जवाहर विहीर योजनेसाठी 221 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. फलोत्पादन वृध्दी, निर्यात केंद्रे, फार्म पॅक हाऊसिंग या बरोबरच सिंचन प्रकल्प, महाराष्ट्र सुजल योजना, रोजगार हमी योजना यांच्यासाठी भरीव तरतूद करून राज्यातील शेतकरी व कष्टकरी वर्गाला न्याय दिला आहे. प्राथमिक आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणासाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. सन 2012 अखेरपर्यंत राज्य भारनियमनमुक्त करण्याच्या दिशेनेही अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूद समाधानकारक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्याचा रस्ते विकास आणि गडकिल्ले विकासासाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीचे स्वागत करून श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे की, रस्तेविकासासाठी 2750 कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातून 1075 किलोमीटर रस्तेविकासाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. गडकिल्ल्यांच्या विकासासाठी विशेषत: सिंधुदुर्ग, विजयदुर्गसाठी विशेष तरतूद त्याचप्रमाणे सिंहगड, रायगड, शिवनेरी, प्रतापगड याठिकाणी दृकश्राव्य प्रयोगासह पर्यटकांसाठी विविध सुविधा विकसित करण्यासाठी केलेली तरतूदही राज्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील मागासवर्गीय तसेच अल्पसंख्य समाजाच्या विकासासाठीही अर्थसंकल्पात उपयुक्त अशी तरतूद केली आहे. राज्यातील अनुसूचित जाती- जमातींसाठी तसेच आदिवासी उपयोजनेअंतर्गत वित्तमंत्र्यांनी भरीव तरतूद केली आहे. वित्तमंत्र्यांनी अल्पसंख्याक समाजातील गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेली मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनाही अत्यंत स्वागतार्ह असल्याचेही श्री. भुजबळ यांनी नमूद केले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012