मुख्य सामग्रीवर वगळा

उद्योग-व्यवसायातील संधीचा मराठी माणसाने लाभ घेण्याची गरज: छगन भुजबळ

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. २० - मराठी माणसाने आता नोकरी एके नोकरी चा पाढा सोडून उद्योग-व्यवसाय क्षेत्रातही उपलब्ध असलेल्या संधीचा लाभ घेऊन प्रगती साधण्याची गरज आहे. असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात सॅटरडे क्लब बिझनेस एक्सलन्स पुरस्काराचे वितरणप्रसंगी केले.
ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, जीटीएल कंपनीचे संस्थापक गजाननराव तिरोडकर आणि सॅटरडे क्लबचे सर्वेसर्वा माधवराव भिडे उपस्थित होते. यावेळी तिरोडकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. औरंगाबादच्या आर. जे. जोशी यांच्यासह २० विविध उद्योजकांना सन्मानित करण्यात आले.
श्री. भुजबळ म्हणाले, की मराठी माणसाने आता उद्योगाविषयीची आपली नकारात्मक मानसिकता बदलण्याची गरज आहे. याला आवश्यक असलेल्या आर्थिक मार्गदर्शनासाठी माधवराव भिडे यांच्यासारखे अनेक दिग्गज आहेत. यांचे मार्गदर्शन व शासकीय पातळीवरील उपलब्ध सवलती, योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधण्यासाठी मराठी माणसाने पुढे येण्याची गरज आहे. यावेळी कुमार केतकर यांनी मराठी माणसाच्या उद्योगाविषयक नकारात्मक मानसिकतेची मीमांसा करताना अलिकडे अनेक मराठी उद्योजक आपल्या कार्याची पताका उंचावत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. यूएफओ चे संजय गायकवाड, सचिन ट्रॅव्हल्सचे सचिन जकातदार यांच्यासह चेन्नई, बंगळूर, कोलकाता आदी ठिकाणचे मराठी उद्योजक उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012