मुख्य सामग्रीवर वगळा

अर्जुनसिंग यांच्या निधनाने ज्येष्ठ नेत्याला मुकलो: अजित पवार

मुंबई, ता. ४ - माजी केंद्रीयमंत्री अर्जुन सिंग यांच्या निधनामुळे आपण एका ज्येष्ठ नेत्याला मुकलो आहोत, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे, की अर्जुन सिंग प्रदीर्घ काळ देशाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. लोकसभा आणि राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, केंद्रीय मंत्री, पंजाबचे राज्यपाल अशा विविध जबाबदार्‍या त्यांनी सांभाळून सामान्यांच्या हितास प्राधान्य दिले. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री म्हणून काम करताना देशातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न दीर्घ काळ स्मरणात राहतील.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012