मुख्य सामग्रीवर वगळा

लोणारप्रमाणेच राज्यात अन्यत्रही पुरातत्व विभागाने संवर्धनाचे काम करावे: भुजबळ

मुंबई, ता. ४ - लोणार सरोवर परिसरातील प्राचीन वास्तूंच्या संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करण्यात येत आहे. तशाच तोडीचे काम राज्यातील अन्य ठिकाणीसुद्धा होणे अपेक्षित आहे, असे मत राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
मंत्रालयात लोणार सरोवराच्या संवर्धनाबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पर्यटन विभाग मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, पर्यटन उपसचिव राजीव निवतकर, केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे औरंगाबाद सर्कलचे उपअधिक्षक ए. एम. व्ही. सुब्रह्मण्यम्, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी रामस्वामी तसेच सार्व. बांधकाम व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी लोणार सरोवराच्या पर्यटनदृष्ट्या विकासाबाबतही आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था (नीरी) यांच्याकडून सरोवरात लोणार शहरातून जाणारे सांडपाणी रोखण्याबाबत सविस्तर अहवाल मागवून त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. सरोवराभोवती चेन-लिंक फेन्सिंग करण्यात यावे, परीसरात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या पिसाळ बाभळीच्या झाडांची समूळ तोडणी शक्य नसली तरी किमा न छातीएवढी कापणी वनखात्याच्या परवानगी करण्यात यावी, अशी सूचनाही श्री. भुजबळ यांनी केली. लोणार अभयारण्यातून जाणारा लोणार-मंठा रस्ता अंतर कमी होण्याच्या दृष्टीने लोणारा-पांग्राडोळे शिव ते देऊळगाव कुडपाळ फाटा ते मंठा असा बायपास करण्याचे निर्देशही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले. लोणार सरोवर परिसरातील प्रस्तावित भूसंपादनातील शेतीसंबंधी कास्तकारांना अधिकाधिक मोबदला देण्याच्या दृष्टीनेही कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी केली.
जगातील उल्कापात-निर्मित सरोवरांच्या ठिकाणी विकसित केलेल्या सुविधांचा अभ्यास करा
लोणार परिसर विकासाची ही चर्चा अत्यंत प्राथमिक असून जगात अशा प्रकारे उल्का पडून निर्माण झालेली मोजकी सरोवरे आहेत. त्याठिकाणी संबंधित देशांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या सोयीसुविधा विकसित केल्या आहेत, याचाही अभ्यास करण्याची गरज आहे. लोणार येथे कोणत्या सुविधा निर्माण करता येऊ शकतील, याचाही विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012