मुख्य सामग्रीवर वगळा

जातिनिहाय जनगणना जून ते सप्टेंबर

नाशिक, ता. १ - देशातील जातिनिहाय जनगणना सन २०११ च्या मुख्य जनगणनेनंतर म्हणजेच जून ते सप्टेंबर २०११ या कालावधीत टप्प्याटप्प्प्याने करण्यात येणार असल्याची माहिती खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे.
श्री. भुजबळ यांनी २७ जुलै २०१० रोजी इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) जातिनिहाय जनगणनेच्या संदर्भात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना पत्र लिहिले होते. नियोजन आयोगाने अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या अहवालात ओबीसी जनगणनेची शिफारस केल्याचा दाखलाही पत्रात दिला होता. हे पत्र पंतप्रधान कार्यालयामार्फत पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय गृहविभागाच्या रजिस्ट्रार जनरल कार्यालयाच्या सामाजिक अध्ययन प्रभागाकडे पाठविण्यात आले होते. यानुसार असिस्टंट रजिस्ट्रार जनरल श्रीमती प्रतिभा कुमारी यांचे उपरोक्त माहिती देणारे पत्र आपल्याला नुकतेच प्राप्त झाले असल्याचे खासदार भुजबळ यांनी सांगितले. जून ते सप्टेंबर २०११ या कालावधीत टप्प्याटप्प्याने करावयाच्या जातिनिहाय जनगणनेच्या प्रक्रियेचे स्वरूप निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पत्रात देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अंतिम आराखडा निश्चित झाल्यानंतर देखील आपल्याला माहिती देण्यात यावी अशी विनंती देखील समीर भुजबळ यांनी केली आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012